शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

आयो लाल, झुलेलालचा होणार जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 11:25 IST

नंदुरबार : शनिवारी असलेल्या सिंधी बांधवाच्या ‘चेट्री चंड’ उत्सवानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे़ सिंधी बांधवांसाठी अतिशय मंगल ...

नंदुरबार : शनिवारी असलेल्या सिंधी बांधवाच्या ‘चेट्री चंड’ उत्सवानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे़ सिंधी बांधवांसाठी अतिशय मंगल असलेल्या या सणाची जय्यत तयारी करण्यात आली असून यानिमित्त भगवान झुलेलाल यांचा जयघोष करीत सकाळी झेंडावंदनासह विविध धार्मिक कार्यांनी हा सोहळा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जेष्ठ समाज बांधव अशोक वलेचा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़सिंधी बांधवांसाठी चेट्री चंड हा सण महत्वाचा मानला जात असतो़ देशातील कान्याकोपऱ्यातील सिंधी बांधवांकडून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जात असतो़ भगवान झुलेलाल हे सिंधी बांधवांचे इष्टदैवत असून पाण्याच्या मत्स्यावर त्यांची सवारी असते़ झुलेलाल यांना जलदेवता, वरुणदेवता इ़ नावाने संबोधतात़ प्रतिवर्षी चेट्री चंड सणानिमित्त भगवान झुलेलाल महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात येत असते़ यासाठी एक विशिष्ठ प्रकारचा लाकडी किंवा लोखंडी पिंजरा तयार केला जात असतो़ त्या पिंजऱ्यात झुलेलाल महाराज यांची मुर्ती ठेवली जात असते़ मुर्तीसमोर पिठाचा पाचवाती दिवा लावतात़ त्याला ‘बहराणो’ असे म्हटले जात असते़ शहरभर बहराणोची मिरवणूक काढली जाते़ पालखीबरोबरच सिंधी बांधव नाचत-गात उत्साहाने टिपºया खेळत नदी किंवा तलावाकाठी येतात़ या नृत्याला ‘छेज’ असे म्हटले जाते़ नदीकाठावर आल्यावर भगवान झुलेलाल यांच्या मुर्तीची पुजा केली जाते़ पुजेनंतर प्रज्वलित ज्योत प्रवाहित केली जाते़ त्या वेळी आयो लाल, झुलेलाल असा जयघोष करण्यात येतो़नववर्षाची सुरुवातचेट्री चंड सणानिमित्त सिंधी बांधव सकाळी स्रानसंध्या आटोपून नवे कपडे परिधान करीत असतात़ समाजात उद्योग-व्यवसायाला अधिक प्राधान्य असल्याने या सणानिमित्त सिंधी बांधवांकडून आपआपल्या आस्थापनांची पुजा-अर्चा करण्यात येत असते़ काहींकडून धार्मिक पुजा-पाठदेखील करण्यात येत असतात़ भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेची पुजा करण्यात येत असते़ या सणापासून सिंधी बांधवांचीही नवीन वर्षाची सुरुवात होत असते़ येणारे नवीन वर्ष सुखसमृध्दीचे जावे म्हणून सिंधी बांधव मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी पार पाडत असतात़ बºयाच सिंधी बांधवांकडून यानिमित्त उपवासही करण्यात येत असतो़ चेट्री चंड सणानिमित्त भाविकांकडून गोडभातासह अनेक गोडधोड पदार्थ करुन त्याचा नैवेद्या भगवान झुलेलाल यांना दाखविण्यात येत असतो़ एका अख्यायिकेनुसार सायंकाळी सिंधी बांधव नदी, तलाव काठी जात जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी पाण्यात तांदूळ व साखर टाकत असत़ त्याला ‘अखो’ असे म्हणले जाते़ एकवाती ज्योत प्रल्वलित करुन टाळ्या वाजवत एका विशिष्ट प्रकारचे काव्यगायन केले जाते़ तलाव, नदी नसेल तर एखाद्या पाण्याच्या स्त्रोताजवळ बसून विधी पूर्ण करण्यात येत असे़ चेट्री चंड म्हणजे सिंध्यत दिवस म्हणूनदेखील ओळखला जात असतो़ हा दिवस प्रेम, सलोखा व एकतेचा दिवस समजला जात असतो़ या दिवशी सिंधी बांधव, सिंधी लोकगीते, सिंधी नृत्य, सिंधी कविता गायन करुन आपल्या भाषेत साहित्य, संस्कृतीला सतत सजीव ठेवण्याचा संकल्प करीत असतात़