शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांपासून पावसाच्या विश्रांतीमुळे पेरण्यांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तीन दिवसांपूर्वी पडलेला पाऊस हा केवळ सातपुड्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तीन दिवसांपूर्वी पडलेला पाऊस हा केवळ सातपुड्यातील दुर्गम भागात झाला होता. त्यामुळे सुसरी व गोमाई नदीला पूर आला होता. पावसाने विश्रांती घेतल्याने पेरण्यांना वेग आला आहे. दरम्यान, गेल्या ४ दिवसांपासून कृषी सेवा केंद्र दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरू राहत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी अडचणीचे ठरत होते.नंदुरबार जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. त्यानंतर मान्सूनच्या सरी या आठवड्यात आल्या होत्या. जिल्ह्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला होता. पेरणीलायक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. आता मात्र तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाचे वातावरण देखील तयार होत नसल्याची स्थिती आहे.शनिवारी दुपारी तर कडकडीत ऊन देखील पडले होते. पावसाच्या उघडीपमुळे मात्र शेतकºयांनी पेरण्यांना वेग दिला आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात २० ते २५ टक्के खरीप क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. दोन ते तीन दिवसात ते प्रमाण ५० टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे.सद्य स्थितीत सर्वाधिक भर हा कापूस लागवडीवर असल्याचे चित्र आहे. त्याखालोखाल सोयाबीन आणि मकाचे क्षेत्र असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.पेरण्यांची लगबग सुरू असल्यामुळे बाजारात बियाणे खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी होत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे बियाण्यांची दुकाने गेल्या ४ दिवसांपासून सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यात येत होती. त्यामुळे चार दिवस शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.औषधी दुकानांप्रमाणेच बियाणे व खतांची दुकाने अर्थात कृषी सेवा केंद्र देखील दिवसभर सुरू ठेवण्याची मागणी कृषी सेवा केंद्र चालकांनी केली होती. परंतु त्याला मान्यता देण्यात आली नव्हती. शनिवारपासून दिवसभर अर्थात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत.