शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

‘रेमडेसिविर’बाबत सर्वपक्षीयांचा जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे शहरी व ग्रामीण भागातील सामान्य व गरीब जनतेला उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची ...

नंदुरबार : जिल्ह्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे शहरी व ग्रामीण भागातील सामान्य व गरीब जनतेला उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची नितांत आवश्यकता असून ती उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पालकमंत्री के.सी. पाडवी यांच्याकडे व सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.

जिल्हा रुग्णालयात अडीच हजार रेमडेसिविर इंजेक्शनचे डोस शिल्लक असतानाही ते जिल्ह्यातील खासगी दवाखान्यात दाखल रुग्णांसाठी दिले जात नसल्याने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यास सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकारी असल्याचा आरोप खासदार डॉ.हीना गावीत व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शहरात विविध खासगी दवाखान्यात दाखल ४९८ रुग्णांना, शहादा येथे ११५ तर नवापूर येथे १०८ रुग्णांना रेमडेसिविर हे इंजेक्शन लागणार आहेत. मात्र जिल्हा रुग्णालयात साठा उपलब्ध असतानाही जिल्हाधिकारी ते रुग्णांना देत नाहीत व तसा आदेश करत नाहीत. राज्य शासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, त्या-त्या दवाखान्याची मागणी योग्य त्या नमुन्यामध्ये मागून त्यांना ती उपलब्ध करून द्यावेत, मात्र तसे होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी कालच फेसबूक लाईव्हच्या माध्यमाने सांगितले आहे की, ज्या रुग्णांचा सिटी स्कोर पंचवीसपैकी २० असेल तरच रेमडेसिविर द्यावे असे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी रेफरन्स म्हणून इंग्लंडच्या एका जर्नलचा संदर्भ दिला आहे. मात्र आईसीएमआरच्या गाइड-लाइन्सनुसार कोविड रुग्णाची लक्षणे कमी करण्यासाठी पहिल्या १० दिवसात रेमडेसिविर दिले पाहिजे. तसेच सिटीस्कोर आठपेक्षा जास्त असेल तर रेमडिसिवर दिले पाहिजे, असेही म्हटले आहे. शहरात उपचार घेणारे सर्व रुग्ण एमडी डॉक्टरच्या देखरेखीखालीच उपचार घेत आहेत. त्याशिवाय या दवाखान्यांना मान्यता दिली जात नाही. देशात व राज्यात सर्व डॉक्टर आयसीएमआरचा प्रोटॉकल मानत आहेत. त्याप्रमाणेच उपचार करत आहेत. नाकी इंग्लंडच्या जर्नलप्रमाणे आपल्या देशात उपचार चालू आहेत, मात्र आपले जिल्हाधिकारी काहीतरी वेगळी माहिती आत्मसात करून तो प्रोटोकॉलचा अवलंब करीत आहेत. या आयसीएमआरच्या गाईडलाईनची कॉपी मी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहे.

आज तीन दिवस झाले तरी जे रुग्णालय त्यांच्याकडे दाखल रुग्णांसाठी रेमडेसिविर मागत आहेत त्यांना ते दिले जात नाही त्याबाबतचे पत्र शासनाने काढूनही त्यांचेही पालन जिल्हाधिकारी करत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणून आम्ही सर्वपक्षीयांनी पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवींकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. मात्र तरीदेखील जिल्हाधिकारी वेगळी थेअरी वापरून ते देत नसल्याने या रुग्णांना रुग्णालयात मरायला सोडून दिले आहे. जिल्ह्याचा मृत्युदर वाढत आहे मग जिल्हा रुग्णालयातील २५०० इंजेक्शन कोणासाठी ठेवले आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्य शासनाने व पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन जिल्हाधिकारी करीत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.