शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित व भटक्या जाती, विमुक्त जमातीतील विद्यार्थिनींचा भत्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील तब्बल ३९ हजार विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता यंदा बंद करण्यात आला आहे. शाळा बंद असल्याने हा निर्णय ...

नंदुरबार : जिल्ह्यातील तब्बल ३९ हजार विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता यंदा बंद करण्यात आला आहे. शाळा बंद असल्याने हा निर्णय घेतला गेल्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात या विद्यार्थिनींना थोडाफार आधार मिळू शकला असता तो देखील हिरावला गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थिनींना दरवर्षी उपस्थिती भत्ता दिला जात असतो. दिवसाला एक रुपया याप्रमाणे वर्षाला २२० रुपये भत्ता दिला जात होता. यावर्षी मात्र कोरोनाचे कारण सांगून हा भत्ता बंद करण्यात आल्याच्या सूचना शिक्षण विभागाला मिळाल्या आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना मिळणारा थोडाफार आर्थिक आधार देखील बंद झाला आहे. कोरोनाच्या काळात तरी बंद केला गेला नव्हता पाहिजे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील तब्बल ३९ हजार विद्यार्थिनींना बसणार आहे. दरवर्षी साधारणत: ३६ ते ४० हजार विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेत असतात. सर्वच अर्थात ८० टक्के विद्यार्थिनी या साधारण कुटुंबातील असतात. त्यामुळे त्यांना या भत्त्याचा बऱ्यापैकी लाभ होत असतो. या निर्णयामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

दिवसाला एक रुपया तोही केला बंद...

n महागाईच्या जमान्यातही जुन्याच निर्णयाप्रमाणे एक रुपया भत्ता दिला जात आहे. त्यामुळे एकप्रकारे शासन अशा विद्यार्थिनींची थट्टाच करीत आहे.

n दिवसाला एक रुपया आणि वर्षाला केवळ २२० रुपये यात विद्यार्थ्यांचे कोणते शालेय साहित्य खरेदी होईल याबाबत आश्चर्य व्यक्त होते. असे असले तरी विद्यार्थिनीच्या कुटुंबाला तो एक आधार समजला जात होता.

कोरोना काळात विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता बंद करणे योग्य नाही. मुळात अशा महागाईच्या काळात एक रुपया भत्ता देणे म्हणजे मजाक करणे होय. त्यामुळे किमान पाच रुपये दिवसाला करावा, अशी मागणी आहे. भटके विमुक्त हक्क परिषदेतर्फे याबाबत मागणी लावून धरणार आहोत. शिवाय शिक्षक परिषदेनेही आवाज उठविला आहे.

-पुरुषोत्तम काळे, प्रदेश मुख्य संघटक,भटके विमुक्त हक्क परिषद.