शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST

कोरोना महामारीमुळे १० महिन्यांपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या वर्षीचे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. अनेक शाळांनी ...

कोरोना महामारीमुळे १० महिन्यांपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या वर्षीचे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेतले. परंतु ते परिणामकारक ठरले नाहीत. कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने राज्य शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील दहावी व बारावीचे वर्ग २८ नोव्हेंबरपासून तर शहरी भागातील वर्ग १० डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या दहावी व बारावीचे वर्ग शाळांमध्ये सुरू आहेत. शिक्षण विभागाने दोन्ही वर्गाचा अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. त्यानुसार दहावी व बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. परंतु निश्चित केलेल्या वेळेत हा अभ्यासक्रम पूर्ण होईल की नाही याची खात्री वाटत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे .

दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काठिण्य पातळीवरील काही गद्य व पद्य कमी करण्यात आले आहेत. काही ऐतिहासिक संदर्भाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न वगळण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सर्वच विषयांचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला असल्याने एकप्रकारे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी उर्वरित अभ्यासक्रम निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण करून पुन्हा विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्याची तारेवरची कसरत शिक्षकांना करावी लागणार आहे. त्यामुळे एकीकडे विद्यार्थी-पालक अभ्यासक्रम ठरावीक वेळेत पूर्ण होतो का? याबाबत चिंतीत असताना तो पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

अभ्यासक्रमात कपात करूनही अडचणी कायम

दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे किंवा विद्यार्थ्यांनाही अध्ययन करणे सोपे जावे यासाठी राज्य शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. अभ्यासक्रम कमी करण्यात आल्याने शाळांना दिलासा मिळाला आहे. बारावीचा अभ्यासक्रमही कमी करण्यात आला आहे. जवळपास २५ टक्के अभ्यासक्रमावर परीक्षेत प्रश्न विचारले जाणार नाहीत. हा वगळलेला भाग सोडून उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.