शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

नियुक्तीपासूनच रोजंदारांचे प्रलंबित राहिले मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्प कार्यालयांतर्गत आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने ७८७ कर्मचारी नेमण्यात आले आहे. त्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्प कार्यालयांतर्गत आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने ७८७ कर्मचारी नेमण्यात आले आहे. त्यांची जून २०१९ पासून नियुक्त करण्यात आले असले तरी त्यांना अद्याप मानधन मिळाले नाही. त्यामुळे हे कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.तळोदा प्रकल्प कार्यालयामार्फत अक्कलकुवा, धडगाव व तळोदा या तीन तालुक्यांमध्ये शासकीय आश्रमशाळा चालविण्यात येत आहे. या शाळांमध्ये सेवा देणारे अनेक कर्मचारी निवृत्त झाले तर काहींचा मृत्यूही झाला. परंतु त्या जागा पुढे भरण्यात आल्या नाही. रिक्त जागांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सर्व शाळांवर पात्रता पूर्ण करणाऱ्या ुउमेदवारांना रोजंदारीने नेमण्यात आले आहे. त्यात अनेक शिक्षकांसह वर्ग चारमधी कर्मचाऱ्यांनाही नेमण्यात आले आहे.या कर्मचाºयांना दरवर्षी शाळा सुरू होतांनाच नियुक्तपत्र देण्यात येते. तसे या शैक्षणिक वर्षासाठीही जून २०१९ मध्ये नियुक्ती पत्रे देण्यात आली होती. परंतु या रोजंदारीने सेवा देणाºया कर्मचाºयांना अद्याप मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे हे कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. या कर्मचाºयांच्या कौटुंबिक समस्या व त्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात त्यांना तातडीने प्रलंबित मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.तळोदा प्रकल्पांतर्गत बहुतांश शासकीय आदिवासी आश्रम शाळांमधी विद्यार्थ्यांची संपर्ण जबाबदारी केवळ रोजंदारीने सेवा देणाºया कर्मचाºयांवर अवलंबून आहे. त्यामुळे या कर्मचाºयांना आर्थिक असो वा कौटुंबिक कुठल्याही समस्या येणार नाही. पुर्णत: जबाबदारी प्रशासन स्तरावरुन होणे अपेक्षित आहे. परंतु तसे होत नाही. त्यामुळे या कर्मचाºयांमधून प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ही नाराजी व्यक्त केली जात असतांनाच नऊ महिन्यांपासून प्रलंबित राहिलेले मानधन तातडीने देत या कर्मचाºयांना आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी तीन्ही तालुक्यांमध्ये कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाºयांमधून करण्यात येत आहे.४आदिवासी आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने नेमण्यात आलेल्या कर्मचाºयांकडून महिनाभर काम करुन घेतले जात असून मानधन मात्र केवळ २१ दिवसांचेच मिळत असल्याच्या व्यथा या कर्मचाºयांकडून मांडण्यात येत आहे. मानधनासाठी शासकीय नियमांची अंमलबजावणी करण्यात येते मात्र काम करुन घेतांना कर्मचाºयांचा कुठलाही विचार केला जात नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे.४रोजंदारीने ज्ञानदान करणाºया शिक्षकांना ३५ ते ४५ मिनीटाच्या पाच तासिका देण्यात आल्या आहे. परंतु हे शिक्षक नेमून दिलेल्या तासिकांपेक्षा अधिक योगदान देत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत थांबावेच लागत असल्याने हा कालावधी पाच तासिकांपेक्षा अधिक होत असल्याचे सांगण्यात येते.शासनामार्फत तातडीच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याचे म्हटले जाते. अशा तातडीच्या कामांमध्ये नऊ महिन्यांनंतर का असेना या रोजंदारीने सेवा देणाºया कर्मचाºयांचा विचार होणे अपेक्षित होते. परंतु तसे शासन यंत्रणेमार्फत होत नाही. त्यामुळे या कर्मचाºयांची सेवा बेदखल ठरत आहे. इमर कामांप्रमाणेच या सेवाचीही दखल व्हावी.आश्रमशाळांमध्ये कार्यरत असणाºया रोजंदारी कर्मचाºयांमध्ये शिक्षक व चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यात प्राथमिक शिक्षकांना दरमहा १३ हजार १२५, माध्यमिक शिक्षकांना १५ हजार ५००, उच्च माध्यमिक शिक्षकांना १५ हजार ५००, शिपाई प्रयोगशाळा परिचर यांना नऊ हजार तर स्वयंपाकीण व कामाठी यांना १२ हजार असे मानधन देण्याची तरतुद करण्यात आली आहे.तीन्ही तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रशाळांमध्ये रोजंदारीने अधिक्षकांची नियुक्त करण्यात आली नसून नियमित सेवेतील उमेदवारांकडेच ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु नियमित अधिक्षिका उपलब्ध होत नसल्याचे काही अधिक्षिकांची रोजंदारीनेच नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला अधिक्षिकांना शिक्षकांप्रमाणेच दरमहा १५ हजार मानधन देण्याची तरतुद करण्यात आली आहे.