शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

तीन वर्षात ९२ जणांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 11:51 IST

तळोदा ते खापर : अपघातांच्या घटनांमध्ये वाढ, उपाय योजना आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : मागील तीन वर्षात राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यान १२८ अपघात झाले आहेत़ यात, तब्बल ९२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे़ तर १७५ जण जखमी झाल्याची माहिती आहे़नेत्रंग-शेवाडी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यान सुरू असणारे अपघातांचे सत्र थांबायचे नाव घेत नसून या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लागणे गरजेचे आहे़ दरम्यान देवमोगरा यात्रेसाठी जाणाऱ्या व दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची वाहतूक सुरक्षादेखील वाºयावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा तालुक्यातील राजमोही फाट्याजवळ दुचाकीला कारने धडक दिल्यामुळे दोघे शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती़ लगेच दुसºया दिवशी शनिवारी तळोदा तालुक्यातील बुधावली येथे दुचाकीच्या अपघातात एज जण जागीच ठार झाला होता़ त्यानंतर दोन मोटार सायकली एकमेकांवर आदळून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, देवमोगरा येथे मातेचे दर्शनासाठी जाणाºया भंगारबर्डी ता.शिरपूर येथील चैत्राम पावरा व शेगा पावरा यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला होता़ याशिवाय दुचाकी व पादचारी यात्रेकरूंना दररोज बेशिस्त, भरधाव व अनियंत्रित वाहनांमुळे लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकारांमुळे देवमोगरा यात्रेकरूंच्या वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ यात्रेकरूंची वाहतूक सुरक्षा वाºयावर असल्याचे दिसून येत आहे.नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यानचा रस्ता हा महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात या तीन राज्यांना जोडणारा असून दिवसभर शेकडो वाहनांची वर्दळ या दरम्यान असते. अनियंत्रित व भरधाव धावणारी वाहने, बेशिस्त व अप्रशिक्षित चालक यामुळे या महामार्गावर दररोजचे अपघात होताना दिसून येत आहेत. सध्या गुजरात राज्यातील आदिवासी बांधवांची कुलदेवता असलेल्या देवमोगरा मातेचा यात्रोत्सव सुरू आहे़ यानिमित्त दररोज शेकडो भाविक या मार्गावरुन ये-जा करत आहेत. या राष्ट्रीय महामार्गावर धावणाºया शेकडो अवजड वाहनांमुळे यात्रेकरूंच्या वाहतूक सुरक्षिततेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरवर्षी देवमोगरा यात्रेसाठी येणाºया भाविकांना अपघाताला सामोरे जावे लागते. अनेकांना तर जीव गमवावा लागत असतो़ यावर्षीदेखील या अपघातांच्या मालिकांची पुनरावृत्ती होत असून यंदा दोन भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक अपघातांची पोलीसात नोंद आहे तर अनेक जण धार्मिक कार्यात पोलिस व इतर गोष्टींचा ससेमिरा नको म्हणून अपघातांची नोंद करणे टाळतात. यात्रा कालावधीत प्रशासनाकडून यात्रेकरूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असताना कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून येत आहे. तसेच संपूर्ण वर्षभर राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यान अपघातांची मालिका सुरूच असते. यात , मोठ्या संख्येने अवजड वाहनांमुळे अपघात होत असतात़अंकलेश्वर-बºहाणपुर आंतरराज्य महामार्गावरील तळोदा ते गुजरात पर्यंतच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर आतापर्यंत रुंदीकरणाचे काम करण्यात आलेले नाही़ केवळ राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन फलक लावण्यात आलेले आहेत़ या मार्गावर क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने वाहने दररोज धावत असून इतर प्रवाशांना प्रवास करणे जिकरीचे झालेले आहे़ त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करून सुरक्षा उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. परंतु याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे़