शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

महात्मा फुले यांचे ‘अखंड’ वाचून अंनिसच्या पुढाकाराने पार पडला आंतरजातीय सत्यशोधकी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:33 IST

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना सरकारकडून अनुदान देखील देण्यात ...

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना सरकारकडून अनुदान देखील देण्यात येते. याशिवाय जाहिराती व पोस्टर, बॅनरद्वारेदेखील जनजागृती केली जात आहे. मात्र, आज ही समाजात आंतरजातीय विवाहांना पाहिजे तेवढी मान्यता दिसून येत नाही. आंतरजातीय विवाहासाठी उच्चशिक्षित समाज पुढे आला आहे. याचा प्रत्यय नंदुरबार येथे पार पडलेल्या आंतरजातीय सत्यशोधक विवाहामुळे पुन्हा एकदा आला आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील युवक संजय दुसाद व नंदुरबार येथील युवती रिना निकुंभ या दोघांनी एकमेकांच्या पसंतीने आंतरजातीय विवाह करण्याचे ठरविले. त्याला दोन्ही परिवारांची देखील संमती होती. संजयच्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे तर रिना ही परिचारिका म्हणून रुग्णालयात काम करीत असून, दोघेही स्वतःच्या पायावर उभे आहेत. आंतरजातीय व आंतरधर्मीय, सत्यशोधकी विवाह लावून देण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम असल्याची माहिती या दोघांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र अंनिसच्या नंदुरबार शाखेकडे अर्ज देऊन आंतरजातीय विवाह लावून देण्यासाठी मदत व मार्गदर्शनाची विनंती केली होती.

दरम्यान, कायदेशीर व वैद्यकीय बाबींची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र अंनिसच्या नंदुरबार शाखेच्या वतीने दोघांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला. महात्मा फुले यांचे ‘अखंड वाचन’, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधानाची प्रत यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, मंगलगीत गायन केले. नंतर एका कुंडीत दोघी दाम्पत्याच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून सीताफळाचे झाड लावण्यात आले. त्या झाडाभोवती सप्तपदी (फेऱ्या) घेण्यात आल्या. प्रत्येक फेरीला नवदाम्पत्याकडून वचने वदवून घेतली. दोघांनी वैयक्तिक व सामूहिक शपथ ग्रहण करून घेतली व दोघांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. अशाप्रकारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदुरबार शाखेच्या वतीने आगळावेगळा व अत्यंत साध्या पद्धतीने सत्यशोधकी विवाह लावून देण्यात आला.

या विवाह सोहळ्याला वर व वधूकडील निवडक कुटुंबीय व नातेवाईकदेखील उपस्थित होते. या आंतरजातीय सत्यशोधकी विवाहासाठी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार अंनिस शाखेचे शांतीलाल शिंदे, ॲड. प्रियदर्शन महाजन, फिरोज खान, कीर्तीवर्धन तायडे व वसंत वळवी, शहादा शाखेचे, संतोष महाजन, प्रदीप केदारे यांनी परिश्रम घेतले.

अंनिसच्या वतीने ७०० हून अधिक विवाह

जातीपातीच्या बाबतीत आजही समाजात भेद अभाव दिसून येतो. जातीबाहेर लग्न केल्यामुळे अनेक कुटुंबांना वाळीतही टाकले जाते. समाजातील जाती-पातीचा भेदभाव नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह महत्त्वाचे माध्यम असल्याचे मानून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले जाते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आतापर्यंत राज्यभरात सातशेहून अधिक आंतरजातीय-आंतरधर्मीय व सत्यशोधक नोंदणी पद्धतीने विवाह लावून देण्यात आले आहेत. नंदुरबार शाखेच्या लावून देण्यात आलेला हा पहिला आंतरजातीय व सत्यशोधक विवाह होता. यापुढे देखील अंनिसच्या वतीने जिल्ह्यात या क्षेत्रात काम केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला कायदेशीर, वैद्यकीय व सर्व बाबतीत मदत आणि मार्गदर्शन अंनिसच्या वतीने केले जात असून, त्यासाठी महाराष्ट्र अंनिसचा स्वतंत्र विभाग कार्यरत असल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी दिली आहे.