शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

नंदुरबारात 82 नवीन योजनेची कामे संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:53 IST

पाणी पुरवठा योजना : 83 गावांना मिळणार लाभ, दुष्काळात दिलासा

नंदुरबार : यंदाच्या दुष्काळाच्या पाश्र्वभुमीवर मंजुर करण्यात आलेल्या राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजनेअंतर्गत 83 गावांच्या 82 पाणीपुरवठा योजनांना गती देण्याची मागणी होत आहे. यासाठी 32 कोटी 74 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय राज्याच्या पाणी पुरवठा विभागाने मुख्यमंत्री पेयजल योजनेतून 16 गावाच्या योजनांसाठी सात कोटी 12 लाख रुपये देखील मंजुर केले आहेत.जिल्ह्यात यंदा दुष्काळाची धग मोठी आहे. त्यामुळे यापूर्वीच्या अपुर्ण पाणी पुरवठा योजनांना गती देण्यासह नवीन योजना मार्गी लावाव्या यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे पाठपुरवा करण्यात आला होता. त्यानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी या योजनांअंतर्गत निधी मंजुर केला आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्याचा पाणी पुरवठा आराखडा तयार करून तो पाठविण्यात आला होता. 2018-19 चा जिल्ह्याचा आराखडा काही दिवसांपूर्वीच मंजुर करण्यात आला. या आराखडय़ामध्ये पालकमंत्र्यांनी सुचविलेल्या योजनांचा विचार करण्यात आला आहे. या वर्षी जिल्ह्यातील 83 वाडय़ा-वस्त्यांसाठी 82 योजनांचा समावेश राहणार आहे. एकुण 32 कोटी 74 लाख रुपये त्यासाठी खर्च अपेक्षीत आहे. या आराखडय़ामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी 15 लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. नवीन व चालू असणा:या 84 गावे, वाडय़ासाठी 83 योजनांकरीता 33 कोटी 89 लाख रुपयांचा आराखडाही यापूर्वीच मंजुर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून 16 गावांसाठी 16 योजना मंजुर केल्या असून त्यासाठी सात कोटी 12 लाख रुपये निध उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील पाणी पुरवठा सुयोग्य रितीने होण्यासाठी व जिल्ह्यातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी याच योजनांच्या माध्यमातून उपाय योजनांना मार्गी लावण्यात येणार आहे.  तीन वर्षापूर्वी अर्थात 2015 मध्ये केंद्र शासनाने राज्यातील पाणी पुरवठय़ाच्या अपुर्ण योजनांची    संख्या पहाता राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजनेत नवीन योजना घेण्यावर   काही काळापुरती स्थगिती दिली होती. तालुकानिहाय मंजुर योजना, गावांची संख्या व अंदाजीत रक्कम पुढील प्रमाणे : अक्कलकुवा तालुक्यातील 18 गावे व 17 योजनांसाठी 10 कोटी 50 लाख रुपये. धडगाव तालुक्यातील 13 गावे व 13 योजनांसाठी दोन कोटी 36 लाख रुपये. नंदुरबार तालुक्यातील 22 गावांमधील 22 योजनांसाठी 12 कोटी 25 लाख रुपये. नवापूर तालुक्यातील 15 गावांमधील 15 योजनांसाठी चार कोटी 15 लाख, शहादा तालुक्यातील 10 गावांमधील दहा योजनांसाठी दोन कोटी 89 लाख तर तळोदा तालुक्यातील पाच गावांच्या पाच योजनांसाठी 56 लाख रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे.याच अनुषंगाने मागील तीन वर्षात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत  राज्य हगणदारीमुक्तही जाहीर करण्यात आले आहे. हगणदारीमुक्तीसाठी गावांमध्ये झालेल्या शौचालयाच्या बांधकामासाठी उर्वरित आवश्यक निधी  चार कोटी 94 लाख रुपये देखील यापूर्वीच मंजुर करण्यात आला आहे.