शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

अनेक वर्षानंतर भाताचे उत्पादन समाधानकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा सरासरीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के जास्त पाऊस झाल्याने नवापूर तालुका व नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा सरासरीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के जास्त पाऊस झाल्याने नवापूर तालुका व नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भागात भाताचे उत्पादन समाधानकारक आले आहे. यंदा 212.16 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असतांना यंदा त्यापेक्षा अधीक क्षेत्रात भाग लागवड करण्यात आली होती. सध्या पारंपारिक पद्धतीने भाग कापणी करून काढणीस सुरुवात झाली आहे.    नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भाग, नवापुर तालुका तसेच अक्कलकुवा तालुक्यातील काही भागात भाताची लागवड केली जाते. जिल्ह्यात भात पिकाचे 212.16 हेक्टर क्षेत्र आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे दरवर्षी त्यापेक्षा कमी क्षेत्रात लागवड होत होती. पावसामुळे प्रमाण जास्तयंदा समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात भात लागवडीचे प्रमाण ब:यापैकी वाढले. नंदुरबार तालुक्यात पूर्व भागात 140 टक्के तर नवापूर तालुक्यात 122 टक्के पाऊस झाला आहे. भात पिकाला पावसाचे प्रमाण अधीक असावे लागते. लागवडीनंतर देखीेल पुरेसे पाणी राहिले तर उत्पादन जास्त येते. यंदा सर्वच दृष्टीने पोषक स्थिती असल्यामुळे भाताचे उत्पादन चांगले झाले आहे. क्षेत्रात वाढयंदा भात पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सर्वसाधारण 212.16 हेक्टर क्षेत्र असतांना जवळपास 250 हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर भाग लागवड झाली होती. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पादन चांगले आले आहे. आतार्पयत पावसाचे प्रमाण कमी राहत होते. भुगर्भातील पाणी पातळी देखील कमी राहत होती. त्यामुळे क्षेत्र दरवर्षी घटत होते. 200 हेक्टर क्षेत्रावर देखील लागवड होत नव्हती. शिवाय पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादन देखील अपेक्षीत रित्या येत नव्हते. यंदाची परिस्थिती मात्र वेगळी असल्याने भात उत्पादक शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नुकसान फारसे नाहीपरतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यात जिल्ह्यतील अनेक पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असतांना भात पीक त्यापासून वाचले. त्यामुळे उत्पादनावर फारसा परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक ठिकाणीच विक्रीयेथे उत्पादीत होणा:या भात अर्थात तांदूळाची विक्री स्थानिक ठिकाणीच केली जात असते. काही व्यापारी ठोक स्वरूपात खरेदी करीत असतात. तर काहीजण जवळच्या राईस मिलमध्ये भात विक्री करीत असतात. 

वाण आणि चव वेगळी.. जिल्ह्यात भाताचे अर्थात तांदुळाचे विविध पारंपारिक वाण पिकविले जातात. त्यांच्या काढणी पद्धत ही पारंपारिक अर्थात हातसाळीची असल्याने हा तांदुळ चवीला चांगला असतो. त्यामुळे त्याला मागणी देखील मोठय़ा प्रमाणावर असते. कमोद, इंद्रायणी, खुशबू या वाणाला मोठी मागणी असते. भात उत्पादन घेणा:या शेतक:यांना आणखी पुरेसे मार्गदर्शन आणि उत्पादन वाढीसाठीची मदत मिळाली तर उत्पादन क्षमतेत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.