शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : पंचायत समितीची बैठक मंगळवारी घेण्यात आली होती. या बैठकीत आदिवासी विकास प्रकल्प व सामाजिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : पंचायत समितीची बैठक मंगळवारी घेण्यात आली होती. या बैठकीत आदिवासी विकास प्रकल्प व सामाजिक वनीकरण विभागास उपस्थितीचे पत्र देऊनही त्यांनी बैठकीस ठेंगा दाखविल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून पुन्हा संबंधीतांना नोटीसा बजाविण्याचे आदेश देण्यात आले.तळोदा पंचायत समितीची मासिक सभा मंगळवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती यशवंत ठाकरे होते. याप्रसंगी उपसभापती लताबाई अर्जुन वळवी, सदस्य सोनी रोहिदास पाडवी, विजयसिंग राणा, सुपीबाई मोहन ठाकरे, सुमनबाई धर्मेंद्र ठाकरे, ईलाबाई महेंद्र पवार, चंदनकुमार पवार, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहायक गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे उपस्थित होते.या वेळी सर्व विभागांच्या कामकाजांचा आढावा घेण्यात येवून शासनाच्या विविध आदेशांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर तळोदा तालुक्यात ज्या नळपाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्या योजनांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना संबंधीतांना देण्यात आल्या. याशिवाय प्रत्येक घराला नळ देण्यासाठी कार्यवाही करण्याची सूचनाही देण्यात आली.याप्रसंगी आदिवासी विकास प्रकल्प व सामाजिक वनीकरण विभागाचा आढावा घेण्याचा विषय आला तेव्हा या विभागातील कुणीच अधिकारी वा त्यांचे प्रतिनिधी पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीबाबत नोटीसा बजावून खुलासाही मागविण्याचे आदेश गटविकास अधिकाºयांना सभापतींनी दिले.वास्तविक त्यांना पंचायत समितीच्या मासिक सभेचे पत्र पाठविले होते असे असतांना ते उपस्थित राहीले नाही. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधीदेखील सभा संपल्यानंतर आले होते. परंतु त्यांना सभेची नियोजित वेळ एक वाजेची देण्यात आली होती. त्यामुळे उशिर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीस पंचायत समिती बांधकाम विभागाचे पवार, गवळे, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.सुनील गोसावी व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.आदिवासी विकास प्रकल्प व सामाजिक वनीकरण विभागांना पंचायत समितीच्या मासिक सभेत प्रतिनिधी पाठविण्याबाबत लेखी पत्र देऊनही त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संबंधितांच्च्या उदासिन भूमिकेबाबत जिल्हा विकास व नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती यशवंत रायसिंग ठाकरे यांनी लोकमतशी बोलतांना दिली. वास्तविक प्रकल्प व सामाजिक वनीकरणाच्या योजना तालुक्यातील आदिवासी जनतेशी निगडीत आहेत. या योजनां प्रकरणी लोकप्रतिनिधींकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतात. साहजिकच त्याबाबत अडचणींचे निवारण करण्यासाठी अथवा उपाययोजनांसाठी समन्वय राखण्याकरीता पंचायत समितीच्या बैठकीत त्यांची उपस्थिती आवश्यक असते. पंचायत समितीनेदेखील तसा ठराव घेऊन त्यांना पत्रे पाठविली होती. परंतु उदासिन प्रशासनाने त्यांची अजून पावेतो कुठलीच दखल घेतली नाही. त्यांना नोटीसा बजावून खुलासा मागविण्याची सूचनादेखील अधिकाºयांना देण्यात आली आहे. जनतेच्या विकास कामांमध्ये कुणीही उदासिन धोरण घेवू नये यासाठी कडक पावले उलचण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.