शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

जिल्हावासीयांचे सर्व मार्ग खड्ड्यातूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महामार्गाची कामे रखडल्याने आणि नव्याने निविदाही निघत नसल्यामुळे जिल्हावासीयांना सर्वच प्रमुख मार्गावरून खड्डयांमधून प्रवास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महामार्गाची कामे रखडल्याने आणि नव्याने निविदाही निघत नसल्यामुळे जिल्हावासीयांना सर्वच प्रमुख मार्गावरून खड्डयांमधून प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघातांची मालिका सुरू असून अनेकांना जायबंदी व्हावे लागत आहे तर काहींना जीव गमवावा लागत आहे. चारही महामार्ग ‘नही’कडे वर्ग असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरूस्तीलाही अडचणी येत असल्याची स्थिती आहे.अंकलेश्वर-बºहाणपूर, अमरावती-सुरत, शेवाळी-नेत्रंग, विसरवाडी-सेंधवा हे चार महामार्ग ‘नही’कडे अर्थात राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. या महामार्गांपैकी दोन महामार्गांचे चौपदीरीकरण तर दोन महामार्ग हे दहा मिटरचे तर त्यांचा काही भाग हा चौपदरीकरण होणार आहे. या महामार्गाच्या कामांच्या निविदा विविध टप्प्यांवर अडकल्या आहेत. परिणामी महामार्गांची दुरुस्तीही होत नाही आणि कामही सुरू होत नसल्याची स्थिती आहे.बºहाणपूर-अंकलेश्वर महामार्गहा महामार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो. त्याची लांबी जिल्ह्यात ९२ किलोमिटर इतकी आहे. शहादा, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातून जाणारा हा महामार्ग मध्यप्रदेश, महाराष्टÑ व गुजरात राज्यांना जोडतो. असे असतांनाही त्याच्या चौपदरीकरणाबाबत चालढकलपणा सुरू आहे. पूर्वी आंतरराज्य महामार्ग होता. आता तो राष्टÑीय महामार्ग क्रमांक ७५३ बी असा झाला आहे. महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्यामुळे त्याच्या दुरूस्तीकडे गेल्या तीन वर्षांपासून पुर्णत: दुर्लक्ष करण्यात आले आहे.परिणामी ९२ किलोमिटरच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शहादा ते प्रकाशा दरम्यान या महामार्गाला विसरवाडी-सेंधवा महामार्ग जोडला जात असल्यामुळे काही ठिकाणी दहा मिटर रोड होऊन त्याचे काँक्रीटीकरण झाले आहे. तेवढा काय तो दिलासा आहे.एक ते दीड मिटरचे खड्डेथेट शहादा तालुक्याच्या हद्दीपासून ते गव्हाळीपर्यंत या महामार्गावर एक ते दीड मिटर व्यासाचे व तेवढेच खोल खड्डे पडले आहेत. साईट पट्टयांची अवस्था खराब झाली आहे. सलग अर्धा ते एक किलोमिटरचा चांगला रस्ता दाखवा आणि बक्षीस मिळवा असे कोणी आव्हान दिल्यास ते स्विकारणारा देखील कुणी सापडणार नाही. खड्डे चुकवितांना मोठ्या प्रमाणावर अपघात देखील झाले आहेत. शिवाय खड्डयांमुळे वाहनांचे नुकसान देखील होत आहे.दुरुस्तीचे प्रावधान नाहीमहामार्ग दुरूस्तीचे प्रावधान नाही. जे रस्ते चौपदरीकरण होणार आहेत त्यांच्या देखभाल आणि दुरूस्तीवर खर्च करू नये असे महामार्ग प्राधिकरणाचे धोरण आहे. त्यामुळेच या महामार्गांची सध्या वाट लागली असून त्यांच्या कामाला सुरूवात होत नाही तोपर्यंत वाहनचालकांना या नरक यातना भोगाव्याच लागतील यात दुमत नाही.कोळदा-खेतियाही रखडलाअंकलेश्वर- बºहाणपूर महामार्गाला जोडून जाणारा कोळदा-खेतिया रस्त्याचे काम काही ठिकाणी पुर्ण झाले आहे तर काही ठिकाणी रखडले आहे.विशेषत: प्रकाशा ते डामरखेडा दरम्यानच्या रखडलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनचालकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.जिल्ह्यातून चार मुख्य आणि तीन महामार्ग जाणार असल्याच्या घोषणा गेल्या तीन वर्षांपासून केल्या जात आहेत. परंतु एक ना भाराभार चिंध्या अशी स्थिती आहे. एकाही महामार्गाचे धड काम सुरू होत नसल्याची स्थिती आहे. केवळ वेळ मारून नेण्यासाठी घोषणा होतात आणि नंतर जिल्हावासीयांच्या तोंडाला पाणे पुसली जात असल्याचे प्रकार सध्या लोकप्रतिनिधींकडून सुरू आहेत.जिल्हावासीयांच्या जिवाचे मोल ना लोकप्रतिनधींना ना अधिकाऱ्यांना असल्याचे दिसून येत आहे. जिल्हावासीयांच्या संवेदना देखील बोथट झाल्या आहेत. रस्त्यांची एवढी भयंकर अवस्था असतांना एकही मोठे आंदोलन गेल्या तीन वर्षात झाल्याचे चित्र नाही.