शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

लोक अदालतीत 231 प्रकरणे मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:38 IST

नंदुरबार : जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणतर्फे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत सुमारे सहा हजार दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांवर चर्चा करण्यात येऊन 231 प्रकरणे निकाली काढण्यात आली़ यातून सव्वा कोटी रुपयांची रक्कम ही वसूल करण्यात आली आह़े  जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय वाघवसे, सचिव सतीश मलिये, जिल्हा ...

नंदुरबार : जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणतर्फे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत सुमारे सहा हजार दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांवर चर्चा करण्यात येऊन 231 प्रकरणे निकाली काढण्यात आली़ यातून सव्वा कोटी रुपयांची रक्कम ही वसूल करण्यात आली आह़े  जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय वाघवसे, सचिव सतीश मलिये, जिल्हा न्यायाधीश- वर्ग 1 आऱएस़गुप्ता, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश गुलाबराव पाटील, कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश ज़ेसी़ गुप्ता यांच्या उपस्थितीत ही लोकअदालत जिल्हा न्यायालयात घेण्यात आली होती़ यावेळी गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली़ यावेळी जिल्ह्याच्या विविध भागातून दावेदार उपस्थित होत़े खाजगी पतपुरवठा कंपन्यांसह इतर प्रकरणांवर दीर्घ काळ चर्चा होऊन त्यात समेट करण्यात आला़ येत्या काळातही विधी व सेवा प्राधिकरणकडून हे उपक्रम राबवले जाणार आहेत़ पहिल्या टप्प्यात निकाली निघालेल्या 113 प्रकरणांतून 36 लाख 92 हजार 404 रूपयांची वसुली करण्यात विधी प्राधिकरणाला यश आले आह़े बँकांकडून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या जमिनीतारण, वैयक्तिक, व्यवसाय आणि इतर औद्योगिक स्वरूपाच्या कर्जाची मांडणी करण्यात आली आली़ यातील बहुतांश प्रकरणांवर चर्चा झाल्याने येत्या काळात त्यांच्यात समेट घडण्याची शक्यता वर्तवली जात आह़े निकाली निघालेल्या प्रकरणांनंतरही अद्याप 5 हजार 256 प्रकरणे प्रलंबित आहेत़ या प्रलंबित प्रकरणांवर येत्या सप्टेंबरमध्ये होणा:या लोकअदालतीत चर्चा होण्याची शक्यता आह़े विधी व सेवा प्राधिकरणकडून सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे जिल्ह्यातील  नागरिकांकडून या शिबिरांमध्ये येण्याची तयारी दर्शवण्यात आली होती़ त्यानुसार हे कामकाज करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े राष्ट्रीय लोक अदालतीच्या पहिल्या टप्प्यात बँकेशी संबंधित थकीत कर्जाची 2 हजार 459 प्रकरणे मांडण्यात आली होती़ यातून 17 प्रकरणांमध्ये दावेदार बँक आणि थकबाकीदार यांच्यात समझोता होऊन 33 लाख 64 हजार 521 रूपयांची वसुली झाली़ वीज कंपनीतर्फे विजबिलांची 1 हजार 143 प्रकरणे मांडण्यात आली़ यात 19 प्रकरणे निकाली निघाली यातून 1 लाख 35 हजार 679 रूपयांची वसुली झाली़ विविध ग्रामपंचायती, नगरपालिका क्षेत्रातील थकीत पाणीपट्टीची 565 प्रकरणांवर चर्चा झाली़ यातून 48 प्रकरणे निकाली काढण्यात येऊन 92 हजार 731 रुपयांची वसुली झाली़ इतर फौजदारी, कौटूंबिक आणि दिवाणी स्वरूपाची 1 हजार 202 प्रकरणे मांडण्यात आली होती़ यावर चर्चा झाल्यानंतर त्यातील 29 प्रकरणांवर समझोता होऊनन त्यातून 99 हजार 473 रूपयांची वसुली करण्यात आली़ यावेळी दावेदार, थकबाकीदार यांच्यासह कौटूंबिक आणि फौजदारी प्रकरणातील वादी आणि प्रतीवादी यांनी आपपल्या बाजू विधी प्राधिकरणासमोर मांडल्याने ही प्रकरणी मार्गी लागली आहेत़