शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

रुग्णसंख्या घटली तरी मृत्युदर दोन टक्क्यांवर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST

नंदुरबार : गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या कमी झाली असली तर मृत्युदर हा सरासरी दोन टक्क्यांपर्यंत स्थिर आहे. ...

नंदुरबार : गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या कमी झाली असली तर मृत्युदर हा सरासरी दोन टक्क्यांपर्यंत स्थिर आहे. दरम्यान, दोन महिन्यात जिल्ह्यात तब्बल ५३१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील नवापूर तालुक्याचा मृत्युदर हा सर्वाधिक ३.५६ टक्के तर सर्वात कमी शहादा तालुक्याचा १.६५ टक्के इतका आहे. नंदुरबार जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या जिल्हाबाहेरील व्यक्तींचा मृत्युदर मात्र तब्बल ६.४६ इतका आहे.

जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे. गेल्या १२ दिवसांपासून दोन आकडी रुग्ण संख्या येऊ लागली आहे. मृत्यूचे प्रमाणदेखील दोन दिवसांपासून एक आकडी संख्येवर आले आहे. यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील मृत्युदर कमी होण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावणेदोन ते दोन टक्क्यांच्या दरम्यानच मृत्युदर स्थिर आहे. सद्य:स्थितीत सरासरी १.९९ टक्के इतका मृत्युदर कायम आहे.

दुसरी लाट ठरली जीवघेणी

जिल्ह्यात दुसरी लाट ही सर्वाधिक जीवघेणी ठरली. अवघ्या ५९ दिवसात तब्बल ५३१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अर्थात दिवसाला सरासरी १० ते ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या काळात अनेकजण गंभीर प्रकृतीतून बाहेर निघाले आहेत. २३ मार्च ते २० एप्रिल या काळात सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू नोंदले गेले आहेत. कोरोनाच्या वर्षभराच्या काळात अवघे २६० मृत्युसंख्या असताना दोन महिन्यांच्या काळात ती वाढून ७९१ पर्यंत पोहचली आहे. अर्थात दोन महिन्यात तब्बल ५३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत्युदर कायम

जिल्ह्यातील मृत्युदर हा गेल्या दोन महिन्यांपासून कायम आहे. सरासरी पावणे दोन ते दोन टक्क्याच्या दरम्यान मृत्युदर राहत आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या ही दोन आकडी येत असली तरी मृत्यू संख्यादेखील काही अपवाद वगळता दोन आकडी येत होती. मात्र दोन दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण कमी आले आहे.

नवापूर तालुक्यात सर्वाधिक दर

मृत्युदर हा नवापूर तालुक्यात सर्वाधिक आहे. तर मृत्यू संख्या नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक आहे. नवापूर तालुक्यात चार हजार ९२ जण कोरोना बाधित झाले आहेत त्यापैकी १४६ जणांचा मृत्यू झाला असून मृत्युदर हा ३.५६ टक्केपर्यंत आहे. त्या खालोखाल नंदुरबारचा दर आहे. नंदुरबार तालुक्यात १५ हजार ७८७ जण कोरोनाबाधित असून त्यापैकी ३३७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर हा २.१३ इतका आहे. धडगाव तालुक्यात ८४९ जण कोरोनाबाधित झाले असून मृत्यू होणाऱ्यांची संख्या १८ इतकी आहे. तेथील मृत्युदर हा २.१२ टक्के आहे. तळोदा तालुक्यात तीन हजार ६९४ जण कोरोनाबाधित आढळून आले तर ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. या तालुक्याचा मृत्युदर २.३ टक्के आहे. अक्कलकुवा तालुक्यात एक हजार १२१ जण कोरोनाबाधित आढळून आले असून २२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर १.९६ इतका आहे. तर शहादा तालुक्यात ११ हजार ६४२ जण कोरोनाबाधित आढळून आले असून १९३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर हा १.६५ टक्के इतका आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यात उपचार घेणारे आणि मृत्यू झालेल्या परजिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्युदर हा सर्व तालुक्यांच्या तुलनेत अधिक अर्थात तब्बल ६.४६ टक्के इतका आहे. जिल्हाबाहेरील १, १४४ जण बाधित झाले होते तर ७४ जणांचा मृत्यू झाला होता. सद्य:स्थितीत जिल्हाबाहेरील २०४ जण जिल्ह्यातील शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत.