शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आयो लाल, झुलेलालचा होणार जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 11:25 IST

नंदुरबार : शनिवारी असलेल्या सिंधी बांधवाच्या ‘चेट्री चंड’ उत्सवानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे़ सिंधी बांधवांसाठी अतिशय मंगल ...

नंदुरबार : शनिवारी असलेल्या सिंधी बांधवाच्या ‘चेट्री चंड’ उत्सवानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे़ सिंधी बांधवांसाठी अतिशय मंगल असलेल्या या सणाची जय्यत तयारी करण्यात आली असून यानिमित्त भगवान झुलेलाल यांचा जयघोष करीत सकाळी झेंडावंदनासह विविध धार्मिक कार्यांनी हा सोहळा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जेष्ठ समाज बांधव अशोक वलेचा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़सिंधी बांधवांसाठी चेट्री चंड हा सण महत्वाचा मानला जात असतो़ देशातील कान्याकोपऱ्यातील सिंधी बांधवांकडून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जात असतो़ भगवान झुलेलाल हे सिंधी बांधवांचे इष्टदैवत असून पाण्याच्या मत्स्यावर त्यांची सवारी असते़ झुलेलाल यांना जलदेवता, वरुणदेवता इ़ नावाने संबोधतात़ प्रतिवर्षी चेट्री चंड सणानिमित्त भगवान झुलेलाल महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात येत असते़ यासाठी एक विशिष्ठ प्रकारचा लाकडी किंवा लोखंडी पिंजरा तयार केला जात असतो़ त्या पिंजऱ्यात झुलेलाल महाराज यांची मुर्ती ठेवली जात असते़ मुर्तीसमोर पिठाचा पाचवाती दिवा लावतात़ त्याला ‘बहराणो’ असे म्हटले जात असते़ शहरभर बहराणोची मिरवणूक काढली जाते़ पालखीबरोबरच सिंधी बांधव नाचत-गात उत्साहाने टिपºया खेळत नदी किंवा तलावाकाठी येतात़ या नृत्याला ‘छेज’ असे म्हटले जाते़ नदीकाठावर आल्यावर भगवान झुलेलाल यांच्या मुर्तीची पुजा केली जाते़ पुजेनंतर प्रज्वलित ज्योत प्रवाहित केली जाते़ त्या वेळी आयो लाल, झुलेलाल असा जयघोष करण्यात येतो़नववर्षाची सुरुवातचेट्री चंड सणानिमित्त सिंधी बांधव सकाळी स्रानसंध्या आटोपून नवे कपडे परिधान करीत असतात़ समाजात उद्योग-व्यवसायाला अधिक प्राधान्य असल्याने या सणानिमित्त सिंधी बांधवांकडून आपआपल्या आस्थापनांची पुजा-अर्चा करण्यात येत असते़ काहींकडून धार्मिक पुजा-पाठदेखील करण्यात येत असतात़ भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेची पुजा करण्यात येत असते़ या सणापासून सिंधी बांधवांचीही नवीन वर्षाची सुरुवात होत असते़ येणारे नवीन वर्ष सुखसमृध्दीचे जावे म्हणून सिंधी बांधव मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी पार पाडत असतात़ बºयाच सिंधी बांधवांकडून यानिमित्त उपवासही करण्यात येत असतो़ चेट्री चंड सणानिमित्त भाविकांकडून गोडभातासह अनेक गोडधोड पदार्थ करुन त्याचा नैवेद्या भगवान झुलेलाल यांना दाखविण्यात येत असतो़ एका अख्यायिकेनुसार सायंकाळी सिंधी बांधव नदी, तलाव काठी जात जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी पाण्यात तांदूळ व साखर टाकत असत़ त्याला ‘अखो’ असे म्हणले जाते़ एकवाती ज्योत प्रल्वलित करुन टाळ्या वाजवत एका विशिष्ट प्रकारचे काव्यगायन केले जाते़ तलाव, नदी नसेल तर एखाद्या पाण्याच्या स्त्रोताजवळ बसून विधी पूर्ण करण्यात येत असे़ चेट्री चंड म्हणजे सिंध्यत दिवस म्हणूनदेखील ओळखला जात असतो़ हा दिवस प्रेम, सलोखा व एकतेचा दिवस समजला जात असतो़ या दिवशी सिंधी बांधव, सिंधी लोकगीते, सिंधी नृत्य, सिंधी कविता गायन करुन आपल्या भाषेत साहित्य, संस्कृतीला सतत सजीव ठेवण्याचा संकल्प करीत असतात़