शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

तळोदा पंचायत समितीच्या बैठकीला चार विभागांच्या अनुपस्थितीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST

पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपसभापती लताबाई अर्जुन वळवी होत्या. याप्रसंगी विजय राणा,विक्रम पाडवी,चंदन कुमार पवार, सोनीबई पाडवी,सुमनबाई ...

पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपसभापती लताबाई अर्जुन वळवी होत्या. याप्रसंगी विजय राणा,विक्रम पाडवी,चंदन कुमार पवार, सोनीबई पाडवी,सुमनबाई वळवी, इलाबई पवार, कृषी अधिकारी नरेंद्र महाले,विस्तार अधिकारी आर. के. जाधव, विस्तार अधिकारी महेंद्र वाघ,अभियंता डी. ए. गवळे, डी. जे. गोसावी, पाणीपुरवठ्याचे राहुल गिरासे,आदिवासी विकास विभागाचे एस. डी. वळवी, इमरान पिंजारी आदी उपस्थित होते.

प्रारंभी विभागप्रमुखांनी सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांचा आढावा दिला. सदस्य विजय राणा यांनी सध्या केंद्र शासनाकडून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्याची नोंदणी ऑनलाईन केली जात आहे. तथापि, हा भाग मागास आहे. ऑनलाईन नोंदणी कशी करावी, याचे ज्ञान नागरिकांना नाही. त्यामुळे जनजागृती करण्यात यावी. याशिवाय पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समायोजन करावे, अशी सूचना मांडली. त्याचबरोबर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी प्रत्येक सदस्याने त्यासाठी सहकार्य करण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इतर सदस्यांनीदेखील आपले प्रश्न मांडले. गैरहजर विभागांबाबत असलेले प्रश्न ते उपस्थित नसल्यामुळे सदस्यांना मांडता आले नाही. त्यामुळे त्यांचा गैरहजेरीबाबत नाराजी देखील व्यक्त करण्यात आली. प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक विजय अहिरे यांनी केले.

गैरहजर अधिकाऱ्यांवर ठोस कार्यवाही व्हावी. पंचायत समितीच्या आढावा बैठकीस जनतेच्या समस्यांसाठी निगडित साधारण १५ ते १६ विभागानी उपस्थितीचे पत्र पाच, सहा दिवसांपूर्वी दिले जात असते. परंतु, नेहमी प्रत्येक महिन्याच्या मिटिंगला कोणत्या विभागाचा अधिकारी गैरहजर राहत असतो. असे चित्र पहावयास येत असल्याचे सदस्य सांगतात. या बैठकीस तर एक नव्हे तब्बल चार विभागाचे अधिकारी गैरहजर होते. किंबहुना त्यांनी आपले प्रतिनिधीदेखील पाठविले नव्हते. वास्तविक आढावा बैठकीत ग्रामीण जनतेचे प्रतिनिधी असलेले सदस्य जनतेच्या समस्या पोटतिडकीने मांडतात. मात्र, त्याची कार्यवाहीसाठी संबंधित अधिकारी नसतात. यावरून संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या जबाबदारीचे गांभीर्य दिसून येते. पंचायत समितीकडून त्यांना गैरहजेरीबाबत जाब विचारण्याकरिता नोटिशीचे सोपस्कार पार पाडला जातो. तो थातूर,मातूर उत्तर देवून मोकळा होतो. त्यापुढे त्यांच्यावर काहीच कायदेशीर कारवाई होत नसल्याने आतापर्यंत पंचायत समितीच्या पत्राला केराची टोपली दाखवले जात असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे पंचायत समितीने यापुढे कडक कार्यवाही घेण्याची मागणी केली जात आहे. तरच यावर जरब बसेल. आदिवासी विकास प्रकल्प दोन मिटिंगपासून हजर राहत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

याबाबत गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांना संपर्क केला असता, पंचायत समितीच्या बुधवारच्या बैठकीत चार विभागाचे अधिकारी गैरहजर होते. त्यांना याप्रकरणी नोटिसा काढण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.