शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

विनामास्क फिरणाऱ्या ५० पेक्षा अधिक जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसात जिल्हाभरात ५० पेक्षा अधिक जणांवर कारवाई करण्यात आली. ...

नंदुरबार : जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसात जिल्हाभरात ५० पेक्षा अधिक जणांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, विनामास्कप्रकरणी जागेवरच २०० रुपयांच्या दंडाची तरतूद असतांना थेट गुन्हे दाखल केले जात असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने नियम व कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे नियोजन केले आहे. त्याअनुषंगाने पोलीस विभागातर्फे जिल्हाभरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. दोन दिवसात ५० पेक्षा अधिक जणांवर कारवाई करण्यात आली. त्या त्या पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, विनामास्कप्रकरणी पहिल्या वेळी कारवाई झाली तर संबंधिताला २०० रुपये दंडाची शिक्षा आहे. तिसऱ्या वेळी दंड आणि गुन्हा दाखल करण्याचे प्राविधान आहे. असे असतांना थेट गुन्हे दाखल केले जात आहे. न्यायालयात गेल्यावर २०० रुपये दंड भरला जातो. परंतु यामुळे संबंधित कारवाई झालेला व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्याचाही वेळ वाया जातो. त्यामुळे आधी दंड नंतरच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.