शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांच्या बँक खात्याच्या अडचणीमुळे विकासकामांची रक्कम थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : ग्रामपंचायतींच्या बँक खात्यातील रक्कम तांत्रिक प्रक्रियेमुळे काढता येत नसल्यामुळे झालेल्या विकासकामांची बिलेदेखील थकली आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळोदा : ग्रामपंचायतींच्या बँक खात्यातील रक्कम तांत्रिक प्रक्रियेमुळे काढता येत नसल्यामुळे झालेल्या विकासकामांची बिलेदेखील थकली आहेत. सर्वच ग्रामपंचायतींना त्याचा फटका बसला असून, या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणी पंचायत समितीच्या नूतन गटविकास अधिकाऱ्यांकडे आजी, माजी सरपंचांनी केली आहे.

तळोदा पंचायत समितीच्या नूतन गटविकास अधिकारी म्हणून प्रभाकर कोकणी यांची नियुक्ती शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकतीच केली आहे. शिवाय त्यांनी गेल्या आठ ते १० दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा पदभारदेखील हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी गटविकास अधिकारी कोकणी यांची भेट घेतली. प्रारंभी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्रभावी प्रशासकीय नियोजनाअभावी ग्रामपंचायतीबरोबरच ग्रामस्थांना व लाभार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या ग्रामसेवकांना नियमितपणे गावास भेट देण्याची सूचना द्यावी. त्याचबरोबर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या ग्रामपंचायत भेटीचे वेळापत्रक तयार करून त्यांना ताकीद द्यावी, अशा वेगवेगळ्या सूचना मांडल्या. वास्तविक तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींना प्रशासकाची नियुक्ती करून साधारण दीड महिना उलटत आला आहे. तरीही ग्रामपंचायतींचे डी एस पी मॅपिंग अद्याप झालेले नाही. साहजिकच यामुळे तांत्रिक प्रक्रिया रखडली आहे. परिणामी ग्रामपंचायतींना आपल्या बँक खात्यातील रक्कम काढता येत नाही. त्यामुळे झालेल्या विकासकामांची बिले संबंधितांना अदा करता येत नाहीत. त्यांची बिले रखडल्याने ते सारखे चकरा मारत असतात. ही टेक्निकल प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सक्त ताकीद द्यावी. याबरोबरच तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे अंतिम हप्ते बाकी आहेत. त्यासाठी ते पंचायत समितीकडे सारखे हेलपाटे मारत असतात. तरीही संबंधित त्यांना दाद देत नाही. शिवाय पंचायत समितीमार्फत सुरू असलेल्या लाभार्थ्यांच्या गोठ्यांचे हप्ते थकले आहेत. अशा वेगवेगळ्या प्रश्नांबाबत गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून त्यावर कार्यवाही करण्याची मागणी सरपंचांनी केली आहे.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी बळीराम पाडवी, यशवंत पाडवी, शानूबाई वळवी, सरपंच प्रताप नाईक, कैलास पाडवी, महेंद्र पवार, राजेंद्र पाडवी, कागडा पवार, राजू पुजारी, जयवंत पाडवी, विमलबाई पाडवी, विनोद खर्डे, किरण वसावे, सरवरर्सिंग वसावे आदी उपस्थित होते.

आजी,माजी सरपंच यांच्या बैठकीचे नियोजन

पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील सरपंचांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर येत्या ६ ऑक्टोबर रोजी संबंधित विभाग प्रमुख व आजी, माजी सरपंच यांची बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. त्याबाबत ठोस उपाययोजना करून तक्रारीचे निवारण करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत तक्रारी केल्या होत्या. शिस्त लावण्याची मागणी केली होती.

ग्रामपंचायतींच्या विकासकामांबरोबर लाभार्थ्यांच्या विविध योजनांच्या अडचणी होत्या. या समस्या सरपंचांनी नूतन गटविकास अधिकारी यांच्यापुढे मांडल्या. त्यांनी याविषयी सकारात्मक चर्चा करून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. - बळीराम पाडवी, माजी तालुकाध्यक्ष सरपंच संघटना, तळोदा.

फोटो : तळोदा पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी प्रभाकर कोकणी यांनी पदभार स्वीकारलानंतर त्यांचे स्वागत करताना सरपंच संघटनेचे पदाधिकारी.