शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

व्हिलेज कोड न मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील ५२ गावे विकासापासून वंचित

By मनोज शेलार | Updated: January 27, 2024 17:29 IST

वर्षभरापासून मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गाव विकास रखडला आहे.

मनोज शेलार,नंदुरबार : जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींना महसुली गावांचा दर्जा मिळूनही त्यांना ऑनलाईन प्रणालीतील व्हिलेज कोड मिळाला नसल्याने या गावांना कुठलाही निधी मिळत नसल्याची स्थिती आहे. वर्षभरापासून मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गाव विकास रखडला आहे.

जिल्ह्यातील अति दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांचा विकास जलद गतीने करण्यासाठी जिल्हाभरात ४४ नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. यातील १४ ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात आले आहे. मात्र या प्रक्रियेला एक वर्ष उलटले. तरी देखील या ग्रामपंचायतींना आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या महसुली गावांना अद्यापही व्हिलेज कोड मिळाला नाही. त्याचा विपरीत परिणाम आता गावांच्या विकासावर होताना पहायला मिळत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील मूळ ग्रामपंचायतींतून विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापित झाल्या आहेत. या नवीन स्थापित ग्रा. पं. अंतर्गत जवळपास ५२ महसुली गावे समाविष्ट असून नवीन ग्रामपंचायतीतील महसूल गावाचे व्हिलेज कोड एलजीडी पोर्टलवर व्हॅलिड झाले नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयानुसार १५ वित्त आयोग पीएफएमएस प्रणाली, जीपीडीपी प्रणाली, ऑनलाइन दाखले प्रणाली, ग्रामपंचायत कर्मचारी प्रणाली तसेच अनेक ‘ई’ प्रणालींमध्ये या ग्रामपंचायती उपलब्ध नसल्यामुळे गेल्या एक-दीड वर्षांपासून गावाविकासाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे गावात विकास कामाला ब्रेक लागला असून शासकीय कामे करण्यास खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत आलेला निधी जीपीडीपीनुसार खर्चही करता येत नाही. त्यामुळे एक-दीड वर्षापासून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विविध पायाभूत सुविधांची कामे होत नाहीत. त्यामुळे संबंधित ग्रामस्थ सरपंचांना वेठीस धरत असून या ग्रा.पं.मध्ये काम करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे या महसुली गावांना व्हिलेज कोड तत्काळ द्यावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारgram panchayatग्राम पंचायत