शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यानंतर तळोद्यात समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 11:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेनंतर म्हणजे पाच महिन्यानंतर येथील संजय गांधी निराधार समितीची बैठक गुरूवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेनंतर म्हणजे पाच महिन्यानंतर येथील संजय गांधी निराधार समितीची बैठक गुरूवारी झाली. बैठकीत विविध योजनांतर्गत दाखल झालेल्या साधारण 510 प्रकरणांपैकी साधारण 310 प्रकरणे विविध त्रुटय़ांमुळे नामंजूर करण्यात आली आहेत. तथापि 200 प्रकरणेदेखील समितीने पडताळणी करून मंजूर केली आहे. नामंजूर करण्यात आलेल्या प्रकरणांच्या त्रुटींसाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार उदेसिंग पाडवी यांनी दिल्या.तळोदा येथील प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीत गुरूवारी शासनाच्या संजय गांधी निराधार समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी होते. या वेळी समितीचे सचिव तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सदस्य राजेंद्र राजपूत, नितीन पाडवी, रसीलाबाई देसाई, यशवंत पाडवी, अनुपकुमार उदासी, संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार एस.पी. गवते, प्रसाद बैकर आदी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ, श्रावण बाळ व विधवा पेन्शन योजना अशा वेगवेगळ्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी तळोदा शहरासह ग्रामीण भागातून साधारण 510 प्रस्ताव समितीकडे प्राप्त झाले होते. यासर्व प्रस्तावांची कागदपत्रांची पडताळणी सदस्यांनी केली. त्यात विविध कागदपत्रांच्या त्रुटी आढळून आल्यात.  अशी जवळपास 310 प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत. अर्थात 200 प्रकरणेदेखील समितीने मंजूर केली आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रथमच प्रकरणे मंजूर झाल्याचे संजय गांधी निराधार विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मंजूर  करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना 164, संजय गांधी निराधार योजना 21, श्रावणबाळ निवृत्ती योजना 15 या प्रमाणे आहेत. जी प्रकरणे विविध त्रुटींमुळे नाकारण्यात आली आहेत. अशा प्रकरणांबाबत महसूल प्रशासनाने आपल्या कर्मचा:यांना कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात. जेणे करून पुढील बैठकीत त्यावर पुन्हा कार्यवाही करण्यात येईल. कोणताही गरजू लाभार्थी या योजनांपासून वंचित राहणार नाही, अशा सूचना आमदार उदेसिंग पाडवी यांनी प्रशासनास दिल्या. दरम्यान, समितीची पुढील बैठक येत्या 7 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

संजय गांधी निराधार विभागाकडून समाजातील दारिद्रय़ रेषेखालील गरजू, गरीब कुटुंबातील लाभाथ्र्याना देण्यात येणा:या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थीस मोठी फिरफिर करावी लागत असल्याचे म्हणणे आहे. कारण या योजनेसाठी जवळपास डझनभर कागद पत्र लागत असतात. त्यातही प्रकरणासाठी ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी या कर्मचा:यांचा चौकशी  अहवालदेखील लागत असतो. मात्र त्यासाठी लाभाथ्र्याना मोठी दमछाक करावी लागत असते. हे कर्मचारी गावात उपलब्ध झाले नाही तर तालुक्याच्या ठिकाणी भाडे खचरून त्यांना यावे लागत असते. या उपरांतही तेथे भेटत नसल्याचा लाभाथ्र्याचा आरोप आहे. साहजिकच कागदपत्रांची पूर्तता वेळेवर करता येत नाही. परिणामी  लाभापासून वंचित राहावे लागत असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली. याबाबत महसूल प्रशासनाने कर्मचा:यांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी लाभार्थ्ीनी केली आहे.