शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

‘रेमडेसिविर’बाबत सर्वपक्षीयांचा जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे शहरी व ग्रामीण भागातील सामान्य व गरीब जनतेला उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची ...

नंदुरबार : जिल्ह्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे शहरी व ग्रामीण भागातील सामान्य व गरीब जनतेला उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची नितांत आवश्यकता असून ती उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी पालकमंत्री के.सी. पाडवी यांच्याकडे व सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.

जिल्हा रुग्णालयात अडीच हजार रेमडेसिविर इंजेक्शनचे डोस शिल्लक असतानाही ते जिल्ह्यातील खासगी दवाखान्यात दाखल रुग्णांसाठी दिले जात नसल्याने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यास सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकारी असल्याचा आरोप खासदार डॉ.हीना गावीत व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शहरात विविध खासगी दवाखान्यात दाखल ४९८ रुग्णांना, शहादा येथे ११५ तर नवापूर येथे १०८ रुग्णांना रेमडेसिविर हे इंजेक्शन लागणार आहेत. मात्र जिल्हा रुग्णालयात साठा उपलब्ध असतानाही जिल्हाधिकारी ते रुग्णांना देत नाहीत व तसा आदेश करत नाहीत. राज्य शासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, त्या-त्या दवाखान्याची मागणी योग्य त्या नमुन्यामध्ये मागून त्यांना ती उपलब्ध करून द्यावेत, मात्र तसे होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी कालच फेसबूक लाईव्हच्या माध्यमाने सांगितले आहे की, ज्या रुग्णांचा सिटी स्कोर पंचवीसपैकी २० असेल तरच रेमडेसिविर द्यावे असे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी रेफरन्स म्हणून इंग्लंडच्या एका जर्नलचा संदर्भ दिला आहे. मात्र आईसीएमआरच्या गाइड-लाइन्सनुसार कोविड रुग्णाची लक्षणे कमी करण्यासाठी पहिल्या १० दिवसात रेमडेसिविर दिले पाहिजे. तसेच सिटीस्कोर आठपेक्षा जास्त असेल तर रेमडिसिवर दिले पाहिजे, असेही म्हटले आहे. शहरात उपचार घेणारे सर्व रुग्ण एमडी डॉक्टरच्या देखरेखीखालीच उपचार घेत आहेत. त्याशिवाय या दवाखान्यांना मान्यता दिली जात नाही. देशात व राज्यात सर्व डॉक्टर आयसीएमआरचा प्रोटॉकल मानत आहेत. त्याप्रमाणेच उपचार करत आहेत. नाकी इंग्लंडच्या जर्नलप्रमाणे आपल्या देशात उपचार चालू आहेत, मात्र आपले जिल्हाधिकारी काहीतरी वेगळी माहिती आत्मसात करून तो प्रोटोकॉलचा अवलंब करीत आहेत. या आयसीएमआरच्या गाईडलाईनची कॉपी मी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहे.

आज तीन दिवस झाले तरी जे रुग्णालय त्यांच्याकडे दाखल रुग्णांसाठी रेमडेसिविर मागत आहेत त्यांना ते दिले जात नाही त्याबाबतचे पत्र शासनाने काढूनही त्यांचेही पालन जिल्हाधिकारी करत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणून आम्ही सर्वपक्षीयांनी पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवींकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. मात्र तरीदेखील जिल्हाधिकारी वेगळी थेअरी वापरून ते देत नसल्याने या रुग्णांना रुग्णालयात मरायला सोडून दिले आहे. जिल्ह्याचा मृत्युदर वाढत आहे मग जिल्हा रुग्णालयातील २५०० इंजेक्शन कोणासाठी ठेवले आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्य शासनाने व पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन जिल्हाधिकारी करीत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.