शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

मेहनतीच्या जोरावर अभयची राष्ट्रीय स्तरावर ‘उंचउडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 11:52 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आलेल्या परिस्थितीला सामोरे जात आपल्या आवडत्या खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी संघर्ष करीत ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आलेल्या परिस्थितीला सामोरे जात आपल्या आवडत्या खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी संघर्ष करीत यशाला गवसणी घालणारा नंदुरबारातील उंचउडीपटू अभय गुरव याची संघर्षाची गाथा काही औरच आहे. खेलो इंडिया स्पर्धेत तो गुवाहटी येथे राज्याचे प्रतिनिधीत्व करीत असून खेळाच्या माध्यमातूनच त्याची आर्मी पोस्टमध्ये निवड झाली आहे. अशा प्रकारे निवड होणारा तो जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरला आहे.एखादे ध्येय प्राप्त करावयाचे असल्यास त्यात तण-मनाने मेहनत घेतली पाहिजे. परिस्थितीचा बाऊ न करता ध्येय शिखर गाठले पाहिजे. त्यातून जे यश मिळते त्याचा आनंद काही औरच असतो. नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथील मुळचा अभय गुरव या उंचउडी पटूने हे सिद्ध करून दाखविले आहे.घरची परिस्थिती जेमतेम, वडिल दुसऱ्या शेतात सालदरकी करणारे. अभयच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नाही म्हणून त्याला शिरपूरच्या एका होस्टेलमध्ये ठेवले. तेथून शिक्षण घेवून आल्यावर नंदुरबारात शिकण्यासाठी येवू लागला. घर चालविण्यासाठी स्वत: शेतात कामाला जावू लागला. खोंडामळी ते नंदुरबार ये-जा करण्यासाठी एस.टी.पासचा खर्च परवडत नसल्याने एकवेळ त्याने शाळाच सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु ‘इच्छा तेथे मार्ग’ या उक्तीप्रमाणे त्याला प्रा.डॉ.मयूर ठाकरे यांच्या माध्यमातून मार्ग सापडला आणि त्याने आपले पुढचे ध्येय साध्य केले.मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर ध्येय गाठणे सहज शक्य असते. त्यासाठी मात्र मनाची तयारी असावी. अभय हे त्याचेच एक उदाहरण असून तरुण खेळांडूपुढे तो एक चांगला आयडॉल ठरू शकणार आहे.४अभय गुरव यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथे शिक्षण घेत असतांना खोंडामळी गावातून नंदुरबार शहरात दररोज ये जा करूय होता. त्याला आर्थिक खर्च परवडत नसल्याने त्याने आता शिक्षणच बंद करावे असा निर्णय घेतला. परंतु शालेय मैदानी स्पर्धांच्या वेळी क्रिडा शिक्षक डॉॅ. मयूर ठाकरे यांच्याशी त्यांची भेट झाली. त्याच्यातील तळमळ, काही करून दाखविण्याची जिद्द पाहून डॉ.ठाकरे यांनी त्याला दर महिन्याला एस.टी.बस पास काढून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचे गावाहून नंदुरबारात येणे-जाणे सुकर झाले. शिवाय नंदुरबारात एका दुकानावर कामालाही तो लागला. हे सर्व करीत असतांना जिल्हा क्रिडा संकुलात त्याने डॉ.ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उंच उडीच्या सरावाला सुरुवात केली. खेळातील बारकावे त्याला मिळाले. त्यातून तो बरेच काही शिकला. आपण काहीतरी करून दाखवू शकतो हे त्याला कळून चुकले आणि कठोर मेहनतीला सुरुवात केली. शालेय स्पर्धांमध्ये तो चमकू लागला. राज्यस्तरावर त्याची निवड झाली.उंच उडी खेळासाठी पायात बुट नव्हते. शिवाय यासाठी कोणत्या प्रकारचे बूट लागतात हे देखील माहिती नव्हते. स्वत: कमवून त्याने बूट घेतले. इतर साहित्य मिळविले. शालेय राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले. राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत उंच उडी क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावले या कामगिरीच्या जोरावर अभयची आर्मी पोस्टमध्ये निवड झाली. जिल्ह्यातून तो एकमेव खेळाडू ठरला आहे. आता सुरू असलेल्या गोहाटी येथील खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत आहे.