शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

वीज जोडणीअभावी शेती सिंचनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधीत झालेल्या तालुक्यातील विस्थापीत १५० विस्थापित शेतकऱ्यांनी येथील वीज वितरण कंपनीकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधीत झालेल्या तालुक्यातील विस्थापीत १५० विस्थापित शेतकऱ्यांनी येथील वीज वितरण कंपनीकडे गेल्या दीड-दोन वर्षापासून डिमांडची मागणी केली आहे. मात्र अजूनही त्यांना डिमांड उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे त्यांना वीज जोडणीअभावी सिंचनाच्या सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन तातडीने डिमांड मिळवून द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.महाकाय सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील कुटुंबांचे तळोदा व शहादा तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांना सिंचनाच्या सुविधेसह नियमानुसार जमिनीही दिल्या आहेत. तथापि, अजूनही तळोदा तालुक्यातील तºहावद, रेवानगर, रोझवा, गोपाळपूर पुनर्वसन वसाहतीतील शेतकºयांना कृषीपंपासाठी लागणारी महावितरणची वीज जोडणी उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे या शेतकºयांना आजही कोरडवाहूच शेती करावी लागत असल्याचे हे शेतकरी सांगतात. वास्तविक यातील बहुसंख्य शेतकºयांनी महावितरणकडे डिमांड नोटसाठी लागणारे कागदपत्रे व रक्कमही भरली आहे. ही रक्कम भरुन साधारण दीड ते दोन वर्षे लोटली आहेत. असे असताना त्यांना आजतागायत संबंधित यंत्रणेने वीज जोडणी दिलेली नाही. त्यासाठी ते सातत्याने वीज वितरण कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. यात शेतकºयांचा वेळ व पैसाही वाया जात आहे. तरीही पदरी निराशाच पडत असल्याची व्यथा विस्थापितांनी बोलून दाखवली आहे. या शेतकºयांच्या सिंचन व्यवस्थेसाठी लागणारा निधी जिल्हा विकास यंत्रणा अर्थात डीपीडीसीने निधीही मंजूर केला आहे. त्याचबरोबर टेंडरची प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदारास कामाचा ठेकाही देण्यात आला आहे. परंतु महावितरणच्या वरिष्ठ प्रशासनाची काम सुरू करण्यास लागणारी परवानगी मिळत नसल्याने काम रखडल्याचे म्हटले जात आहे. वीज जोडणीअभावी तºहावद पुनर्वसन वसाहतीतील काही शेतकºयांचे बोअर केलेले निरुपयोगी ठरत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. या शेतकºयांना शासनाकडून सोलर पंपाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले तरी रोझवा पुनर्वसन परिसरातील शेतकºयांचे बोअर साधारण ३०० ते ३५० फूट खोल आहेत. त्यामुळे एवढ्या खोलवरुन पाणी उपसा सोलरपंप करू शकणार नाही. या शेतकºयांनी सोलर पंपास विरोध केला असून महावितरणचेच कनेक्शन देण्याची मागणी केली आहे.४शेतकºयांनी शहादा उपविभागातील अधिकाºयांबरोबरच तळोदा येथील अधिकाºयांना वीज कनेक्शन देण्यासाठी साकडे घातले आहे. तथापि, त्यांनी नेहमीप्रमाणे वायदाच दिल्याचे बाधीत शेतकºयांनी सांगितले. वास्तविक सिंचन सुविधेसह जमीन देण्याचा कायद्याने प्रकल्पग्रस्त शेतकºयांना अधिकार आहे. प्रशासनाचीही जबाबदारी आहे. मात्र त्यांनीच दुर्लक्ष केल्याचा आरोप बाधीतांनी केला आहे. त्यामुळे महावितरणमधील अधिकाºयांचे फावले आहे. डिमांड नोटबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधितांना सक्त ताकीद द्यावी अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.