तळोदा : येथील शिवसेनेतर्फे पक्षाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील ६७८ नागरिकांचा अपघाती विमा काढण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी सेनेच्या अशा स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील कलाल समाज पंचवाडीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राम रघुवंशी, माजी सभापती आकाश पाडवी, जिल्हा संघटक राम वाडीले, तालुकाप्रमुख प्रकाश कुलकर्णी, पीपल्स बँकेचे उपाध्यक्ष गौतम जैन, रूपसिंग पाडवी, हिरालाल कर्णाकर, जगनाथ माळी, छोटू कलाल, ललित जाट, जयप्रकाश परदेशी, व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राम रघुवंशी यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले की, शिवसेना हा पक्ष राजकारणापेक्षा समाजकारणच अधिक करीत असतो. म्हणूनच पक्षाची नाळ समाजाशी जोडली असून, कार्यकर्ते असे समाजपयोगी विधायक उपक्रम राबवित असतात. त्यातही तळोद्यात शिवसेना नेहमीची असे विधायक उपक्रम राबविते. त्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांचेही कौतुक केले आहे. आमशा पाडवी यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी हातात, हात घालून काम करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक उल्हास मगरे यांनी केले तर सूत्रसंचालन आनंद सोनार यांनी केले. यावेळी ६७८ नागरिकांचा दोन लाख रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी शहर प्रमुख जितेंद्र दुबे, संजय पटेल, जगदीश चौधरी, सूरज माळी, कल्पेश सूर्यवंशी, जयेश सूर्यवंशी, विजय मराठे, काशिनाथ कोळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.