शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यावर आभाळमाया यंदा आटलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हावासीयांवरील आभाळमाया यंदा आटली आहे. सरासरीचा ३५ टक्के कमी पाऊस झाला आहे. दरवर्षी जुलै ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हावासीयांवरील आभाळमाया यंदा आटली आहे. सरासरीचा ३५ टक्के कमी पाऊस झाला आहे. दरवर्षी जुलै अखेर किमान ६० टक्केपेक्षा अधीक पावसाची सरासरी जाते. यंदा ती ४० टक्केवर अडकली आहे. येत्या दीड महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर दुष्काळी परिस्थिती ओढावणार आहे. दरम्यान, असे असले तरी जिल्ह्यात वेळेवर आणि पिकांना आवश्यक त्या वेळी पाऊस आल्याने पिकांची स्थिती आजच्या परिस्थितीत समाधानकारक आहे.जिल्ह्यात यंदा जून महिन्यात वेळेवर पाऊस झाला. दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पेरणीलायक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या होत्या. त्यानंतरही वेळेवर अर्थात पिकांना जीवदान मिळण्यापुरता पाऊस येत गेल्याने पीकस्थिती समाधानकारक आहे. परंतु पावसाची तूट दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सद्य स्थितीत तूट ३५ टक्केपर्यंत वाढली आहे. ती येत्या काळात भरून निघणे अपेक्षीत आहे.शहादा सर्वाधिकतर धडगाव सर्वात कमीजिल्ह्यात सद्य स्थितीत शहादा तालुक्यात सर्वाधिक ५२ तर धडगाव तालुक्यात सर्वात कमी २७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नवापूर तालुक्यात देखील कमी पाऊस नोंदला गेला आहे. नवापूर तालुक्यात ३४ टक्के, तळोदा तालुक्यात ४० टक्के, नंदुरबार तालुक्यात ४२ तर अक्कलकुवा तालुक्यात ४८ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पावसाची तूट ही धडगाव व नवापूर तालुक्यात आहे.नदी-नाले कोरडेचदमदार आणि भिज पाऊस झाला नसल्याने अद्यापही जिल्ह्यातील अनेक नदी, नाले, कोरडेच आहेत. गोमाई आणि सुसरी नदी सोडली तर एकाही नदीला पूर आलेला नाही. या दोन्ही नद्या सातपुड्यात उगम पावतात आणि सपाटीवरील भागातून वाहत असल्यामुळे पहाडपट्टीत झालेल्या पावसाने या नद्यांना दोन वेळा पूर आलेला आहे. जिल्ह्यातील इतर कुठल्याही नदीला किंवा नाल्याला पूर स्थिती निर्माण झालेली नाही.प्रकल्प तहानलेलेचजिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम प्रकल्प तहानलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात ३६ लघु व चार मध्यम प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्प मिळून सद्य स्थितीत केवळ ३० टक्के पाणीसाठा आहे. नंदुरबार शहराला ३० टक्के पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणात आधीच ४० ते ५० टक्के गाळ साचला आहे. धरण बांधल्यापासून येथील गाळ काढला गेलेला नाही. त्यामुळे कमी पावसात देखील आंबेबारा धरण आता गेल्या काही वर्षात ओव्हरफ्लो होऊ लागले आहे. याशिवाय ७० टक्के पाणी पुरवठा करणाºया विरचक प्रकल्पात देखील पाणीसाठा झालेला नाही. गेल्या वर्षी विरचक पुर्ण क्षमतेने भरले होते. आता या धरणात ४० टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. या नदीवरील खोलघर धरण ओव्हरफ्लो झाल्याशिवाय विरचकमध्ये पाणी येणार नसल्याने खोलघर धरण भरण्याची वाट पाहिली जात आहे. राणीपूर, दरा, रंगावली हे प्रकल्प देखील तहानलेलेच आहेत.प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे दरवाजे दरवर्षी जुलै अखेर पुर्णपणे उघडले जातात. यंदा बॅरेजचे दरवाजे अद्याप पुर्ण उघडलेले नाहीत.