शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

वनक्षेत्रात साडेचार लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

तळोदा : येथील मेवासी वनविभागाकडून पुढील महिन्यात घेण्यात येणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेसाठी आपल्या वनक्षेत्रात साडेचार लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट ...

तळोदा : येथील मेवासी वनविभागाकडून पुढील महिन्यात घेण्यात येणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेसाठी आपल्या वनक्षेत्रात साडेचार लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्याचे नियोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या़करिता १२ नर्सऱ्या उभारण्यात आलेल्या आहेत. येथील मेवासी वनविभागाकडून दरवर्षी आपल्या वनक्षेत्रात पुढील महिन्यात म्हणजे १ ते १५ जुलैदरम्यान वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाते. यंदाही या विभागाने तळोदा, अक्कलकुवा, खापर, मोलगी, काठी व वडफळी अशा सहा रेंजमध्ये साधारण चार लाख ५४ हजार ३०० विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. यात राज्य योजनेतून १२० हेक्टरवर दोन लाख ५० हजार ३०० तर जिल्हा योजनेतून १३५ हेक्टरवर दोन लाख पाच हजार अशा नियोजनाचा समावेश आहे.

वृक्षलागवड मोहिमेकरिता यंत्रणांनी उन्हाळ्यातच रोजगार हमी योजनेतून मजुरांमार्फत वनक्षेत्रात खड्डे खोदले आहेत. त्यामुळे वनविभाग वृक्षलागवडीच्या जय्यत तयारीत आहे. यासाठी सहाही रेंजमध्ये १२ नर्सऱ्या उभारण्यात आलेल्या आहेत. मुख्यतः बांबू, आवळा, चिंच, निंब, बेहडा ही रोपे मोठ्या प्रमाणावर लावण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे, यंदा वन औषधी व आदिवासींना रोजगारासाठी महत्त्वाची असलेली महू फुलाचे रोपेही यंदा लावण्यात येणार आहे. गेल्या वर्षी या वृक्षाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होता. तथापि वृक्ष लागवड मोहिमेकरिता लागणारी आर्थिक नियोजनाबाबत दोन रेंज वगळता इतरांनी अजून, निधीचा प्रस्ताव मेवसी वन कार्यालयाकडे सादर केलेला नाही. त्यामुळे निधीची पुढील कार्यवाही वरिष्ठांकडे करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित वन क्षेत्रपाल यांच्या उदासीनतेबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.

यंदाही शासनाचा वन महोत्सव

गेल्या वर्षी शासनाने वन विभागामार्फत वन महोत्सव साजरा केला होता. त्याला चांगला प्रतिसाद नागरिकांकडून मिळाल्याने यंदाही शासनातर्फे १५ जून ते ३० सप्टेंबर या दरम्यान वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रत्येक रस्त्याचा दुतर्फा, मोकळ्या जागा, शेताच्या बांधावर, विविध कार्यालयांच्या आवारात वृक्षारोपण करण्याचे सूचित केले आहे. या महोत्सवात शासकीय, निमशासकीय यंत्रणा, आस्थापना, समाजसेवी संस्था यांच्या सहभाग घ्यावा. त्यांना वृक्षलागवडीकरिता सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्याची सूचना देण्यात आली आहे. शासन वृक्षलागवड मोहीम राबवून निसर्ग संपत्ती वाढविण्यावर प्रामाणिक, ठोस प्रयत्न करीत असले, तरी त्यातील किती प्रत्यक्ष वाढलेत, याचेही ऑडिट झाले पाहिजे, तरच योजनेचा उद्देश सफल होईल, शिवाय त्यावर केलेला खर्चही उपयोगी ठरेल, अशी वृक्षप्रेमी जनतेची अपेक्षा आहे.

तळोदा मेवासी वनविभागाच्या सहा वनक्षेत्रात यंदा साधारण साडेचार लाख वेगवेगळ्या प्रजातीची रोपे लावण्याचे नियोजन आहे. त्यासाठी नर्सरीमधील रोपेही तयार आहेत.

- पी.के. बागुल, उप वनसंरक्षक, मेवासी वन कार्यालय, तळोदा.