शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

अनुदानित बियाण्यासाठी अर्ज केला आता शेतक-यांना सोडतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST

नंदुरबार : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०२०-२०२१ अंतर्गत अन्नधान्य, गळीत धान्य पिकांतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे व बियाणे मिनीकीट ...

नंदुरबार : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०२०-२०२१ अंतर्गत अन्नधान्य, गळीत धान्य पिकांतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे व बियाणे मिनीकीट यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज केले होते. २४ मे रोजी या योजनेत समाविष्ट होण्याची मुदत संपली असून शेतकरी लाॅटरी पद्धतीने होणा-या निवडीकडे लक्ष ठेवून आहेत.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानअंतर्गत कडधान्य बियाणे बाजरी, ज्वारी, सोयाबीन आदी बियाण्यावर त्याच्या किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. यानुसार कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. २४ मे पर्यंत च्या मुदतीची माहिती नसल्याने अनेक शेतकरी योजनेपासून वंचित राहिले आहेत. यातून अनुदानित बियाणे मिळणार का, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आले आहेत. येत्या काळात कृषी विभागाकडून सोडत काढली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतू याेजनेसाठी अत्यंत अल्प कालावधीत मुदत देण्यात आली असल्याने समस्या वाढल्या आहेत. लाॅकडाऊनमुळे गावातून शहरी भागात येवून शेतकऱ्यांना अर्ज न करता आल्याची माहिती दिली गेली आहे. ऑनलाईन अर्जांमधूनही हे स्पष्ट होत आहे.

अर्जांची संख्या दोन दिवसात कळणार

महाडिबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतक-यांची यादी गुरुवारी किंवा शुक्रवारी समोर येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केवळ पाच हजार ६०० शेतकरी अनुदानित बियाणे योजनेत समाविष्ट झाल्याची माहिती आहे.

महाडिबीटी पोर्टलवर मोबाईलद्वारे भरणे कठीण गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. आधार क्रमांक, बँक अपडेशन केल्यानंतर शेवटी अर्ज सबमिट करण्यासाठी देण्यात येणारा ओटीपी मिळत नसल्याने अर्जच पूर्ण झाले नसल्याचा दावा केला गेला आहे.

शासनाकडून गेल्या वर्षापासून कृषी विभागाच्या सर्व योजना ह्या महाडिबिटीमार्फत राबवण्यात येतात. यात शेतकरी सर्वाधिक पसंती दिली जाते. यातून २०१८-१९ या वर्षात अडीच हजारापेक्षा अधिक शेतक-यांना ट्रॅक्टर व यांत्रिक साहित्य मंजूर करण्यात आले होते. या वाटपाबाबत अनेक तक्रारी झाल्या होत्या. दरम्यान गेल्या वर्षात कोरोनामुळे कृषी विभागाकडून राबवण्यात येणा-या योजना ह्या मर्यादित झाल्या आहेत. दरम्यान यंदाच्या वर्षात यांत्रिकीकरणाला सर्वाधिक प्रतिसाद देण्यात आल्याचे समजते. यातून ही योजना पारदर्शीपणे राबवण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

या आहेत योजना

कृषी यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कृषी स्वावलंबन योजना, फलोत्पादन विकास कार्यक्रम, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, राष्ट्रीय कृषी विकास याेजना महाडिबीटीमार्फत चालवल्या जात आहेत.

अनुदानित बियाण्यासाठी अर्ज केला आहे. ऑनलाईन अर्ज करताना अनेक अडचणी आल्या. अर्ज पूर्ण भरला गेल्यानंतर ओटीपीच आला नाही. अकाउंट ओपन असले तरीही अर्ज केला असल्याचे स्टेटस दिसले नाही. यामुळे योजनेचा लाभ मिळणे आता अधांतरीच आहे. शासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे.

-हारसिंग वळवी,

शेतकरी, धडगाव.

कृषी विभागाच्या योजना चांगल्या आहेत. परंतू महाडिबीटीमुळे त्या गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. शेतक-यांना ऑनलाईन अर्ज कसा करतात, तेच माहिती नाही. यातून शेतकरी हैराण झाले आहेत. गेल्या दोन वर्षात कोणत्याच अनुदानित योजनेचा लाभ शेतक-यांना मिळाला नाही.

-भिमा गिरधर चाैधरी,

शेतकरी मोड,ता. तळोदा.

एसएमएस आल्यानंतर...

दरम्यान योजनेत निवड झालेल्या शेतक-यांना कृषी विभाग ऑनलाईन पद्धतीने एसएमएस पाठवणार आहेत. मोबाईलवर येणारा हा संदेश प्राप्त झाल्यानंतर शेतक-यांना त्या-त्या ठिकाणी बोलवण्यात येवून माहिती देण्यात येणार आहे. तालुका व जिल्हास्तरावरुन योजनेत समावेश झाल्याची माहिती दिली जाणार आहे.

दरम्यान यंदा खतांचे दर वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

यातून अनुदानित बियाणे मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

विभागाने योजनला मुदतवाढ देण्याचीही मागणी आहे.