शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

पाणीपुरवठय़ासाठी आंबेबाराचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 11:51 IST

नंदुरबार :  शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक धरणातील मर्यादीत पाणीसाठा लक्षात घेता आंबेबारा धरणातील पाणी आता मदतीला धावून आले ...

नंदुरबार :  शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक धरणातील मर्यादीत पाणीसाठा लक्षात घेता आंबेबारा धरणातील पाणी आता मदतीला धावून आले आहे. आष्टे पंपींग स्टेशनवरील विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने आंबेबारा धरणातील पाणी नदीतून चारीद्वारे या विहिरीत आणले जात आहे. दरम्यान, या पाण्याची चोरी होऊ नये म्हणून पालिकेने उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनीही पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. नंदुरबार शहराला मुख्यत्वे शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. 30 टक्के पाणीपुरवठा आंबेबारा धरणातून केला जातो. त्यामुळे दरवर्षी या दोन्ही प्रकल्पातील पाणीसाठा पालिकेतर्फे आरक्षीत करण्यात येतो. यंदा पजर्न्यमान कमी झाल्याने दोन्ही प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यामुळे विरचक आणि आंबेबारा धरणातील संपुर्ण पाणीसाठा यंदा पालिकेने आरक्षीत केला आहे.विहिरीची पातळी खोलविरचक प्रमाणेच आष्टे शिवारात शिवण नदीवर पालिकेचे पंपींग स्टेशन आहे. या ठिकाणी असलेल्या विहिरीतून पाणी उपसा केला जातो. सध्या तेथील पाणी पातळी खोल गेली आहे. परिणामी आंबेबारा धरणातून शिवण नदीत चारीद्वारे आष्टे विहिरीजवळ पाणी आणले जात आहे. तीन दिवसांपूर्वी आंबेबारा धरणातून पाणी सोडण्यात आले  होते. गुरुवारी दुपारी हे पाणी विहिरीजवळ आले. या धरणात यंदा 60 टक्के पाणीसाठा झाला होता. आताच्या परिस्थितीत तेथे 50 ते 55 टक्के पाणीसाठा आहे. हा संपुर्ण पाणीसाठा यंदा पालिकेने आरक्षीत केला आहे. त्यामुळे या धरणातून रब्बीसाठी पाण्याचे आवर्तण सोडण्यात आलेले नाही. आंबेबाराचे पाणी नियोजनानुसार सोडल्यास किमान मे र्पयत ते पुरणार आहे.विरचकमधून नियमित पुरवठाविरचक प्रकल्पातून नियमित पाणीपुरवठा होत आहे. या    प्रकल्पात यंदा 41 टक्के पाणीसाठा झाला होता. सद्य स्थितीत या प्रकल्पात 30 टक्के पाणीसाठा आहे. सध्या प्रकल्पाच्या ठिकाणी असलेली उपसा विहिरीर्पयत धरणातील     पाणी आहे. पुढील काळात पाणी कमी झाल्यावर या ठिकाणी देखील धरण ते उपसा विहिर या दरम्यान  चारी करून पाणी आणावे लागणार आहे. विरचक प्रकल्पातील  पाणीसाठा लक्षात घेता जून ते जुलै महिन्यार्पयत नियोजनानुसार पाणीपुरवठा करता येवू शकणार आहे. त्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावा लागणार आहे. त्यासाठी पालिकेतर्फे जनजागृती केली जात आहे.  नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या या दोन्ही प्रकल्पात यंदा अत्यल्प पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जून, जुलै महिन्यार्पयत पाणी पुरविण्याचे मोठे आव्हान पालिकेला आहे. त्यादृष्टीने पाण्याचे नियोजन करून ठेवण्यात आले आहे. शहरात असलेल्या पालिकेच्या कुपनलिकांमधून देखील  पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे अशा कुपनलिकांची देखील  देखभाल आणि दुरूस्तीकडे पालिकेला लक्ष द्यावे लागणार आहे.