शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

दिर्घ प्रतीक्षेनंतर नंदुरबारात पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:36 IST

आतार्पयत सरासरीचा 25 टक्के पाऊस : पिकांना जीवदान, जोरदार पावसाची अपेक्षा कायम

नंदुरबार : गेल्या अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जिल्हाभरात पावसाची संततधार सुरू झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली होती. दुपारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. दरम्यान, जिल्ह्यात 81.45 टक्के पेरण्या झाल्या आहेत. या पावसामुळे पिकांना जीवदान देखील मिळाले आहे. जिल्ह्यात सरासरीचा केवळ 25 टक्के पाऊस झाला आहे. झालेला पाऊस देखील अनियमित असल्यामुळे पिकांना त्याचा काहीही फायदा होत नव्हता. परिणामी पेरणी केलेली वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. वेध शाळेतर्फे वेळोवेळी जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल म्हणून इशारा दिला जात होता. परंतु जिल्हा वगळून इतरत्र पाऊस येत असल्याने शेतक:यांचे तोंडचे पाणी पळाले होते. त्यामुळे प्रत्येकालाच पावसाची आस लागून होती.सोमवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. शनिवार व रविवार सुटीचे गेल्यानंतर सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी चाकरमान्यांची कामावर जाण्याची धावपळ असतांना पावसाने रिपरिप लावल्याने जनजिवनावर परिणाम झाला होता. सोमवारचा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधीक प्रमाणात असल्याचे चित्र होते. यामुळे मात्र दुर्गम भागातील अनेक रस्त्यांवर पाणी व चिखल यामुळे रहदारीवर परिणाम झाला.धडगाव तालुक्यात सर्वाधिकआतार्पयत जिल्ह्यात धडगाव तालुक्यात सर्वाधिक 37.45 टक्के तर सर्वात कमी नंदुरबार तालुक्यात अवघा 16 टक्के पाऊस झाला आहे. यामुळे नंदुरबार तालुक्यात अद्यापही अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. अनेक शेतक:यांनी पिकांना चुहा पद्धतीने देखील पाणी देण्याचा प्रय} केला. आजच्या पावसामुळे मात्र शेतक:यांच्या जिवात जीव आला आहे. नवापूर तालुक्यात 21.83, तळोदा तालुक्यात 26.42, शहादा तालुक्यात 28.27 तर अक्कलकुवा तालुक्यात 22.68 टक्के पाऊस झाला आहे. नदी, नाले अद्यापही कोरडेजिल्ह्यात नदी, नाले अद्यापही कोरडेच आहेत. तापी वगळता एकही नदी अद्यापही दुथडी भरून वाहू लागली नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पाणी येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.81 टक्के पेरण्याजिल्ह्यात आतार्पयत एकुण 81.45 टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक अर्थात 114 टक्के पेरण्या या शहादा तालुक्यात झाल्या आहेत तर सर्वात कमी 61 टक्के पेरण्या या नवापूर तालुक्यात झाल्या आहेत. नंदुरबार तालुक्यात 83.8, तळोदा तालुक्यात 68.20, धडगाव तालुक्यात 93.33 तर अक्कलकुवा तालुक्यात 63.88 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. बॅरेजचे सर्वच दरवाजे उघडेसारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे सर्वच दरवाजे उघडे करण्यात आले आहे. जुलैच्या मध्याला बॅरेजचे दरवाजे उघडे करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात ते पुन्हा बंद केले जात असतात. साधारणत: दोन्ही बॅरेजेस 70 ते 85 टक्के भरण्यात येत असतात. पाण्याचे लेव्हल कायम राहावी यासाठी हे बॅरेज पुर्ण क्षमतेने भरले जात नसल्याचे सांगण्यात   आले.