शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

तीन वर्षात ९२ जणांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 11:51 IST

तळोदा ते खापर : अपघातांच्या घटनांमध्ये वाढ, उपाय योजना आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : मागील तीन वर्षात राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यान १२८ अपघात झाले आहेत़ यात, तब्बल ९२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे़ तर १७५ जण जखमी झाल्याची माहिती आहे़नेत्रंग-शेवाडी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यान सुरू असणारे अपघातांचे सत्र थांबायचे नाव घेत नसून या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लागणे गरजेचे आहे़ दरम्यान देवमोगरा यात्रेसाठी जाणाऱ्या व दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची वाहतूक सुरक्षादेखील वाºयावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा तालुक्यातील राजमोही फाट्याजवळ दुचाकीला कारने धडक दिल्यामुळे दोघे शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती़ लगेच दुसºया दिवशी शनिवारी तळोदा तालुक्यातील बुधावली येथे दुचाकीच्या अपघातात एज जण जागीच ठार झाला होता़ त्यानंतर दोन मोटार सायकली एकमेकांवर आदळून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, देवमोगरा येथे मातेचे दर्शनासाठी जाणाºया भंगारबर्डी ता.शिरपूर येथील चैत्राम पावरा व शेगा पावरा यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला होता़ याशिवाय दुचाकी व पादचारी यात्रेकरूंना दररोज बेशिस्त, भरधाव व अनियंत्रित वाहनांमुळे लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकारांमुळे देवमोगरा यात्रेकरूंच्या वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ यात्रेकरूंची वाहतूक सुरक्षा वाºयावर असल्याचे दिसून येत आहे.नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यानचा रस्ता हा महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात या तीन राज्यांना जोडणारा असून दिवसभर शेकडो वाहनांची वर्दळ या दरम्यान असते. अनियंत्रित व भरधाव धावणारी वाहने, बेशिस्त व अप्रशिक्षित चालक यामुळे या महामार्गावर दररोजचे अपघात होताना दिसून येत आहेत. सध्या गुजरात राज्यातील आदिवासी बांधवांची कुलदेवता असलेल्या देवमोगरा मातेचा यात्रोत्सव सुरू आहे़ यानिमित्त दररोज शेकडो भाविक या मार्गावरुन ये-जा करत आहेत. या राष्ट्रीय महामार्गावर धावणाºया शेकडो अवजड वाहनांमुळे यात्रेकरूंच्या वाहतूक सुरक्षिततेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरवर्षी देवमोगरा यात्रेसाठी येणाºया भाविकांना अपघाताला सामोरे जावे लागते. अनेकांना तर जीव गमवावा लागत असतो़ यावर्षीदेखील या अपघातांच्या मालिकांची पुनरावृत्ती होत असून यंदा दोन भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक अपघातांची पोलीसात नोंद आहे तर अनेक जण धार्मिक कार्यात पोलिस व इतर गोष्टींचा ससेमिरा नको म्हणून अपघातांची नोंद करणे टाळतात. यात्रा कालावधीत प्रशासनाकडून यात्रेकरूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असताना कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून येत आहे. तसेच संपूर्ण वर्षभर राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यान अपघातांची मालिका सुरूच असते. यात , मोठ्या संख्येने अवजड वाहनांमुळे अपघात होत असतात़अंकलेश्वर-बºहाणपुर आंतरराज्य महामार्गावरील तळोदा ते गुजरात पर्यंतच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर आतापर्यंत रुंदीकरणाचे काम करण्यात आलेले नाही़ केवळ राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन फलक लावण्यात आलेले आहेत़ या मार्गावर क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने वाहने दररोज धावत असून इतर प्रवाशांना प्रवास करणे जिकरीचे झालेले आहे़ त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करून सुरक्षा उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. परंतु याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे़