शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST

कोरोना महामारीमुळे १० महिन्यांपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या वर्षीचे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. अनेक शाळांनी ...

कोरोना महामारीमुळे १० महिन्यांपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या वर्षीचे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेतले. परंतु ते परिणामकारक ठरले नाहीत. कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने राज्य शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील दहावी व बारावीचे वर्ग २८ नोव्हेंबरपासून तर शहरी भागातील वर्ग १० डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या दहावी व बारावीचे वर्ग शाळांमध्ये सुरू आहेत. शिक्षण विभागाने दोन्ही वर्गाचा अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. त्यानुसार दहावी व बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. परंतु निश्चित केलेल्या वेळेत हा अभ्यासक्रम पूर्ण होईल की नाही याची खात्री वाटत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे .

दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काठिण्य पातळीवरील काही गद्य व पद्य कमी करण्यात आले आहेत. काही ऐतिहासिक संदर्भाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न वगळण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सर्वच विषयांचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला असल्याने एकप्रकारे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी उर्वरित अभ्यासक्रम निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण करून पुन्हा विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्याची तारेवरची कसरत शिक्षकांना करावी लागणार आहे. त्यामुळे एकीकडे विद्यार्थी-पालक अभ्यासक्रम ठरावीक वेळेत पूर्ण होतो का? याबाबत चिंतीत असताना तो पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

अभ्यासक्रमात कपात करूनही अडचणी कायम

दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे किंवा विद्यार्थ्यांनाही अध्ययन करणे सोपे जावे यासाठी राज्य शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. अभ्यासक्रम कमी करण्यात आल्याने शाळांना दिलासा मिळाला आहे. बारावीचा अभ्यासक्रमही कमी करण्यात आला आहे. जवळपास २५ टक्के अभ्यासक्रमावर परीक्षेत प्रश्न विचारले जाणार नाहीत. हा वगळलेला भाग सोडून उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.