शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

विचारांचा विकास झाला तर हमखास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 11:02 IST

टीटीएसएफतर्फे महामेळावा : सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाकडून पंप मिळाला, गिरणी, पाईप मिळाले किंवा शिकून नोकरी केली, घर बांधलं म्हणजे विकास झाला, असं नाही, सर्वात आधी विचारांचा विकास झाला की मग कोणत्याही क्षेत्रात हमखास यश मिळवता येतं, असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांनी केल़े ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशनतर्फे नंदुरबार येथे झालेल्या आदिवासी युवा स्पर्धा परीक्षा महामेळाव्यात ते बोलत होत़े अध्यक्षस्थानी ग्रँट मेडिकल कॉलेजचे सेवानिवृत्त प्रशासनाधिकारी डी़एस़वसावे तर प्रमुख अतिथी म्हणून दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेद्र महाजन, आयआरएस अजय खर्डे उपस्थित होत़े प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते याहामोगी देवीच्या प्रतिमेचे पूजन झाल़े भिल्ल समाजात पहिले जिल्हाधिकारी असा मान मिळवणा:या डॉ़ राजेंद्र भारूड यांनी उपस्थित 10 हजार विद्याथ्र्यासोबत दिलखुलास संवाद साधला़ प्रसंगी डॉ़ भारूड म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात काम करत असताना, किनवट येथील बोगस आदिवासींचे प्रकरण बाहेर काढले, यात मोर्चे आणि उपोषणांना सामोरे गेलो, अशा वेळी मनात एकच विचार होता़ मूळ आदिवासींना न्याय मिळवून द्यायचा, त्यासाठी लढलो आणि यशस्वीही झालो़ आदिवासी हा जंगलाचा राजा असतो, हे कायम ध्यानी ठेवलं, कधी कोणापुढे हात पसरला नाही़ यश मिळवायचं असेल तर त्याने मी कशात कमी पडलो याचा शोघ घेतला पाहिज़े आत्मपरीक्षण करून काय कमी आहे, ते शोधून त्यात संकल्पाचं बीज पेरावं़ मला काय व्हायचं आहे हे ठरवलं पाहिजे, त्यातून बदल घडवून आणला पाहिज़े ब:याच वेळा असं आदिवासी गाव पाडय़ावरून आलो म्हणून मुलं स्वत:ला कमी लेखतात पण ज्याने निसर्गासोबत दोन हात केले, समस्या सोडवल्या त्याला शहरी समस्यांची भिती नसावी, स्पर्धा परीक्षा किंवा इतर तत्सम ठिकाणी यश मिळवण्यासाठी केलेल्या संकल्पाला उत्साहाची जोड दिल्यास तुम्हीच तुमचे शिल्पकार होणार असेही शेवटी डॉ़ भारूड म्हणाल़े कार्यक्रमास डॉ़ भरत वळवी, डॉ़ राजेश वळवी, इंजि़ जेलसिंग पावरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े नंदुरबारसह धुळे जिल्ह्यातील 10 हजार युवक, युवती, महिला व आदिवासी समाजबांधव  हजर होत़े मंचावर डॉ़ भारूड यांच्या मातोश्री यांचे ‘लोकमत’ने प्रकाशित केलेले मातृतदिनाचे ‘विशेषवृत्त’ पोस्टर रूपात लावण्यात आले होत़े