शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

राज्यमार्गावरील सोमावल ते अक्कलकुवा दरम्यान अपघातांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर सोमावल ते मोदलपाडा दरम्यान भरधाव वेगाने जाणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.याबाबत वृत्त असे की, अहमदाबादहून खत निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालाच्या बॅग घेऊन ट्रक (क्रमांक जीजे27  टी-9711) हैद्राबादकडे निघाला होता. रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास राज्यमार्गावरील मोदलपाडा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर सोमावल ते मोदलपाडा दरम्यान भरधाव वेगाने जाणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.याबाबत वृत्त असे की, अहमदाबादहून खत निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालाच्या बॅग घेऊन ट्रक (क्रमांक जीजे27  टी-9711) हैद्राबादकडे निघाला होता. रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास राज्यमार्गावरील मोदलपाडा ते सोमावल गावादरम्यान भरधाव असणारा हा ट्रक उलटला. या ट्रकमध्ये चालक व सहचालक असे दोन जण होते. समोरून येणा:या कंटेनरने साईड न देता कट मारल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत उलटला, अशी माहिती सहचलकाने दिली. अपघाताची भीषणता एवढी होती की, हा ट्रक पूर्णपणे उलटून चारही चाके वरच्या दिशेला झाली. चालक व सहचालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकले. इतर वाहन चालकांनी त्यांना बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात चालक व सहचालक यांना कोणतीही  गंभीर दुखापत झाली नाही. इर्शाद व मोहंमद सैबाझ (दोघे रा.अहमदाबाद, गुजरात) अशू त्यांची नावे   असल्याचे सांगण्यात आले. त्यांना या अपघातात किरकोळ जखमा झाल्या आहेत. सकाळी मोदलपाडा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी किसन वळवी, गुलाबसिंग वसावे यांनी घटनास्थळी जाऊन ट्रकची पाहणी केली.  पुढील पोलीस कार्यवाही केली.अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर तळोदा ते खापर दरम्यान वर्षभरापासून भरधाव ट्रक उलटण्याचे सत्र सुरू आहे. मात्र संबंधित विभागाने पूर्णपणे बघ्याची भूमिका घेतली आहे. दर दिवसाआड राज्यमार्गावरील तळोदा ते खापरदरम्यान अपघात होत आहेत.   2 फेब्रुवारी रोजी जामली फाटय़ाजवळील वळणावर खताचा ट्रक उलटला होता तर 9 मार्च रोजी याचठिकाणी पपईने भरलेला ट्रक उलटल्याने डिङोलची टाकी फुटून ट्रक पेटला होता. अशाप्रकारे दर महिना-पंधरा दिवसांनी तळोदा ते खापर दरम्यान अपघाताचे सत्र नेहमीचे झाले आहे. बेशिस्त वाहतूक व अनियंत्रित वेग, ओव्हरलोड भरलेली वाहने,          अप्रशिक्षित व मद्यपी चालक, परिवहन व पोलीस वाहतूक शाखेचे याकडे असणारे दुर्लक्ष ही या अपघातांच्या मालिकेमागील कारणे असल्याचे सांगितले जात आहे. वर्षभरापासून ट्रक उलटण्याचे सुरू असणारे सत्र थांबण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत   नाही.