शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
2
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
3
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
5
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
6
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
7
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
8
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
9
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
11
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
12
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
13
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
14
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
15
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
16
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
17
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
18
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
19
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
20
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

प्रशासनाने पाहिले टंचाईचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:04 IST

कुयरीडाबर : आता कायम स्वरूपी उपाययोजनांकडे ग्रामस्थांचे लक्ष

तळोदा : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कुयरीडाबर, पालाबार, चिरमाळ या पाड्यांना तालुका प्रशासनाने शनिवारी भेट देवून तेथील पाणी टंचाईसंदर्भातील उपाययोजनांच्या कामाची पाहणी केली. या वेळी एका विहिरीतून वाहणाऱ्या झिºयाचे पाणी खाली उतरून काही आदिवासी महिला पाणी भरत होत्या. या वेळी तेथील पाणीटंचाईचे भीषण वास्तव प्रशासनाने पाहिले.तळोदा तालुक्यातील कुयरीडाबर, चिरमाळ, पालाबार, केलापाणी अशा दुर्गम भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी या पाड्यांमधील रहिवाशांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. या वेळी या ग्रामस्थांनी त्यांच्याशी चर्चादेखील केली होती. या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने पाड्यांमधील पाणी व चारा छावण्यांबाबत तालुका प्रशासनास प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे, इतर अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व संबंधीत ग्रामस्थांसह या पाड्यांना शनिवारी भेट दिली. हे सर्व अधिकारी केवलापाणीपर्यंत वाहनांद्वारे गेले. तेथून चार ते पाच किलोमीटर अंतर पायी डोंगर चढून वरिल पाड्यांना पोहाचलेत.पायी डोंगर चढतांना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. अधिकाºयांनी प्रथमच गावाला भेट दिल्याने गावकरीही भारावले होते. तहसीलदार लोखंडे यांनी कुयरीडाबर येथील गावकºयांना पाणीपुरवठा करणाºया विहिरींची (शेवडी) पाहणी केली. त्या वेळी एका शेवडीतून खाली उतरून तेथील झिरपणारे पाणी काही महिला घड्यात भरत असतांना त्यांनी पाहिले. हंडाभर पाण्यासाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागत असल्याची व्यथाही गावकºयांनी प्रशासनासमोर बोलून दाखविली. तेथून पुरेसे पाणी निघत नसल्यामुळे डोंगर उतरून खालील झºयाचे पाणी प्यावे लागत असल्याचेही रहिवाशांनी सांगितले.दरवर्षी उन्हाळ्यात आम्हाला भीषण पाणीटंचाईच्या समस्येस तोंड लागत असते. त्यामुळे कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर अधिकाºयांनी ग्रामपंचायतीमार्फत जुन्या विहिरींचे खोलीकरण काम हाती घेतले आहे. या कामांची पाहणी त्यांनी केली. साधारण १५ ते २० फुटापर्यंत ही विहीर खोल गेली आहे. या उपरांतही शेवडीस पुरेशे पाणी लागले नाही तर शेवटी केवलापाणी गावापर्यंत टँकरने पाणी नेऊन तेथून गाढवामार्फत पाड्यापर्यंत पाण्याचे नियोजन करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.दरम्यान जनावरांच्या चाºया बाबत सुद्धा परिसरातील रहिवाशांचा जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी होत्या. यामुळे तालुका पशुधन अधिकारी डॉ.सामुद्रे यांनी तेथील जनावरांची माहिती घेतली. या वेळी गावकºयांनी आपल्याकडील बैल, गायी, म्हशी, शेळी अशा पाळीव जनावरांची माहिती सांगितली. अधिकाºयांनी गावातील पाणीटंचाईबाबत पाहणी केल्यामुळे गावकºयांनी समाधान व्यक्त केले.