शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : खतांची जादा दराने विक्री होत असेल तसेच लिकिंग करुन काळाबाजार होत असेल तर अशा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : खतांची जादा दराने विक्री होत असेल तसेच लिकिंग करुन काळाबाजार होत असेल तर अशा व्यापाऱ्यांवर कारवाई होणार आहे़ शेतकºयांनी तक्रारी दिल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली़ कहाटूळ ता़ शहादा येथे मशरूम उत्पादन प्रकल्पाला दिलेल्या भेटीप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली़तालुक्यातील कहाटूळ येथील शेतकरी घनश्याम पाटील यांनी एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत मशरूम उत्पादन व बीज उत्पादन प्रकल्पाला कृषी मंत्री भुसे यांनी मंगळवारी भेट देत पाहणी केली़ यावेळी साक्रीच्या आमदार आमदार मंजुळा गावित, उपविभागीय अधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, गट विकास अधिकारी सी. टी. गोसावी, उपविभागीय कृषी अधिकारी बी. व्ही. जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमशा पाडवी, विक्रांत मोरे, धुळ्याचे हिलाल माळी, मंडळ कृषी अधिकारी आर. एम. धनगर, कृषी पर्यवेक्षक सुरेश बागुल, कृषी सहाय्यक राहुल खेडकर, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रविंद्र बच्छाव यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आंबा फळपिकाची लागवड दादाजी भुसे यांचा हस्ते करण्यात आली.कृषीमंत्री भुसे यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली़ जिल्ह्याला आदर्शवत असा हा प्रकल्प असून जिल्ह्यातील इतर शेतकºयांनीही इथल्या बियाण्याचा वापर करून प्रकल्प कार्यान्वित करावा असे त्यांनी सांगितले़ सूत्रसंचालन पंचायत समितीचे सदस्य विजय पटेल यांनी केले़ प्रसंगी कृषीमंत्री भुसे यांनी परिसरातील शेतकºयांसोबत संवाद साधत माहिती घेतली़खताची टंचाई असेल तर येत्या चार-पाच दिवसात युरिया खताची पूर्तता केली जाईल. युरिया खताची जादा दराने विक्री किंवा लिंकिंग कोणी करत असेल तर शेतकºयांनी तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. शेतकºयांना आवश्यक तेवढा युरियाच्या साठा लवकरच उपलब्ध करून दिला जाईल. शेतकºयंनी काळजी करू नये असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले़ तशा सूचना त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांना दिल्या़ एकाच वेळी सर्वत्र खताची मागणी झाली त्यातच कोरोणाचे संकट आल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली. परंतु आवश्यक तेवढा युरिया उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून केंद्र सरकारकडे खताची मागणी केल्याची माहितीही त्यांनी शेवटी दिली़ तसेच केंद्राकडे जास्तीच्या युरियाची मागणी केल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले़