शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

राज्यमार्गावरील सोमावल ते अक्कलकुवा दरम्यान अपघातांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर सोमावल ते मोदलपाडा दरम्यान भरधाव वेगाने जाणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.याबाबत वृत्त असे की, अहमदाबादहून खत निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालाच्या बॅग घेऊन ट्रक (क्रमांक जीजे27  टी-9711) हैद्राबादकडे निघाला होता. रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास राज्यमार्गावरील मोदलपाडा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर सोमावल ते मोदलपाडा दरम्यान भरधाव वेगाने जाणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.याबाबत वृत्त असे की, अहमदाबादहून खत निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालाच्या बॅग घेऊन ट्रक (क्रमांक जीजे27  टी-9711) हैद्राबादकडे निघाला होता. रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास राज्यमार्गावरील मोदलपाडा ते सोमावल गावादरम्यान भरधाव असणारा हा ट्रक उलटला. या ट्रकमध्ये चालक व सहचालक असे दोन जण होते. समोरून येणा:या कंटेनरने साईड न देता कट मारल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत उलटला, अशी माहिती सहचलकाने दिली. अपघाताची भीषणता एवढी होती की, हा ट्रक पूर्णपणे उलटून चारही चाके वरच्या दिशेला झाली. चालक व सहचालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकले. इतर वाहन चालकांनी त्यांना बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात चालक व सहचालक यांना कोणतीही  गंभीर दुखापत झाली नाही. इर्शाद व मोहंमद सैबाझ (दोघे रा.अहमदाबाद, गुजरात) अशू त्यांची नावे   असल्याचे सांगण्यात आले. त्यांना या अपघातात किरकोळ जखमा झाल्या आहेत. सकाळी मोदलपाडा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी किसन वळवी, गुलाबसिंग वसावे यांनी घटनास्थळी जाऊन ट्रकची पाहणी केली.  पुढील पोलीस कार्यवाही केली.अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर तळोदा ते खापर दरम्यान वर्षभरापासून भरधाव ट्रक उलटण्याचे सत्र सुरू आहे. मात्र संबंधित विभागाने पूर्णपणे बघ्याची भूमिका घेतली आहे. दर दिवसाआड राज्यमार्गावरील तळोदा ते खापरदरम्यान अपघात होत आहेत.   2 फेब्रुवारी रोजी जामली फाटय़ाजवळील वळणावर खताचा ट्रक उलटला होता तर 9 मार्च रोजी याचठिकाणी पपईने भरलेला ट्रक उलटल्याने डिङोलची टाकी फुटून ट्रक पेटला होता. अशाप्रकारे दर महिना-पंधरा दिवसांनी तळोदा ते खापर दरम्यान अपघाताचे सत्र नेहमीचे झाले आहे. बेशिस्त वाहतूक व अनियंत्रित वेग, ओव्हरलोड भरलेली वाहने,          अप्रशिक्षित व मद्यपी चालक, परिवहन व पोलीस वाहतूक शाखेचे याकडे असणारे दुर्लक्ष ही या अपघातांच्या मालिकेमागील कारणे असल्याचे सांगितले जात आहे. वर्षभरापासून ट्रक उलटण्याचे सुरू असणारे सत्र थांबण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत   नाही.