शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ऐन पावसाळ्यात कर्मचारी बदल्यांचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

नंदुरबार : ऐन पावसाळ्यात जिल्हा परिषदेत बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा ...

नंदुरबार : ऐन पावसाळ्यात जिल्हा परिषदेत बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. १५ टक्के अंतर्गत सेवा ज्येष्ठतेनुसार या बदल्या होणार आहेत. समुपदेशन शिबिरात पहिल्या दिवशी पाच विभागांच्या बदल्यांसाठी शिबिर घेण्यात आले.

कोरोनामुळे गेल्या वर्षी बदल्या झाल्या नव्हत्या. या वर्षी देखील होणार नाहीत अशीच स्थिती असतांना शासनाने आदेश काढून १५ टक्के बदल्या करण्यास सांगितले. ग्राम विकास विभागाने याबाबत १४ जुलै रोजी आदेश पारित केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने लागलीच प्रक्रिया सुरू करून समुपदेशन शिबिरेही घेण्यास सुरुवात केली आहे.

बदल्यांमध्ये केवळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत. या बदल्या राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. यंदा शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शिक्षकांच्या बदल्याही रखडणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे दुर्गम भागातील बदलीपात्र शिक्षकांना नाहक दोन वर्षांपासून त्या भागात काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे शिक्षकांच्याही ऑनलाइन बदल्यांचे सत्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

१५ टक्के बदल्यांमध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागांचा समावेश आहे. त्यात अर्थ विभाग, बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, यांत्रिकी विभाग, महिला व बाल विकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख, पशुसंवर्धन, कृृषी, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग या विभागांचा समावेश आहे.

शासनाच्या आदेशानंतर लागलीच सेवाज्येष्ठेता यादी तयार करण्यात आली. त्यानंतर बदलीपात्र कर्मचाऱ्यांना शिबिरात बोलविण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यानुसार पहिल्या दिवशी अर्थ विभाग, बांधकाम विभाग, लघुसिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा आणि यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन झाले व बदल्या करून लागलीच आदेश पारित करण्यात आले.

समुपदेश शिबिरासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, सभापती निर्मला राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्यासह इतर अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून लागलीच त्यांना स्क्रीनवर रिक्त जागा दाखविण्यात येत होत्या. त्यांच्या पसंतीक्रमानुसार जागा रिक्त असल्यास लागलीच त्या ठिकाणी त्यांना नियुक्ती देण्यात येऊन बदली ऑर्डरचीही प्रक्रिया करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.