शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

८१ टक्के पावसामुळे तूट निघतेय भरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असली तरी आणि सिंचन प्रकल्पांमध्येही ५० टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असली तरी आणि सिंचन प्रकल्पांमध्येही ५० टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाला असला तरी पावसाची तूट मात्र १५ टक्क्यांपर्यंत कायम आहे. दरम्यान, जिल्ह्यात सरासरी ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या रिपरिपमुळे आणि सूर्यदर्शन होत नसल्याने मूग, उडीद या पिकांसह नवीन लागवड केलेल्या पपई पिकाला याचा फटका बसला आहे. काही ठिकाणी पीकं पिवळी पडू लागली आहेत तर काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. जुलैच्या अखरेपर्यंत जिल्ह्यात पावसाची ३५ टक्के तूट होती. ती गेल्या २२ दिवसात कमी होऊन १५ टक्क्याच्या आत आली आहे. पावसाचे प्रमाण असेच कायम राहिल्यास आॅगस्ट अखरेपर्यंत तूट भरून निघण्याची शक्यता आहे. पावसाची तूट असली तरी मात्र जिल्ह्यात लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढला आहे.नवापूर तालुक्यात एकाच दिवसात १४० मि.मी.पावसाची नोंद झाली होती. त्याचा परिणाम चांगला झाला आणि नवापूर तालुक्यातील पूर्व भाग तसेच नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भागातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. त्याचा परिणाम लघु व मध्यम प्रकल्प तुडूंब भरले. नंदुरबार तालुक्यातील आणि नवापूर व साक्री तालुक्यातील सिमेवर असलेल्या धनीबारा, खोलघर, आंबेबारा हे प्रकल्प ओसंडून वाहू लागले. याच भागातील तसेच नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक मध्यम प्रकल्प देखील ७५ टक्केपेक्षा अधीक भरला. या प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच असल्याने प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.नवापूर तालुक्यातीलच मध्यम प्रकल्प असलेला रंगावलीतही ९० टक्केपर्यंत पाणीसाठा झाला आहे. शहादा तालुक्यातील दरा प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. याशिवाय शिरवे, ता.नवापूर, खैरवे, ता.नवापूर, धनपूर, ता.तळोदा, वाघदी, ता.नवापूर, भुरीवेल, ता.नवापूर, राणीपूर, ता.शहादा आदी प्रकल्पांमध्येही ८० टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाला आहे.अद्याप पावसाळ्याचा एक महिना बाकी आहे. या काळात सरासरीएवढा पाऊस झाला तरी जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा हा सरासरी ८० टक्केपेक्षा अधीक राहील अशी शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना ते फायद्याचे ठरणार आहे.अक्कलकुवा तालुका सर्वाधिकआतापर्यंत सर्वाधिक पावसाची ७० टक्के नोंद अक्कलकुवा तालुक्यात झाली आहे. सुरुवातीला हा तालुका पावसाच्या सरासरीत जिल्ह्यात मागे होता. नंतर सरासरी भरून काढत हा तालुका जिल्ह्यात सर्वात पुढे गेला आहे. त्या खालोखाल शहादा तालुक्यात ६८ टक्के पाऊस झाला आहे. नवापूर तालुक्यात ६४ टक्के, तळोदा तालुक्यात ६३.७६ , नंदुरबार तालुक्यात ६३.६ टक्के तर धडगाव तालुक्यात ४८.५४ टक्के इतकी आहे.जनजिवनावर परिणामसंततधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. संततधार पावसामुळे बाजारपेठेतही शुकशुकाट दिसून येत आहे. सूर्यदर्शनच होत नसल्यामुळे आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. विविध आजार आणि त्यात कोरोना यामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील ताण वाढला आहे.सततच्या पावसामुळे पीकं पिवळी पडू लागली आहेत. मूग, उडीद, चवळी या कडधान्य पिकाांना सर्वाधिक फटका बसला आहे.सूर्यदर्शनच होत नसल्याने आणि पावसाची उघडीपही नसल्यामुळे शेतातील निंदणी, कोळपणी, पिकांना फवारणी आदी कामे होऊ शकत नाहीत.अशा वातावरणामुळे पिकांवर विविध किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.अनेक भागातील शेतांमध्ये पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होऊ शकत नसल्यामुळे पिकं सडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नुकसान होत आहे. यंदा अशा वातावरणामुळे उत्पादकता देखील कमी होणार आहे.