शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नंदुरबार जिल्ह्यातील 82 कुष्ठरोगी रोगमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:26 IST

30 जणांना प्रमाणपत्राचे वाटप : गेल्या वर्षभरात सव्रेक्षणात आढळले पावणे सहाशे रुग्ण

तळोदा : गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून पावणे सहाशे कुष्ठरोगाचे रुग्ण आढळून आले असून, त्यातील 82 रुग्ण उपचाराने पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व मेळाव्यात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते त्यातील 30 रुग्णांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले.जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण आरोग्य विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षी कुष्ठरोगाच्या रूग्णांचे सव्रेक्षण करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात संपूर्ण जिल्ह्यातून साधारण 575 रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वावर या यंत्रणेमार्फत उपचार सुरू आहेत. संबंधीत यंत्रणेकडून पुरेसा औषधोपचार मिळाल्यानंतर त्यातील 82 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान यातील 30 रुग्णांना गेल्या शनिवारी तळोदा येथील वामनराव संकुलामध्ये विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व मेळाव्यात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले           आहे. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा सत्र न्यायाधिश अभय वाघवसे, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे संजय यादव, न्यायाधिश एस.टी. मलिये, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक          डॉ.प्रिती पटेल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील आदींसह या विभागातील कर्मचारी उपस्थित    होते.जिल्ह्यातील कुष्ठरोगाच्या रूग्णांना या यंत्रणेकडून प्रमाणपत्र देण्यात आल्यानंतर या रुग्णांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कुष्ठरोग्यांसाठी शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा आवास घरकुल योजना, मोफत बस प्रवास अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. तथापि संबंधीत यंत्रणांच्या उदासिन धोरणांचा फटका त्यांना बसत असल्याचा आरोप आहे. कारण त्यांनी सातत्याने मागणी करूनही याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे म्हणणे आहे. आधीच कुष्ठ रोगीच्या रुग्णांबाबत समाजामध्ये नकारात्मक दृष्टीकोनाची भावना आहे. त्यामुळे असे रुग्ण माहितीसाठी पुढे येत नाही. साहजिकच त्यांना प्रशासनानेच मदत देण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. जिल्हा कुष्ठरोग कार्यालयातर्फेदेखील तळोदा, शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील साधारण 250 रुग्णांचे संजय गांधी निराधार योजना, घरकुले व मोफत प्रवास सवलतीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्याबाबत तत्कालीन महसूल प्रशासनाशीदेखील संबंधीत यंत्रणेने चर्चा केली होती. त्याबाबत स्वतंत्र बैठकही घेण्याचे आश्वासन महसूल प्रशासनाने दिले होते. मात्र आजतागायत त्यावर कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी संबंधीत यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून या रुग्णांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.