शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
3
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
4
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
5
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
6
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
7
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
8
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
9
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
10
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
11
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
12
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
14
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
15
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
16
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
18
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
19
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
20
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी

जिल्ह्यातील 88 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुष्काळ छायेत असलेल्या शेतक:यांना पावसाने दिलासा दिल्याने 88 टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुष्काळ छायेत असलेल्या शेतक:यांना पावसाने दिलासा दिल्याने 88 टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ पावसामुळे उत्साह दुणावल्याने शेतक:यांनी कापसासह इतर खरीप पिकांची पेरणी करण्यास वेग दिला असल्याने येत्या दोन दिवसात किमान 101 टक्के शेतीक्षेत्रात पूर्ण होण्याची शक्यता आह़े  गेल्या वर्षी अल्पपजर्न्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागल्याने शेतकरी हैराण झाले होत़े यंदा जून महिन्याच्या मध्यात पावसाने यथातथा हजेरी लावल्याने चिंता वाढल्या होत्या़ यामुळे शेतशिवारात पेरण्यांची स्थिती बिकट होती़ यंदाही दुष्काळा भोगावा लागतो की, काय अशी स्थिती असताना गेल्या दोन दिवसात पावसाने जिल्ह्यात सर्वदूर जोर धरल्याने पेरणी केलेल्या पिके तरारली आहेत़ दुसरीकडे पावसाअभावी थांबलेल्या पेरण्यानांही वेग देण्यात आला असून शेतातील ओलव्याच्या बळावर कामे आटोपण्यास शेतकरी भर देत असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान  नंदुरबार आणि नवापुर तालुक्यात गत 15 दिवसांपासून पावसाअभावी थांबलेली शेतीकामे गत दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पुन्हा वेगात सुरु झाल्याचे चित्र आह़े जिल्ह्यात आजअखेरीस भात 48 टक्के, ज्वारी 89, बाजरी 33, मका 84, तूर 94, मूग 57, उडीद 77, भूईमूग 82, सोयाबीन 65 तर 114 टक्के क्षेत्रात कापसाची लागवड पूर्ण झाली आह़े नंदुरबार तालुक्यात आजअखेरीस 55 हजार 977, नवापुर 42 हजार 927, शहादा 69 हजार 107, धडगाव 17 हजार 254, तळोदा 20 हजार 779 तर अक्कलकुवा तालुक्यात 40 हजार 511 हेक्टर क्षेत्रात पिकांचा पेरा पूर्ण झाल्याची माहिती आह़े सर्वाधिक 107 टक्के पेरणी ही शहादा तालुक्यात करण्यात आली असून तुलनेने माघारी असलेल्या नवापुर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतीकामांना सुरुवात झाली आह़े 

शेतक:यांनी यंदाही कापसाला सर्वाधिक पसंती दिली असल्याने लागवड क्षेत्रातून दिसून येत आह़े यंदा 1 लाख 6 हजार क्षेत्रात सरासरी कापूस लागवड होण्याची शक्यता होती़ परंतू शेतक:यांनी यापेक्षा अधिक कापूस लागवड केली आह़े नंदुरबार तालुक्यात 37 हजार 505, नवापुर8 हजार 411, शहादा 35 हजार 488, तळोदा 9 हजार 798, धडगाव 91 तर अक्कलकुवा तालुक्यात 14 हजार 13 हेक्टर असा एकूण 1 लाख 21 हजार 676 हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड करण्यात आली आह़े अक्कलकुवा वगळता सर्वच तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक कापूस लागवड झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आह़े जिल्ह्यात 2 लाख 77 हजार 821 हेक्टर क्षेत्रापैकी 2 लाख 45 हजार 555 हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी यात कापसाचा सर्वाधिक वाटा आह़े यात वाढ होणे अपेक्षित असल्याने येत्या काळात निर्धारित क्षेत्रात 20 ते 25 टक्के अधिक क्षेत्रात पिकांची पेरणी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े कापसानंतर दुस:या क्रमांकाच्या पसंतीचे पिक म्हणून सोयाबीनला पसंती दिल्याचे चित्र असून 17 हजार 636 हेक्टर पेरणी पूर्ण झाली आह़े