शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षात ९२ जणांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 11:51 IST

तळोदा ते खापर : अपघातांच्या घटनांमध्ये वाढ, उपाय योजना आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : मागील तीन वर्षात राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यान १२८ अपघात झाले आहेत़ यात, तब्बल ९२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे़ तर १७५ जण जखमी झाल्याची माहिती आहे़नेत्रंग-शेवाडी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यान सुरू असणारे अपघातांचे सत्र थांबायचे नाव घेत नसून या ठिकाणी वाहतुकीला शिस्त लागणे गरजेचे आहे़ दरम्यान देवमोगरा यात्रेसाठी जाणाऱ्या व दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची वाहतूक सुरक्षादेखील वाºयावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा तालुक्यातील राजमोही फाट्याजवळ दुचाकीला कारने धडक दिल्यामुळे दोघे शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती़ लगेच दुसºया दिवशी शनिवारी तळोदा तालुक्यातील बुधावली येथे दुचाकीच्या अपघातात एज जण जागीच ठार झाला होता़ त्यानंतर दोन मोटार सायकली एकमेकांवर आदळून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, देवमोगरा येथे मातेचे दर्शनासाठी जाणाºया भंगारबर्डी ता.शिरपूर येथील चैत्राम पावरा व शेगा पावरा यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला होता़ याशिवाय दुचाकी व पादचारी यात्रेकरूंना दररोज बेशिस्त, भरधाव व अनियंत्रित वाहनांमुळे लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. या सर्व प्रकारांमुळे देवमोगरा यात्रेकरूंच्या वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ यात्रेकरूंची वाहतूक सुरक्षा वाºयावर असल्याचे दिसून येत आहे.नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यानचा रस्ता हा महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात या तीन राज्यांना जोडणारा असून दिवसभर शेकडो वाहनांची वर्दळ या दरम्यान असते. अनियंत्रित व भरधाव धावणारी वाहने, बेशिस्त व अप्रशिक्षित चालक यामुळे या महामार्गावर दररोजचे अपघात होताना दिसून येत आहेत. सध्या गुजरात राज्यातील आदिवासी बांधवांची कुलदेवता असलेल्या देवमोगरा मातेचा यात्रोत्सव सुरू आहे़ यानिमित्त दररोज शेकडो भाविक या मार्गावरुन ये-जा करत आहेत. या राष्ट्रीय महामार्गावर धावणाºया शेकडो अवजड वाहनांमुळे यात्रेकरूंच्या वाहतूक सुरक्षिततेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरवर्षी देवमोगरा यात्रेसाठी येणाºया भाविकांना अपघाताला सामोरे जावे लागते. अनेकांना तर जीव गमवावा लागत असतो़ यावर्षीदेखील या अपघातांच्या मालिकांची पुनरावृत्ती होत असून यंदा दोन भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक अपघातांची पोलीसात नोंद आहे तर अनेक जण धार्मिक कार्यात पोलिस व इतर गोष्टींचा ससेमिरा नको म्हणून अपघातांची नोंद करणे टाळतात. यात्रा कालावधीत प्रशासनाकडून यात्रेकरूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असताना कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून येत आहे. तसेच संपूर्ण वर्षभर राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते खापर दरम्यान अपघातांची मालिका सुरूच असते. यात , मोठ्या संख्येने अवजड वाहनांमुळे अपघात होत असतात़अंकलेश्वर-बºहाणपुर आंतरराज्य महामार्गावरील तळोदा ते गुजरात पर्यंतच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर आतापर्यंत रुंदीकरणाचे काम करण्यात आलेले नाही़ केवळ राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन फलक लावण्यात आलेले आहेत़ या मार्गावर क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने वाहने दररोज धावत असून इतर प्रवाशांना प्रवास करणे जिकरीचे झालेले आहे़ त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करून सुरक्षा उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. परंतु याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे़