शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पाणीपुरवठय़ासाठी आंबेबाराचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 11:51 IST

नंदुरबार :  शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक धरणातील मर्यादीत पाणीसाठा लक्षात घेता आंबेबारा धरणातील पाणी आता मदतीला धावून आले ...

नंदुरबार :  शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक धरणातील मर्यादीत पाणीसाठा लक्षात घेता आंबेबारा धरणातील पाणी आता मदतीला धावून आले आहे. आष्टे पंपींग स्टेशनवरील विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने आंबेबारा धरणातील पाणी नदीतून चारीद्वारे या विहिरीत आणले जात आहे. दरम्यान, या पाण्याची चोरी होऊ नये म्हणून पालिकेने उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनीही पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. नंदुरबार शहराला मुख्यत्वे शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. 30 टक्के पाणीपुरवठा आंबेबारा धरणातून केला जातो. त्यामुळे दरवर्षी या दोन्ही प्रकल्पातील पाणीसाठा पालिकेतर्फे आरक्षीत करण्यात येतो. यंदा पजर्न्यमान कमी झाल्याने दोन्ही प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे विरचक आणि आंबेबारा धरणातील संपुर्ण पाणीसाठा यंदा पालिकेने आरक्षीत केला आहे.विहिरीची पातळी खोलविरचक प्रमाणेच आष्टे शिवारात शिवण नदीवर पालिकेचे पंपींग स्टेशन आहे. या ठिकाणी असलेल्या विहिरीतून पाणी उपसा केला जातो. सध्या तेथील पाणी पातळी खोल गेली आहे. परिणामी आंबेबारा धरणातून शिवण नदीत चारीद्वारे आष्टे विहिरीजवळ पाणी आणले जात आहे. तीन दिवसांपूर्वी आंबेबारा धरणातून पाणी सोडण्यात आले  होते. गुरुवारी दुपारी हे पाणी विहिरीजवळ आले. या धरणात यंदा 60 टक्के पाणीसाठा झाला होता. आताच्या परिस्थितीत तेथे 50 ते 55 टक्के पाणीसाठा आहे. हा संपुर्ण पाणीसाठा यंदा पालिकेने आरक्षीत केला आहे. त्यामुळे या धरणातून रब्बीसाठी पाण्याचे आवर्तण सोडण्यात आलेले नाही. आंबेबाराचे पाणी नियोजनानुसार सोडल्यास किमान मे र्पयत ते पुरणार आहे.विरचकमधून नियमित पुरवठाविरचक प्रकल्पातून नियमित पाणीपुरवठा होत आहे. या    प्रकल्पात यंदा 41 टक्के पाणीसाठा झाला होता. सद्य स्थितीत या प्रकल्पात 30 टक्के पाणीसाठा आहे. सध्या प्रकल्पाच्या ठिकाणी असलेली उपसा विहिरीर्पयत धरणातील     पाणी आहे. पुढील काळात पाणी कमी झाल्यावर या ठिकाणी देखील धरण ते उपसा विहिर या दरम्यान  चारी करून पाणी आणावे लागणार आहे. विरचक प्रकल्पातील  पाणीसाठा लक्षात घेता जून ते जुलै महिन्यार्पयत नियोजनानुसार पाणीपुरवठा करता येवू शकणार आहे. त्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावा लागणार आहे. त्यासाठी पालिकेतर्फे जनजागृती केली जात आहे.  नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या या दोन्ही प्रकल्पात यंदा अत्यल्प पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जून, जुलै महिन्यार्पयत पाणी पुरविण्याचे मोठे आव्हान पालिकेला आहे. त्यादृष्टीने पाण्याचे नियोजन करून ठेवण्यात आले आहे. शहरात असलेल्या पालिकेच्या कुपनलिकांमधून देखील  पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे अशा कुपनलिकांची देखील  देखभाल आणि दुरूस्तीकडे पालिकेला लक्ष द्यावे लागणार आहे.