शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बनावट लग्नप्रकरणी आणखी एकास अटक आरोपी संख्या नऊ, २७ पर्यंत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

याबाबत पोलीस सूत्रानुसार, मंदाणे येथील एका युवकाशी लग्न करून अवघ्या १५ दिवसातच पळून जाऊन दुसऱ्याशी लग्न उरकून ...

याबाबत पोलीस सूत्रानुसार, मंदाणे येथील एका युवकाशी लग्न करून अवघ्या १५ दिवसातच पळून जाऊन दुसऱ्याशी लग्न उरकून करून लाखो रुपयांचा गंडा घालून तरुणी सोनू राजू शिंदे हिच्यासह त्यांच्या टोळीने फसवणूक केली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या टोळीने संपूर्ण खानदेशात अनेकांची फसवणूक केल्याचे उघड होऊ लागले आहे. मंदाणे येथील भूषण सैंदाणे याने फसवणुकीची फिर्याद दिल्याने तब्बल आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पाच जण जेलची हवा खात आहेत. या टोळीतील अटकेतील आरोपींना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर अजून एक आरोपीचे नाव उघड झाले आहे. त्यास पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश सोनवणे, हवालदार मिथुन शिसोदे, कृष्णा जाधव यांच्या पथकाने जामनेर तालुक्यातील शेवगाव पिंपरी शिवारातील एका शेतात दत्ता देवीदास लोणारे रा. वाशिम, हल्ली मुक्काम जामनेर यास शिताफीने अटक केली. दत्ता लोणारे या आरोपीसह अन्य अटकेत असलेल्या पाच जणांना सोमवारी २४ मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत २७ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. पैकी तरुणी पूजा उर्फ सोनू शिंदे हिची आई वंदना शिंदे यांना वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडी मिळाली असून जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. उर्वरित फरार असलेले मुख्य सूत्रधार बाबाराव आमले रा. औरंगाबाद, प्रीती कांबळे, रा. हिंगोली, भैरव शिंदे यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना होणार असून त्यांना लवकरच पकडले जाईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी व्यक्त केला आहे.

सर्वच समाजाने जागृतता बाळगावी

शेतकरी, व्यावसायिक तसेच बेरोजगार तरुणांना मुली मिळत नसल्याचा गैरफायदा घेऊन लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून लाख रुपये हडप करणाऱ्या दलालांच्या टोळ्या राज्यभरात सक्रिय असल्याची सर्वदूर चर्चा आहे. ह्या टोळ्या अशा तरुणांना जाळ्यात अडकून लग्नाचे आमिष दाखवून कशी लाखो रुपयांची लूट करतात व पद्धतशीरपणे कसे फसवतात हे मंदाने व अडावद येथील घटनेने उघड झाले आहे. त्यामुळे या घटनेवरून सर्व समाजाने विवाह जोडतांना सखोल माहिती घेऊन समक्ष खात्री करून कायदेशीर मार्ग अवलंबिला पाहिजे व जागृतता ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले.