शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अनेक वर्षानंतर भाताचे उत्पादन समाधानकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा सरासरीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के जास्त पाऊस झाल्याने नवापूर तालुका व नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा सरासरीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के जास्त पाऊस झाल्याने नवापूर तालुका व नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भागात भाताचे उत्पादन समाधानकारक आले आहे. यंदा 212.16 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असतांना यंदा त्यापेक्षा अधीक क्षेत्रात भाग लागवड करण्यात आली होती. सध्या पारंपारिक पद्धतीने भाग कापणी करून काढणीस सुरुवात झाली आहे.    नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भाग, नवापुर तालुका तसेच अक्कलकुवा तालुक्यातील काही भागात भाताची लागवड केली जाते. जिल्ह्यात भात पिकाचे 212.16 हेक्टर क्षेत्र आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे दरवर्षी त्यापेक्षा कमी क्षेत्रात लागवड होत होती. पावसामुळे प्रमाण जास्तयंदा समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात भात लागवडीचे प्रमाण ब:यापैकी वाढले. नंदुरबार तालुक्यात पूर्व भागात 140 टक्के तर नवापूर तालुक्यात 122 टक्के पाऊस झाला आहे. भात पिकाला पावसाचे प्रमाण अधीक असावे लागते. लागवडीनंतर देखीेल पुरेसे पाणी राहिले तर उत्पादन जास्त येते. यंदा सर्वच दृष्टीने पोषक स्थिती असल्यामुळे भाताचे उत्पादन चांगले झाले आहे. क्षेत्रात वाढयंदा भात पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सर्वसाधारण 212.16 हेक्टर क्षेत्र असतांना जवळपास 250 हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर भाग लागवड झाली होती. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पादन चांगले आले आहे. आतार्पयत पावसाचे प्रमाण कमी राहत होते. भुगर्भातील पाणी पातळी देखील कमी राहत होती. त्यामुळे क्षेत्र दरवर्षी घटत होते. 200 हेक्टर क्षेत्रावर देखील लागवड होत नव्हती. शिवाय पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादन देखील अपेक्षीत रित्या येत नव्हते. यंदाची परिस्थिती मात्र वेगळी असल्याने भात उत्पादक शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नुकसान फारसे नाहीपरतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यात जिल्ह्यतील अनेक पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असतांना भात पीक त्यापासून वाचले. त्यामुळे उत्पादनावर फारसा परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक ठिकाणीच विक्रीयेथे उत्पादीत होणा:या भात अर्थात तांदूळाची विक्री स्थानिक ठिकाणीच केली जात असते. काही व्यापारी ठोक स्वरूपात खरेदी करीत असतात. तर काहीजण जवळच्या राईस मिलमध्ये भात विक्री करीत असतात. 

वाण आणि चव वेगळी.. जिल्ह्यात भाताचे अर्थात तांदुळाचे विविध पारंपारिक वाण पिकविले जातात. त्यांच्या काढणी पद्धत ही पारंपारिक अर्थात हातसाळीची असल्याने हा तांदुळ चवीला चांगला असतो. त्यामुळे त्याला मागणी देखील मोठय़ा प्रमाणावर असते. कमोद, इंद्रायणी, खुशबू या वाणाला मोठी मागणी असते. भात उत्पादन घेणा:या शेतक:यांना आणखी पुरेसे मार्गदर्शन आणि उत्पादन वाढीसाठीची मदत मिळाली तर उत्पादन क्षमतेत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.