शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा आठ अहवाल पॅाझिटिव्ह, तीन लाख २८ हजार कोंबड्या केल्या नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST

उप शिक्षण अधिकारी डॉ.युनूस पठाण जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील, तहसीलदार उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलीस ...

उप शिक्षण अधिकारी डॉ.युनूस पठाण जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील, तहसीलदार उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलीस निरीक्षक नासिर पठाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत वसावे आदी सर्व अधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या परिस्थितीची पाहणी करीत माहिती जाणून घेत आहेत. पोल्ट्री परिसरात बंदोबस्तासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

आमदार शिरीषकुमार नाईक यांची पाहणी

आमदार शिरिषकुमार नाईक यांनी बर्ड फ्लू भागातील पालावाला पोल्ट्रीत पाहणी केली किती कुकुट पक्षी आहेत, अंडी किती आहेत, पशुखाद्य किती अशी चौकशी करून नुकसान झालेल्या व्यावसायिकांची समस्या जाणून घेतली. नवापूर शहरातील पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे यासंदर्भात विधानसभेत नुकसान भरपाई संदर्भात प्रश्न उपस्थित केला जाईल, पशुसंवर्धन मंत्र्याशी चर्चा करून तत्काळ मदत निधीत मिळावी यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आमदार शिरिषकुमार नाईक यांनी दिली.

२७ पोल्ट्री मधील पशुखाद्य गोडाऊन सील

नवापुर तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत २७ पोल्ट्रीमधील पशुखाद्याची मोजमाप व पंचनामा करून पशुखाद्य गोडाऊनमध्ये सील करण्याची कामगिरी करण्यात आली आहे. नवापूर शहरातील मोठ्या पोल्ट्रीमध्ये पशुखाद्याची निर्मिती केली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पशुखाद्य पोल्ट्री फार्म मध्ये दिसून येत आहे. यात मका, सोयाबीन ढेप, शिंग ढेप, ज्वारी या पासून पोल्ट्री व्यवसायिकांनी आधुनिक मशिनरी च्या सहाय्याने पशुखाद्य तयार केले जाते. व्यवसायिकांनी पशुखाद्य नष्ट न करता त्याला ९० दिवसांपर्यंत सील करून ठेवावे त्यामुळे शासनाचे व व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. बुधवारी प्रशासनाने तालुक्यातील सर्व पोल्ट्री फार्मचे कोंबडी खाद्याचे गोडावून सील केले.

मजुरांची काळजी घ्यावी

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार किलिंग ऑपरेशन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे, परंतु काही पोल्ट्रीधारकांनी जेसीपीने खड्डा करत असताना अर्धवट खड्डा करून कोंबड्या पुरवण्याचे काम दिसून येत आहे. काही ठिकाणी खाजगी कामगारांकडून काम केले जात आहे परंतु काहीचा तोंडाला मास्क नसल्याने त्याचा परिणाम मजुरांचा आरोग्यावर होऊ शकतो. याबाबत स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.