शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमार्गावरील सोमावल ते अक्कलकुवा दरम्यान अपघातांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर सोमावल ते मोदलपाडा दरम्यान भरधाव वेगाने जाणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.याबाबत वृत्त असे की, अहमदाबादहून खत निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालाच्या बॅग घेऊन ट्रक (क्रमांक जीजे27  टी-9711) हैद्राबादकडे निघाला होता. रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास राज्यमार्गावरील मोदलपाडा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर सोमावल ते मोदलपाडा दरम्यान भरधाव वेगाने जाणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.याबाबत वृत्त असे की, अहमदाबादहून खत निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालाच्या बॅग घेऊन ट्रक (क्रमांक जीजे27  टी-9711) हैद्राबादकडे निघाला होता. रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास राज्यमार्गावरील मोदलपाडा ते सोमावल गावादरम्यान भरधाव असणारा हा ट्रक उलटला. या ट्रकमध्ये चालक व सहचालक असे दोन जण होते. समोरून येणा:या कंटेनरने साईड न देता कट मारल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत उलटला, अशी माहिती सहचलकाने दिली. अपघाताची भीषणता एवढी होती की, हा ट्रक पूर्णपणे उलटून चारही चाके वरच्या दिशेला झाली. चालक व सहचालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकले. इतर वाहन चालकांनी त्यांना बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात चालक व सहचालक यांना कोणतीही  गंभीर दुखापत झाली नाही. इर्शाद व मोहंमद सैबाझ (दोघे रा.अहमदाबाद, गुजरात) अशू त्यांची नावे   असल्याचे सांगण्यात आले. त्यांना या अपघातात किरकोळ जखमा झाल्या आहेत. सकाळी मोदलपाडा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी किसन वळवी, गुलाबसिंग वसावे यांनी घटनास्थळी जाऊन ट्रकची पाहणी केली.  पुढील पोलीस कार्यवाही केली.अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर तळोदा ते खापर दरम्यान वर्षभरापासून भरधाव ट्रक उलटण्याचे सत्र सुरू आहे. मात्र संबंधित विभागाने पूर्णपणे बघ्याची भूमिका घेतली आहे. दर दिवसाआड राज्यमार्गावरील तळोदा ते खापरदरम्यान अपघात होत आहेत.   2 फेब्रुवारी रोजी जामली फाटय़ाजवळील वळणावर खताचा ट्रक उलटला होता तर 9 मार्च रोजी याचठिकाणी पपईने भरलेला ट्रक उलटल्याने डिङोलची टाकी फुटून ट्रक पेटला होता. अशाप्रकारे दर महिना-पंधरा दिवसांनी तळोदा ते खापर दरम्यान अपघाताचे सत्र नेहमीचे झाले आहे. बेशिस्त वाहतूक व अनियंत्रित वेग, ओव्हरलोड भरलेली वाहने,          अप्रशिक्षित व मद्यपी चालक, परिवहन व पोलीस वाहतूक शाखेचे याकडे असणारे दुर्लक्ष ही या अपघातांच्या मालिकेमागील कारणे असल्याचे सांगितले जात आहे. वर्षभरापासून ट्रक उलटण्याचे सुरू असणारे सत्र थांबण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत   नाही.