शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...आणि मंत्र्यांचा ताफा जाताच दुकाने खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 13:10 IST

जितेंद्र गिरासे । लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने कृषी सेवा केंद्र अत्यावश्यक सेवेप्रमाणेच सुरू ...

जितेंद्र गिरासे ।लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने कृषी सेवा केंद्र अत्यावश्यक सेवेप्रमाणेच सुरू ठेवावे, असे प्रशासन भूमिका घेत असली तरी सारंगखेड्यात मात्र मंगळवारी त्याचा उलटा अनुभव आला. कृषीमंत्री दादाजी भुसे यांचा दौरा या भागातून जाणार असल्याने त्यांचा धसका घेऊन येथील कृषी सेवा केंद्र चालकांनी तब्बल सहा तास दुकाने बंद ठेवली होती. मंत्र्यांचा ताफा परतताच मात्र दुकाने पूर्ववत सुरू झाल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला.कृषीमंत्री दादाजी भुसे हे मंगळवारी धुळे येथून सारंगखेडामार्गे कहाटूळ येथे जाणार होते. मंत्री भुसे हे सारंगखेडामार्गे जाणार असल्याची माहिती कळाल्यावर येथील रासायनिक खते व बी-बियाणे विक्रेत्यांनी दुकाने बंद केल्याने त्याबाबत दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी काही दिवसांपूर्वी साध्या वेशात व मोटारसायकलीने जात काही ठिकाणी रासायनिक खते विक्रीच्या दुकानांना भेटी देत शेतकऱ्यांना खते न देणाºया विक्रेत्यांवर कारवाई केली होती. मंगळवारी मंत्री भुसे हे सारंगखेडामार्गे मोटारीने कहाटूळ येथे जाणार होते. ते कदाचित येऊन आपल्या दुकानाची तपासणी करतील की काय या धास्तीमुळे तर येथील रासायनिक खत विक्रेते व बी-बियाणे विक्रेत्यांनी दुपारी दोन वाजताच दुकाने बंद केली नाहीत ना? अशी चर्चा येथे दिवसभर होती.कोरोना विषाणू संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी सध्या जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, तळोदा व नवापूर ही चार प्रमुख शहरे पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. मात्र या चारही ठिकाणी सकाळी सात ते दुपारी १२ वाजेपर्यंत रासायनिक खते, बी-बियाणे, किटकनाशके विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. तसा निर्णय ग्रामपंचायत हद्दीत नसतानादेखील मंगळवारी नेमका राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या दौºयामुळे दुकाने बंद असल्याबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. यात दुकाने बंद करण्याबाबत नेमकी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दुकानदारांना सूचना केली की दुकानदारांनी स्वत:हून आपली दुकाने बंद केली याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दुकाने बंद असल्याने अनेक शेतकरी दुकानांसमोर उभे असल्याचे चित्र या वेळी पहावयास मिळाले.दरम्यान, कृषीमंत्री दादाजी भुसे यांचा ताफा परतताच येथील कृषी सेवा केंद्र पूर्ववत सुरू झाल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला.