शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

91 लाख वृक्ष लागवडीसाठी सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:20 IST

वसंत मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : वृक्षारोपण अभियानासाठी वनविभागाने सुसज्ज तयारी केली  आहे. वनविभागाबरोबरच इतर सर्व यंत्रणांच्या ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : वृक्षारोपण अभियानासाठी वनविभागाने सुसज्ज तयारी केली  आहे. वनविभागाबरोबरच इतर सर्व यंत्रणांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरात साधारण 91 लाख 50 हजार विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन असल्याचे अभियानाच्या जिल्हा समन्वयकांनी सांगितले. दरम्यान, यासाठी रोपेही उपलब्ध झाले आहेत.हरित महाराष्ट्रासाठी गेल्या दोन वर्षापासून वनविभागामार्फत वृक्षारोपण अभियान सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या या अभियानामुळे निदान 50 ते 60 टक्के वृक्ष तरी जगत आहेत. साहजिकच बेसुमार वृक्षतोडीने  बोडका झालेल्या सातपुडय़ाला काही प्रमाणात गतवैभव प्राप्त होत आहे.यंदाही जुलै महिन्यापासून संपूर्ण राज्यभरात वनविभाग वृक्षारोपण अभियान राबविणार आहे. या अनुषंगानेच जिल्हा वनविभागानेही अभियानासाठी सुसज्ज तयारी केली आहे. सामाजिक वनीकरण, मेवासी वनविभाग, ग्रामपंचायती व इतर सर्व शासकीय यंत्रणांना सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विविध प्रजातींच्या साधारण 91 लाख 45 हजार वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी वनविभागाबरोबरच संबंधित यंत्रणांनी आपले आवार, रस्त्यांच्या दुतर्फा, वनविभागाचे कूप याठिकाणी खड्डेही तयार केले आहेत. वनविभाग व सामाजिक वनीकरण या दोन्ही यंत्रणांनी दोन नर्सरी उभारल्या असून तेथून साधारण एक कोटी सहा लाख रोपे उपलब्ध केली आहेत. त्यामुळे रोपांची अडचण येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र यासाठी मोठय़ा प्रमाणात लोकसहभागाची आवश्यकता आहे. तशी अपेक्षाही वृक्षप्रेमींनी व्यक्त केली आहे.विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवडयेत्या 1 जुलैपासून सुरू होणा:या वृक्षारोपण अभियानात प्रामुख्याने  महू, आवळा, जांभूळ, चिंच, चारोळी, बांबू, साग, सिसम, बोर, लिंब, खैर, गुलमोहर, आंबा, सीताफळ, खिरणी आदी वेगवेगळ्या 50 ते 55 प्रजातींची लागवड  करण्यात येणार आहे. यासाठी  खुद्द वनविभाग व सामाजिक  वनीकरण या दोन्ही यंत्रणांनी  प्रशस्त अशा रोपवाटिका तयार केल्या आहेत. या नर्सरीमधून जवळपास सव्वा कोटी वृक्षांची रोपेही उपलब्ध आहेत. जेथे ज्या रोपांची मागणी होईल त्याप्रकारची रोपे संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त सीताफळ, आंबा, महू, साग या प्रजातींची रोपे तयार केली आहेत. कारण या वृक्षांपासून आदिवासींना रोजगारही उपलब्ध होणार आहे. गेल्यावर्षीही याच वृक्षाची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.गेल्यावर्षाची 70 टक्केझाडे जगल्याचा दावागेल्यावर्षी वनविभागाकडून लागवड करण्यात आलेल्या वृक्षांपैकी 70 टक्के झाडे जगल्याचा दावा वनविभागाने केला आहे. परंतु हा वनविभागाचा दावा असला तरी प्रत्यक्षात हा दावा कितपत खरा आहे याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. कारण इतर यंत्रणांमार्फत लावण्यात आलेली झाडे केव्हाच नष्ट झाली आहे. तेथे केवळ खड्डय़ांचेच अस्तित्व दिसून येत आहे. तळोदा येथील प्रशासकीय इमारतीच्या आवारात गेल्यावर्षी प्रशासनाने वृक्षारोपण केले होते. पाण्याअभावी ती वृक्ष नाहीशी झाली. आज तेथे केवळ सांगाडेच पडले आहेत. वास्तविक वृक्ष लागवडीसाठी शासन लाखो रुपये खर्च करीत असते. शिवाय अभियानाबाबत अतिशय संवेदनशील असताना दुसरीकडे शासनाचीच यंत्रणा किती असंवेदनशील आहे याचे वास्तव चित्र तळोदा प्रशासकीय इमारतीच्या बाहेरील वृक्षांबाबत दिसून येते.  वृक्ष संवर्धनाबाबत प्रशासनाच्या  अशा असंवेदनशील वृत्तीबाबत वृक्षप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यंदाच्या वर्षात वनविभाग, 39 लाख 60 हजार, सामाजिक वनीकरण 20 लाख पाच हजार, मेवासी वनविभाग 15 लाख 45 हजार, ग्रामपंचायत विभाग 19 लाख पाच हजार आणि इतर शासकीय यंत्रणा पाच लाख 40 हजार झाडे लावणार आह़े