शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

शासनाच्या ॲनलॉकनंतर नंदुरबार आगार येतोय पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST

नंदुरबार आगारातून लांब आणि कमी पल्ल्याच्या कोरोना अगोदर २८४ बसफेऱ्या सुरू होत्या सध्या ८४ बस दररोज विविध मार्गांवर २३५ ...

नंदुरबार आगारातून लांब आणि कमी पल्ल्याच्या कोरोना अगोदर २८४ बसफेऱ्या सुरू होत्या सध्या ८४ बस दररोज विविध मार्गांवर २३५ बसफेऱ्या करत आहेत. या बसफेऱ्यामधून दररोज ३५ हजार किलोमीटरपर्यंत बसचा प्रवास होत आहे. सध्या नंदुरबार आगार ११ हजार प्रवाशापर्यंत पोहोचत असून जुलै महिन्यापर्यंत १६ हजार प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्टे आहे. सध्या एस.टी.ला मिळणारा प्रतिसाद कमी असून तो दिवसेंदिवस वाढत असल्याने असून एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याची चिन्हे सध्या दिसत आहे.

नंदुबार जिल्हा आगार बसफेऱ्या

कोरोना अगोदर फेऱ्या - २८४

शालेय विद्यार्थी फेऱ्या -६४

माणव विकास फेऱ्या - २८

कोरोनानंतर फेऱ्या - ८४

शालेय विद्यार्थी फेऱ्या -००

माणव विकास फेऱ्या - ००

नंदुबार जिल्हा आगार माल वाहतूक

विविध मार्गावर फेऱ्या - ३४

शालेय बसफेऱ्या बंद

सध्या शाळा, विद्यालय व महाविद्यालय बंद असल्याने जिल्हा व तालुका अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना अगोदर आगारातून शालेय ६४ बसफेऱ्या व मानव विकास अंतर्गत २८ बसफेऱ्या सुरू होत्या. सध्या शासन शाळा सुरू करण्याचा विचार करत असून याबाबत अधिकृत घोषणा झाल्यावर सर्व शालेय बसफेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याचे माहिती

मिळाली आहे.

बस मालवाहतूकला सुगीचे दिवस

एस.टी. महामंडळ तोट्यात चालत असल्यामुळे राज्य परिवहन मंडळाने बस मालवाहतूक सेवा राज्यभरात सुरू करण्यात आल्याने चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. त्यात नंदुरबार आगाराच्या ३४ बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात ४९०० किलोमीटर आतापर्यंत प्रवास केला असून २ लाख १० हजार उत्पन्न मिळविले आहे. बस मालवाहतूक सुरू झाल्यामुळे भाजीपाला, किराणा, औषधी आदी प्रकारचा मालवाहतूक करण्यात येत असतो.

शासनाने अनऑक जाहीर केल्यानंतर एस.टी. बसला प्रतिसाद वाढत असून सध्या गरज व उत्पन्नानुसार बसफेऱ्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच ग्रामीण भागात निम्यापेक्षा भागात बस सुरू झाल्या आहेत. उर्वरित भागात लवकरच बससेवा सुरू करण्यात येईल.

- मनोज पवार, आगारप्रमुख, नंदुरबार