शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

97 पाणी योजनांची वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 11:30 IST

ग्रामिण पाणी पुरवठा योजना : जिल्ह्यात 853 योजनांची 34 कोटी थकबाकी

ठळक मुद्दे100 मिटरमध्ये आढळली फेरफार
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विजेसंदर्भात तक्रार निवारण कक्ष किंवा ग्राहक गा:हाणे निवारण मंच यांच्याकडे न्याय न मिळाल्यास थेट विद्युत लोकपालाकडे धाव घेता येणार आहे. तेथे दोन महिन्याच्या आत तक्रार निकाली निघणार असल्याची माहिती विद्युत लोकपाल आर.डी.संख्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठाच्या 97 योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली. विद्युत लोकपाल आर.डी.संख्ये यांच्या उपस्थितीत नंदुरबार सर्कलमधील ग्राहकांच्या तक्रारींसदर्भात संवाद घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता आर.एम.चव्हाण, कार्यकारी अभियंता अनिल पाटील, लोकपालचे सदस्य दिलीप डुंबरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पंजाबराव बोरसे, एम.बी.गांगोडे आदी उपस्थित होते. 34 कोटींची थकबाकीनंदुरबार सर्कलमध्ये 853 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची तब्बल 34 कोटी 33 लाख 76 हजार रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी न भरणा:या योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. त्यानुसार महिनाभरापूर्वी 97 योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडील एकुण थकबाकी पाच कोटी दोन लाख 33 हजार इतकी होती.नंदुरबार उपविभागाअंतर्गत एकुण 462 ग्रामिण पाणी पुरवठा योजना आहेत. त्यांच्याकडे 16 कोटी सहा लाख 24 हजार 886 रुपये थकबाकी आहे तर शहादा उपविभागात 391 योजनांची 18 कोटी 27 लाख 51 हजार 916 रुपये थकबाकी आहे. यासंदर्भातील योजनांची यादी जिल्हाधिका:यांकडे देण्यात आली असून एकाच वेळी एवढय़ा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन घेतले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.ऑनलाईवर भरवीज कंपनीचा कारभार आता पेपरलेसकडे जात आहे. त्यामुळे विविध मोबाईल अॅप्स, वेबसाईट, ऑनलाईन या माध्यमातून कारभार सुरू आहे. ग्राहकांना वीज बील भरण्यासाठी अॅप्स आणि ऑनलाईनचा पर्याय आहे. मिटर रिडिंगच्या तक्रारी कमी करण्यासाठी मोबाईलनंबर नोंद केल्यास त्या मोबाईलवर मिटर रिडींगची नोंद पाठविली जाते. बीलचा मेसेज देखील मोबाईलवर दिला जातो. मोबाईलवर मेसेज दाखवून बील भरणा केंद्रांवर बिल स्विकारले जाते. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण यापुढे कमी राहणार असल्याचेही संख्ये यांनी यावेळी सांगितले.