शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत नियुक्तीपत्र देण्याचे आश्वासन पत्र मिळाल्याने आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:36 IST

कोठार : तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत रोजंदारी वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षाचे नियुक्ती व मानधन ...

कोठार : तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत रोजंदारी वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षाचे नियुक्ती व मानधन मिळावे, या शैक्षणिक वर्षाची नियुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी तळोदा प्रकल्प कार्यालयात सर्व कर्मचारी सहकुटुंब बिऱ्हाड घेऊन आंदोलनास आले होते. मात्र, आठ दिवसांत नियुक्तपत्र देण्याच्या कार्यवाहीचे आश्वासन प्रकल्प कार्यालयाकडून मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ४२ शासकीय आश्रमशाळा व १७ वसतिगृहामध्ये वर्ग तीन व चारचे रोजंदारी तत्त्वावर सुमारे ७०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ते गेल्या १५ ते २० वर्षांपासून आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये सेवा देत आहेत. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे आश्रमशाळा बंद असल्याने त्यांनादेखील कामावर बोलाविण्यात येत नव्हते. रोजंदारी तत्त्वावर कार्यरत असणारे कर्मचारी कामावर येत नसल्याने त्यांचा रोजगार बुडाला. त्यामुळे आश्रमशाळांमध्ये काम करणारे रोजंदारी कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले होते.

कोविडच्या काळात या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये, उपजीविकेसाठी मानधन अदा करावे, अशी सूचना पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी दिली होती. धुळे व नंदुरबार प्रकल्पांतर्गत रोजंदारी वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना मानधन व नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र, तळोदा प्रकल्पांतर्गत रोजंदारी कर्मचाऱ्यांना मानधन व नियुक्ती देण्यात आली नाही. गेल्या कोविड काळातील मानधन अदा करावे व चालू शैक्षणिक वर्षात नियुक्त्या देण्यात याव्यात; याशिवाय अन्य मागण्यांसाठी रोजंदारी कर्मचारी २३ सप्टेंबरपासून तळोदा प्रकल्प कार्यालयात सहकुटुंब बिऱ्हाड आंदोलन करतील, असा इशारा दिला होता. त्यानुसार आजपावेतो मागण्या मान्य न झाल्याने २३ रोजी रोजंदारी वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांनी कुटुंब बिऱ्हाड आंदोलनासाठी दुपारी दोन वाजता प्रकल्प गाठले होते. प्रकल्पाधिकारी डॉ. मैनक घोष यांनी चर्चा करीत आठ दिवसांत रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्याची कार्यवाही करू, असे लेखी पत्र दिल्याने बिऱ्हाड आंदोलक रोजंदारी कर्मचाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन मागे घेतले. आठ दिवसांत नियुक्तीची कार्यवाही झाली नाही तर आम्ही परत बिऱ्हाड आंदोलन करू, असा इशारा रोजंदारी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.