शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

रस्ते महामंडळ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 12:55 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहादा प्रांताधिकारी यांना लेखी स्वरूपात आश्वासन दिले. तसेच आश्वासन प्रांताधिकारी ...

 लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :  रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहादा प्रांताधिकारी यांना लेखी स्वरूपात आश्वासन दिले. तसेच आश्वासन प्रांताधिकारी यांनी प्रकाशा येथील शेतकरी, व्यापारी, वाहनधारकांना दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या. सविस्तर वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा या दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यात प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान दोन वर्षापासून रस्त्याचे काम अपूर्ण आहे. अपूर्ण कामामुळे   रस्ता पूर्णतः खराब झाला असून जागोजागी खड्डे  पडून रस्त्यावर धूळ उडते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून रस्त्यालगत असलेल्या शेतातील पिकांवर धूळ उडून उत्पन्नात घट येत आहे. प्रकाशा व डामरखेडा येथील पुलावरही खड्डे पडले आहेत. या सर्व तक्रारींचे निवारण करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची होती.  बुधवारी सायंकाळी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या कार्यालयात रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, आंदोलनकर्ते व तहसीलदार यांच्यात बैठक झाली. त्यात रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बोरसे, सहायक अभियंता वानखेडे, ठेकेदार, शेतकरी हरी पाटील, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, आदी उपस्थित होते. रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपामध्ये मागण्या मान्य केल्या व तातडीने काम करण्याचे लेखी आश्वासन प्रांताधिकाऱ्यांना दिले. असेच आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी प्रकाशा येथील व्यापारी, आंदोलनकर्ते शेतकरी यांना दिल्यानंतर गुरुवारी होणारे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. हे सर्व रस्ते तात्काळ पूर्ण करावे, असे सांगितले. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे  धुळीमुळे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. कोकणीमाता ते डामरखेडा पुलापर्यंतचा पूर्ण मार्ग डांबरीकरण करावा, प्रकाशा व डामरखेडा  येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी, ज्या ठिकाणी अपूर्ण काम आहे ते तात्काळ पूर्ण  करण्यात यावे, नवीन रस्ता व जुना रस्ता यामध्ये जे अंतर आहे ते व्यवस्थित करून द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता. त्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत.

प्रकाशा येथे चौपदरीकरण व्हावेकोळदा  ते सेंधवा हा मार्ग काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या  मार्गावरील लहान शहादे, डामरखेडा, करजई, बुपकरी, लांबोळा, मनरद   या सर्वच गावांना  चौपदरीकरण आहे.  मध्यभागी विजेचे खांब आहेत व आजूबाजूला संरक्षक लोखंडी कठडे, गटारी आहेत. मग अशा प्रकारचा रस्ता प्रकाशा येथे का करण्यात आला नाही.  प्रकाशा येथे तीर्थक्षेत्र आहे. तीन राज्य व दोन तालुक्यांना जोडणारे महत्वपूर्ण गाव आहे. भाविकांची वर्दळ असते. म्हणून प्रकाशा येथे चौपदरीकरण करणे गरजेचे असताना प्रकाशा गावाला का डावलण्यात आले? असा प्रश्न आंदोलनकर्ते व हरी पाटील यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. त्यावर या अधिकाऱ्यांनी आम्ही वरिष्ठांना विचारतो व सर्वे करण्याचा प्रयत्न करतो, असे सांगितले.