शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा आगारास दीड कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दुर्गम भागातील रस्ते तुटले. परिणामी अक्कलकुवा आगारामार्फत त्या भागातील 40 बसफे:या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दुर्गम भागातील रस्ते तुटले. परिणामी अक्कलकुवा आगारामार्फत त्या भागातील 40 बसफे:या बंद  करण्यात आल्या. तीन महिन्यांपासून बस बंदच आहे, यातून आगाराचे दीड कोटींचे नुकसान झाले आहे.धडगाव व मोलगी परिसरातील वाहतुक सुविधेत प्रामुख्याने अक्कलकुवा आगाराच्याच बसेस अधिक होत्या. या आगारामार्फत एका दिवसात मोलगी, धडगाव, जमाना, भगदरी, बिजरीगव्हाण, कोठली व असली यासह विविध ठिकाणी बस सोडण्यात येत होत्या. परंतु ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे देवगोई घाटात तब्बल 13 ठिकाणी संपूर्ण रस्ता तुटला व दरडी कोसळल्या. त्यामुळे अक्कलकुवा ते मोलगी भागातील वाहतुक सेवा बंद करण्यात आली होती. त्यात परिवहन महामंडळाच्या बसेसचा देखील समावेश होता. सद्यस्थितीत काही अंशी रस्ता दुरुस्त झाला असला तरी बसच्या वाहतुकीसाठी हा रस्ता योग्य नाही. त्यामुळे अक्कलकुवा आगाराच्या या भागातील 40 बसफे:या तीन महिन्यांपासून बंदच आहेत. आगाराला एका बसफेरीतून सरासरी चार हजाराचे उत्पन्न मिळत होते. तर 40 बसफेरीच्या माध्यमातून एक लाख 60 हजाराचे दैनंदिन नुकसान होत आहे. बसफे:या बंद होऊन आज तीन महिन्याच्या कालावधी होत आला आहे. त्यामुळे या कालावधीत आगाराचे दीड   कोटींचे नुकसान झाल्याचे अक्कलकुवा आगार व्यवस्थापनामार्फत सांगण्यात आले. हा रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असले तरी बस सुरु करण्यासाठी कदाचित वर्षही उलटू शकते. त्यामुळे पुन्हा नुकसानीचा टक्का वाढण्याची शक्यता नाकारता येत आहे. दिवाळीच्या हंगामात प्रवाशांची संख्या वाढते, वाढत्या गर्दीमुळे सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या कालावधीत प्रत्येक प्रवाशाला नियोजित ठिकाणी सुखरुप पोहोचता यावे, यासाठी प्रत्येक एसटी आगारामार्फत ज्यादा बसेस सोडल्या जातात. त्यातून त्या-त्या आगाराच्या उत्पन्नात वाढ होते. दिवाळीच्या हंगामात अक्कलकुवा आगाराला उत्पन्न मिळत असले तरी दिवाळीनिमित्त भरणारी एकमेव अस्तंबा यात्रेला जाणा:या भाविकांसाठी आगाराला बसेस सोडता आल्या नाही. त्यामुळे आगाराला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. 

दिवाळीनिमित्त धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथे एकमेव यात्रा भरत असते. एकमेव यात्रेमुळे अस्तंबा येथे जाणा:या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे अक्कलकुवा आगारामार्फत या यात्रेसाठीच दरवर्षी वाढीव बसेस सोडल्या जातात. त्यातून आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ होते, शिवाय भाविकांची देखील सोय होत असते. परंतु यंदा रस्ताच खराब झाल्यामुळे अस्तंबा भागातील बसफे:या बंद करण्यात आल्या असून यातून मिळणारे मोठे उत्पन्नही आगाराला सहन करावे लागत आहे.