शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

दिर्घ प्रतीक्षेनंतर नंदुरबारात पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:36 IST

आतार्पयत सरासरीचा 25 टक्के पाऊस : पिकांना जीवदान, जोरदार पावसाची अपेक्षा कायम

नंदुरबार : गेल्या अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जिल्हाभरात पावसाची संततधार सुरू झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली होती. दुपारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. दरम्यान, जिल्ह्यात 81.45 टक्के पेरण्या झाल्या आहेत. या पावसामुळे पिकांना जीवदान देखील मिळाले आहे. जिल्ह्यात सरासरीचा केवळ 25 टक्के पाऊस झाला आहे. झालेला पाऊस देखील अनियमित असल्यामुळे पिकांना त्याचा काहीही फायदा होत नव्हता. परिणामी पेरणी केलेली वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. वेध शाळेतर्फे वेळोवेळी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल म्हणून इशारा दिला जात होता. परंतु जिल्हा वगळून इतरत्र पाऊस येत असल्याने शेतक:यांचे तोंडचे पाणी पळाले होते. त्यामुळे प्रत्येकालाच पावसाची आस लागून होती.सोमवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. शनिवार व रविवार सुटीचे गेल्यानंतर सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी चाकरमान्यांची कामावर जाण्याची धावपळ असतांना पावसाने रिपरिप लावल्याने जनजिवनावर परिणाम झाला होता. सोमवारचा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधीक प्रमाणात असल्याचे चित्र होते. यामुळे मात्र दुर्गम भागातील अनेक रस्त्यांवर पाणी व चिखल यामुळे रहदारीवर परिणाम झाला.धडगाव तालुक्यात सर्वाधिकआतार्पयत जिल्ह्यात धडगाव तालुक्यात सर्वाधिक 37.45 टक्के तर सर्वात कमी नंदुरबार तालुक्यात अवघा 16 टक्के पाऊस झाला आहे. यामुळे नंदुरबार तालुक्यात अद्यापही अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. अनेक शेतक:यांनी पिकांना चुहा पद्धतीने देखील पाणी देण्याचा प्रय} केला. आजच्या पावसामुळे मात्र शेतक:यांच्या जिवात जीव आला आहे. नवापूर तालुक्यात 21.83, तळोदा तालुक्यात 26.42, शहादा तालुक्यात 28.27 तर अक्कलकुवा तालुक्यात 22.68 टक्के पाऊस झाला आहे. नदी, नाले अद्यापही कोरडेजिल्ह्यात नदी, नाले अद्यापही कोरडेच आहेत. तापी वगळता एकही नदी अद्यापही दुथडी भरून वाहू लागली नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पाणी येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.81 टक्के पेरण्याजिल्ह्यात आतार्पयत एकुण 81.45 टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक अर्थात 114 टक्के पेरण्या या शहादा तालुक्यात झाल्या आहेत तर सर्वात कमी 61 टक्के पेरण्या या नवापूर तालुक्यात झाल्या आहेत. नंदुरबार तालुक्यात 83.8, तळोदा तालुक्यात 68.20, धडगाव तालुक्यात 93.33 तर अक्कलकुवा तालुक्यात 63.88 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. बॅरेजचे सर्वच दरवाजे उघडेसारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे सर्वच दरवाजे उघडे करण्यात आले आहे. जुलैच्या मध्याला बॅरेजचे दरवाजे उघडे करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात ते पुन्हा बंद केले जात असतात. साधारणत: दोन्ही बॅरेजेस 70 ते 85 टक्के भरण्यात येत असतात. पाण्याचे लेव्हल कायम राहावी यासाठी हे बॅरेज पुर्ण क्षमतेने भरले जात नसल्याचे सांगण्यात   आले.