लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : संचार बंदीत शहरात विनाकारण फिरणाऱ्या ३०० वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून त्यांना कडक समज दिली आहे. तथापि असे असले तरी महत्त्वाच्या कामासाठी जाणाºया वाहनचालकांनादेखील टार्गेट केले जात असल्याचा वाहनचालकांचा आरोप आहे.कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. साहजिकच शहरातही संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तथापि वाहनचालक विनाकारण शहरात फिरत आहेत. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाईचे सत्र हाती घेतले आहे.गेल्या दोन दिवसात पोलिसांनी ३०० वाहनचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या कागद पत्रांची चौकशी बरोबरच दंडात्मक कारवाई केली आहे. साहजिकच अशा वाहनचालकांवर पोलिसांचा वचक बसला आहे. मात्र जे खरोखरच बँकींग, किराणा, मेडिकल, अशा महत्त्वाच्या कामासाठी बाजार पेठेत येतात निदान अशांना तरी टार्गेट करू नये, असे या वाहनचालकांचे म्हणणे आहे. जिल्हा प्रशासनाने विनाकारण वाहन फिरविणाऱ्यांवर आवर घालण्यासाठी शहरातील पेट्रोल पंप बंद केलेले असतांना मोठ्या प्रमाणात वाहन चालक शहरात मोटार सायकली फिरवीत असल्याचे चित्र दिसून येते. ग्रामीण हद्दीतील पंपावरूनच चोरटी मार्गाने पेट्रोल मिळत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्यावरही आवर घालण्याची मागणी होत आहे.
तळोद्यात ३०० वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:12 IST