शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

आठ दिवसांत नियुक्तीपत्र देण्याचे आश्वासन पत्र मिळाल्याने आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:36 IST

कोठार : तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत रोजंदारी वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षाचे नियुक्ती व मानधन ...

कोठार : तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत रोजंदारी वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षाचे नियुक्ती व मानधन मिळावे, या शैक्षणिक वर्षाची नियुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी तळोदा प्रकल्प कार्यालयात सर्व कर्मचारी सहकुटुंब बिऱ्हाड घेऊन आंदोलनास आले होते. मात्र, आठ दिवसांत नियुक्तपत्र देण्याच्या कार्यवाहीचे आश्वासन प्रकल्प कार्यालयाकडून मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ४२ शासकीय आश्रमशाळा व १७ वसतिगृहामध्ये वर्ग तीन व चारचे रोजंदारी तत्त्वावर सुमारे ७०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ते गेल्या १५ ते २० वर्षांपासून आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये सेवा देत आहेत. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे आश्रमशाळा बंद असल्याने त्यांनादेखील कामावर बोलाविण्यात येत नव्हते. रोजंदारी तत्त्वावर कार्यरत असणारे कर्मचारी कामावर येत नसल्याने त्यांचा रोजगार बुडाला. त्यामुळे आश्रमशाळांमध्ये काम करणारे रोजंदारी कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले होते.

कोविडच्या काळात या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये, उपजीविकेसाठी मानधन अदा करावे, अशी सूचना पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी दिली होती. धुळे व नंदुरबार प्रकल्पांतर्गत रोजंदारी वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना मानधन व नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, तळोदा प्रकल्पांतर्गत रोजंदारी कर्मचाऱ्यांना मानधन व नियुक्ती देण्यात आली नाही. गेल्या कोविड काळातील मानधन अदा करावे व चालू शैक्षणिक वर्षात नियुक्त्या देण्यात याव्यात; याशिवाय अन्य मागण्यांसाठी रोजंदारी कर्मचारी २३ सप्टेंबरपासून तळोदा प्रकल्प कार्यालयात सहकुटुंब बिऱ्हाड आंदोलन करतील, असा इशारा दिला होता. त्यानुसार आजपावेतो मागण्या मान्य न झाल्याने २३ रोजी रोजंदारी वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांनी कुटुंब बिऱ्हाड आंदोलनासाठी दुपारी दोन वाजता प्रकल्प गाठले होते. प्रकल्पाधिकारी डॉ. मैनक घोष यांनी चर्चा करीत आठ दिवसांत रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्याची कार्यवाही करू, असे लेखी पत्र दिल्याने बिऱ्हाड आंदोलक रोजंदारी कर्मचाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन मागे घेतले. आठ दिवसांत नियुक्तीची कार्यवाही झाली नाही तर आम्ही परत बिऱ्हाड आंदोलन करू, असा इशारा रोजंदारी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.