शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याच्या विश्रांतीनंतर जयनगरसह परिसरात पाऊस,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:33 IST

महिन्याच्या विश्रांतीनंतर जयनगरसह परिसरात पाऊस, खरीप पिकांना जीवदान जयनगर : जिल्ह्यासह जयनगर परिसरात जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. ...

महिन्याच्या विश्रांतीनंतर जयनगरसह परिसरात पाऊस,

खरीप पिकांना जीवदान

जयनगर : जिल्ह्यासह जयनगर परिसरात जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. कमीअधिक प्रमाणात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकरीराजा सुखावला असून आता पुन्हा पिकांना रासायनिक खते द्यायला तसेच औषधफवारणी कामांना वेग येणार आहे. त्यामुळे मजूरवर्गालाही रोजगार मिळणार आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी दोन-अडीच वाजेपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली होती. रात्रीही पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा सर्वच घटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सलग दोन वर्षे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे जमिनीतील पाणीपातळीत वाढ झाली होती. मात्र, मागील दोन महिन्यांत अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी व लागवड केली होती. जिल्ह्यात कापूस, मका, बाजरी, सोयाबीन, मुगाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जवळपास महिनाभरापासून पावसाच्या विश्रांतीमुळे पिके करपू लागली होती. मात्र, मंगळवारी दुपारी सर्वत्र दोन वाजेच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात रिमझिम तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी पिके धरून ठेवत होती. मात्र, आलेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असले, तरी उत्पादनात निश्चितच घट होणार आहे.

रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी पाऊस लांबल्याने यापुढे सरासरीएवढा पाऊस झाला, तरच विहिरी तसेच कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते.

जयनगरसह परिसरात अद्याप नद्यांना पूर आलेला नाही. त्यामुळे परिसरातील विहिरींना तसेच कूपनलिकांना पाणीपातळीत वाढ दिसून येत नाहीय. म्हणून आगामी दीड महिन्याच्या पावसावर शेतकऱ्यांचे खरीप तसेच रब्बी हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे.