शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 88 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुष्काळ छायेत असलेल्या शेतक:यांना पावसाने दिलासा दिल्याने 88 टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुष्काळ छायेत असलेल्या शेतक:यांना पावसाने दिलासा दिल्याने 88 टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ पावसामुळे उत्साह दुणावल्याने शेतक:यांनी कापसासह इतर खरीप पिकांची पेरणी करण्यास वेग दिला असल्याने येत्या दोन दिवसात किमान 101 टक्के शेतीक्षेत्रात पूर्ण होण्याची शक्यता आह़े  गेल्या वर्षी अल्पपजर्न्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागल्याने शेतकरी हैराण झाले होत़े यंदा जून महिन्याच्या मध्यात पावसाने यथातथा हजेरी लावल्याने चिंता वाढल्या होत्या़ यामुळे शेतशिवारात पेरण्यांची स्थिती बिकट होती़ यंदाही दुष्काळा भोगावा लागतो की, काय अशी स्थिती असताना गेल्या दोन दिवसात पावसाने जिल्ह्यात सर्वदूर जोर धरल्याने पेरणी केलेल्या पिके तरारली आहेत़ दुसरीकडे पावसाअभावी थांबलेल्या पेरण्यानांही वेग देण्यात आला असून शेतातील ओलव्याच्या बळावर कामे आटोपण्यास शेतकरी भर देत असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान  नंदुरबार आणि नवापुर तालुक्यात गत 15 दिवसांपासून पावसाअभावी थांबलेली शेतीकामे गत दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पुन्हा वेगात सुरु झाल्याचे चित्र आह़े जिल्ह्यात आजअखेरीस भात 48 टक्के, ज्वारी 89, बाजरी 33, मका 84, तूर 94, मूग 57, उडीद 77, भूईमूग 82, सोयाबीन 65 तर 114 टक्के क्षेत्रात कापसाची लागवड पूर्ण झाली आह़े नंदुरबार तालुक्यात आजअखेरीस 55 हजार 977, नवापुर 42 हजार 927, शहादा 69 हजार 107, धडगाव 17 हजार 254, तळोदा 20 हजार 779 तर अक्कलकुवा तालुक्यात 40 हजार 511 हेक्टर क्षेत्रात पिकांचा पेरा पूर्ण झाल्याची माहिती आह़े सर्वाधिक 107 टक्के पेरणी ही शहादा तालुक्यात करण्यात आली असून तुलनेने माघारी असलेल्या नवापुर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतीकामांना सुरुवात झाली आह़े 

शेतक:यांनी यंदाही कापसाला सर्वाधिक पसंती दिली असल्याने लागवड क्षेत्रातून दिसून येत आह़े यंदा 1 लाख 6 हजार क्षेत्रात सरासरी कापूस लागवड होण्याची शक्यता होती़ परंतू शेतक:यांनी यापेक्षा अधिक कापूस लागवड केली आह़े नंदुरबार तालुक्यात 37 हजार 505, नवापुर8 हजार 411, शहादा 35 हजार 488, तळोदा 9 हजार 798, धडगाव 91 तर अक्कलकुवा तालुक्यात 14 हजार 13 हेक्टर असा एकूण 1 लाख 21 हजार 676 हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड करण्यात आली आह़े अक्कलकुवा वगळता सर्वच तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक कापूस लागवड झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आह़े जिल्ह्यात 2 लाख 77 हजार 821 हेक्टर क्षेत्रापैकी 2 लाख 45 हजार 555 हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी यात कापसाचा सर्वाधिक वाटा आह़े यात वाढ होणे अपेक्षित असल्याने येत्या काळात निर्धारित क्षेत्रात 20 ते 25 टक्के अधिक क्षेत्रात पिकांची पेरणी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े कापसानंतर दुस:या क्रमांकाच्या पसंतीचे पिक म्हणून सोयाबीनला पसंती दिल्याचे चित्र असून 17 हजार 636 हेक्टर पेरणी पूर्ण झाली आह़े