शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

पर्यटन विकासासाठी कृती आराखडा

By admin | Updated: February 28, 2017 00:41 IST

प्रकाशा, तोरणमाळ, सारंगखेड्याचा समावेश : पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

प्रकाशा : प्रकाशा, सारंगखेडा व तोरणमाळ या तीर्थक्षेत्रांचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास व्हावा, त्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव त्या त्या विभागांनी विनाविलंब सादर करावे, असे आदेश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सोमवारी येथे दिले.प्रकाशा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाºयांची बैठक सोमवारी झाली. अध्यक्षस्थानी पर्यटन विकास तथा पालकमंत्री जयकुमार रावल होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, जिल्हा नियोजन अधिकारी के.बी. जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, एम.जे. सांगळे, जि.प.चे कार्यकारी अभियंता बी.एन. पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार नितीन गवळी, जि. प. सदस्य रामचंद्र पाटील, जयपालसिंह रावल, अनिल भामरे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता डी. डी. भामरे, सहायक अभियंता किशोर गिरासे, सा.बां. विभागाचे उपविभागीय अभियंता के.जी. साळुंखे, प्रकाशा-सारंगखेडा बॅरेजचे शाखा अभियंता वरुण जाधव, सहायक अभियंता ईश्वर पाटील, सरपंच भावडू ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, रफीक खाटीक, महेंद्र भोई, मंडळ अधिकारी बी.ओ. पाटील,, तलाठी जे.एन. पाटील, ग्रामविकास अधिकारी अरुण वरसाळे आदी उपस्थित होते.पालकमंत्री रावल यांनी विविध कामांचा आढावा घेऊन अडीअडचणी जाणून घेतल्या. तीर्थक्षेत्रांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, यावर झालेल्या चर्चेत प्रकाशासाठी जि.प. सदस्य रामचंद्र पाटील, सारंगखेड्यासाठी जि. प. सदस्य जयपालसिंह रावल तर तोरणमाळसाठी अनिल भामरे यांनी सहभाग घेतला.१० कोटी देणारप्रकाशा तीर्थक्षेत्री येणाºया भाविकांना मुक्कामाला थांबण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. या तीर्थक्षेत्राचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे आवश्यक आहे. त्यात प्रामुख्याने संगमेश्वर, केदारेश्वर, गौतमेश्वर आदी मंदिराच्या ठिकाणी घाट, भक्तनिवास, चेंजिंग रूम, परिसराचे सुशोभिकरण, उद्यान, रस्ते, शेड, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन टप्प्यात १० कोटी रुपयांच्या निधीला लवकरच मंजुरी देणार असल्याचे रावल यांनी सांगितले.प्रकाशा बॅरेजची पाहणीप्रकाशा, सारंगखेडा व सुलवाडे बॅरेजेसमध्ये प्रचंड जलसाठा झाला आहे. त्या पाण्याचा उपयोग शेतीसह पर्यटनासाठी झाला पाहिजे. त्यासाठी तापी काठावर हॉटेल्स, रिसॉर्ट, उद्योग, बोटींगची सुविधा करणे गरजेचे आहे. त्यातून स्थानिक लोकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. प्रकाशा व सारंगखेडा येथे पर्यटन निवास अल्पदरात उपलब्ध करून भाविकांना सुविधा पुरविणे गरजेचे आहे. मंत्री रावल यांनी बॅरेज प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी शाखा अभियंता वरूण जाधव यांनी बॅरेजची माहिती देताना सांगितले की, बॅरेज निर्मितीपासून रंगरंगोटीचे काम झाले आहे. जवळपास नऊ वर्षांचा कालावधी लोटल्याने ठिकठिकाणी रंग निघाला आहे. या कामासाठी लागणारा खर्च मोठा असल्याने आपल्या विभागाकडून तरतूद करावी, अशी विनंती जाधव यांनी केली.रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नप्रकाशा, सारंगखेडा व तोरणमाळ येथे येणाºया भाविक व पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यांना सोयी-सुविधा पुरवून पर्यटनस्थळ म्हणून सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. त्यातून स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मितीही होणार आहे. तोरणमाळ येथे येणाºया पर्यटकांसाठी तेथील तलावाचे सुशोभिकरण, रिंगरोड, जॉग्गििं ट्रॅक, निवासस्थानांची सोय करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच खाकराच्या पानाचे द्रोण, पत्रावळीनिर्मिती केंद्र उभारणी करून त्यातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न असल्याचे रावल यांनी सांगितले. (वार्ताहर)