शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात कर्मचारी बदल्यांचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

नंदुरबार : ऐन पावसाळ्यात जिल्हा परिषदेत बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा ...

नंदुरबार : ऐन पावसाळ्यात जिल्हा परिषदेत बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. १५ टक्के अंतर्गत सेवा ज्येष्ठतेनुसार या बदल्या होणार आहेत. समुपदेशन शिबिरात पहिल्या दिवशी पाच विभागांच्या बदल्यांसाठी शिबिर घेण्यात आले.

कोरोनामुळे गेल्या वर्षी बदल्या झाल्या नव्हत्या. या वर्षी देखील होणार नाहीत अशीच स्थिती असतांना शासनाने आदेश काढून १५ टक्के बदल्या करण्यास सांगितले. ग्राम विकास विभागाने याबाबत १४ जुलै रोजी आदेश पारित केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने लागलीच प्रक्रिया सुरू करून समुपदेशन शिबिरेही घेण्यास सुरुवात केली आहे.

बदल्यांमध्ये केवळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत. या बदल्या राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. यंदा शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शिक्षकांच्या बदल्याही रखडणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे दुर्गम भागातील बदलीपात्र शिक्षकांना नाहक दोन वर्षांपासून त्या भागात काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे शिक्षकांच्याही ऑनलाइन बदल्यांचे सत्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

१५ टक्के बदल्यांमध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागांचा समावेश आहे. त्यात अर्थ विभाग, बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, यांत्रिकी विभाग, महिला व बाल विकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख, पशुसंवर्धन, कृृषी, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग या विभागांचा समावेश आहे.

शासनाच्या आदेशानंतर लागलीच सेवाज्येष्ठेता यादी तयार करण्यात आली. त्यानंतर बदलीपात्र कर्मचाऱ्यांना शिबिरात बोलविण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यानुसार पहिल्या दिवशी अर्थ विभाग, बांधकाम विभाग, लघुसिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा आणि यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन झाले व बदल्या करून लागलीच आदेश पारित करण्यात आले.

समुपदेश शिबिरासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, सभापती निर्मला राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्यासह इतर अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून लागलीच त्यांना स्क्रीनवर रिक्त जागा दाखविण्यात येत होत्या. त्यांच्या पसंतीक्रमानुसार जागा रिक्त असल्यास लागलीच त्या ठिकाणी त्यांना नियुक्ती देण्यात येऊन बदली ऑर्डरचीही प्रक्रिया करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.