शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

आमावस्येच्या रात्री स्मशानात झाले प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 12:11 IST

अंनिसचा उपक्रम : नंदुरबारात ‘मन व मनाचे आजार’ यावर व्याख्यान

नंदुरबार : आमावस्येच्या रात्री नंदुरबार येथील स्मशानभूमीत महाराष्ट्र अंधश्रध्दा निमरूलन समितीच्या नंदुरबार शाखेतर्फे प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला़ ‘मन आणि मनाचे आजार’ या विषयावर गुरुवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होत़ेसमाजात वाढत्या अंधश्रध्दा व त्यातून निर्माण होणारे मनाचे आजार दूर करण्यासाठी अंनिसतर्फे हा अभिनव उपक्रम घेण्यात आला़ कार्यक्रमाचे उद्घाटन नेहमी प्रमाणे अनोख्या पध्दतीने करण्यात आल़े महिला शाखेच्या कार्यकत्र्या डॉ़ आरुषी सुरैया यांच्या हस्ते पाण्याव्दारे दिवा पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली़ त्यानंतर पाण्यावर दिवा कसा पेटला, यामागील वैज्ञानिक कारणे शाखेचे किर्तीवर्धन तायडे यांनी स्पष्ट केल़े मनाचे आजार कशामुळे होतात या विषयावर व्याख्याते तसेच महाराष्ट्र अंनिसचे नंदुरबार शाखेचे अध्यक्ष डॉ़ सी़डी़ महाजन यांनी मार्गदर्शन केल़े मागील आठवडय़ात दिल्ली येथे मनाच्या आजारांमुळेच एका कुटुंबातील अकरा लोकांनी आत्महत्या करुन घेतल्याची दुदैवी घटना घडली होती़ त्यामुळे मनाचे आजार हे जास्तीत जास्त अंधश्रध्देमुळेच घडत असल्याचे डॉ़ महाजन यांनी सांगितल़े तसेच शाखेचे प्रधान सचिव किर्तीवर्धन तायडे यांनी अशा उपक्रमातून समाजातील सर्वसामान्य मानसाच्या मनातून भूत, आत्मा, आमावस्येची रात्र, ग्रहांची दिशा, दशा यांच्या विषयी असलेल्या अंधश्रध्दा, गैरसमज आदी दूर होण्यास मदत होईल असा आशावाद दर्शवला़ कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकत्र्यानी पुढील आयुष्यात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प केला़ कार्यक्रमासाठी डॉ़ सी़डी़ महाजन, डॉ़ आरुषी सुरैया, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन पाटील, फिरोज खान, दीपक चौधरी, सूर्यकांत आगळे, चंद्रमणी बरडे, जितेंद्र गोसावी, वसंत वळवी, रणवीर पेंढारकर, सोहम टिळंगे, ऋृषिकेश पाटील, प्रथमेश वसावे, वैभव राजपूत आदींनी परिश्रम         घेतल़े