निवेदनात म्हटले की, नंदुरबार जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार १ ते १५ एप्रिलपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊन काळात वैद्यकीय सेवा, मेडिकल, किराणा, भाजीपाला यांच्यासह ठराविक आस्थापना यांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू करण्याचे सुधारित आदेश काढले आहेत. मात्र, नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात रोजगाराचे अन्य साधन नसल्याने सर्वांचा उदरनिर्वाह हा रोजंदारीवर होतो. जिल्हा प्रशासनाने काही विशिष्ट प्रतिष्ठाने उघडून बाकीची प्रतिष्ठाने बंद या आदेशामुळे अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत घोषित पूर्ण लॉकडाऊन नंतर रद्द करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर नंदुरबार जिल्ह्यात सर्व प्रतिष्ठाने, व्यवसाय यांना दुपारी एक वाजेपर्यंत सरसकट मुभा द्यावी. ३ एप्रिलपर्यंत प्रशासनाने मागणी मान्य न केल्यास ४ एप्रिलपासून मागणी मान्य होईपर्यंत, हिंदू सेवा साहाय्य समितीचे धर्मसेवक डॉ. नरेंद्र पाटील आमरण उपोषण करतील, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. हे निवेदन मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, नंदुरबारचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदनावर डॉ. नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, सुमित परदेशी, कपिल चौधरी, पंकज डाबी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सर्व व्यवसायांना दुपारी एक वाजेपर्यंत परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:27 IST