शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यावर आभाळमाया यंदा आटलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हावासीयांवरील आभाळमाया यंदा आटली आहे. सरासरीचा ३५ टक्के कमी पाऊस झाला आहे. दरवर्षी जुलै ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हावासीयांवरील आभाळमाया यंदा आटली आहे. सरासरीचा ३५ टक्के कमी पाऊस झाला आहे. दरवर्षी जुलै अखेर किमान ६० टक्केपेक्षा अधीक पावसाची सरासरी जाते. यंदा ती ४० टक्केवर अडकली आहे. येत्या दीड महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर दुष्काळी परिस्थिती ओढावणार आहे. दरम्यान, असे असले तरी जिल्ह्यात वेळेवर आणि पिकांना आवश्यक त्या वेळी पाऊस आल्याने पिकांची स्थिती आजच्या परिस्थितीत समाधानकारक आहे.जिल्ह्यात यंदा जून महिन्यात वेळेवर पाऊस झाला. दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पेरणीलायक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या होत्या. त्यानंतरही वेळेवर अर्थात पिकांना जीवदान मिळण्यापुरता पाऊस येत गेल्याने पीकस्थिती समाधानकारक आहे. परंतु पावसाची तूट दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सद्य स्थितीत तूट ३५ टक्केपर्यंत वाढली आहे. ती येत्या काळात भरून निघणे अपेक्षीत आहे.शहादा सर्वाधिकतर धडगाव सर्वात कमीजिल्ह्यात सद्य स्थितीत शहादा तालुक्यात सर्वाधिक ५२ तर धडगाव तालुक्यात सर्वात कमी २७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नवापूर तालुक्यात देखील कमी पाऊस नोंदला गेला आहे. नवापूर तालुक्यात ३४ टक्के, तळोदा तालुक्यात ४० टक्के, नंदुरबार तालुक्यात ४२ तर अक्कलकुवा तालुक्यात ४८ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पावसाची तूट ही धडगाव व नवापूर तालुक्यात आहे.नदी-नाले कोरडेचदमदार आणि भिज पाऊस झाला नसल्याने अद्यापही जिल्ह्यातील अनेक नदी, नाले, कोरडेच आहेत. गोमाई आणि सुसरी नदी सोडली तर एकाही नदीला पूर आलेला नाही. या दोन्ही नद्या सातपुड्यात उगम पावतात आणि सपाटीवरील भागातून वाहत असल्यामुळे पहाडपट्टीत झालेल्या पावसाने या नद्यांना दोन वेळा पूर आलेला आहे. जिल्ह्यातील इतर कुठल्याही नदीला किंवा नाल्याला पूर स्थिती निर्माण झालेली नाही.प्रकल्प तहानलेलेचजिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम प्रकल्प तहानलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात ३६ लघु व चार मध्यम प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्प मिळून सद्य स्थितीत केवळ ३० टक्के पाणीसाठा आहे. नंदुरबार शहराला ३० टक्के पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणात आधीच ४० ते ५० टक्के गाळ साचला आहे. धरण बांधल्यापासून येथील गाळ काढला गेलेला नाही. त्यामुळे कमी पावसात देखील आंबेबारा धरण आता गेल्या काही वर्षात ओव्हरफ्लो होऊ लागले आहे. याशिवाय ७० टक्के पाणी पुरवठा करणाºया विरचक प्रकल्पात देखील पाणीसाठा झालेला नाही. गेल्या वर्षी विरचक पुर्ण क्षमतेने भरले होते. आता या धरणात ४० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. या नदीवरील खोलघर धरण ओव्हरफ्लो झाल्याशिवाय विरचकमध्ये पाणी येणार नसल्याने खोलघर धरण भरण्याची वाट पाहिली जात आहे. राणीपूर, दरा, रंगावली हे प्रकल्प देखील तहानलेलेच आहेत.प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे दरवाजे दरवर्षी जुलै अखेर पुर्णपणे उघडले जातात. यंदा बॅरेजचे दरवाजे अद्याप पुर्ण उघडलेले नाहीत.