शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

तळोद्यात ‘डिमांड’साठी 800 प्रकरणे पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 12:37 IST

वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष : तळोदा तालुक्यातील शेतक:यांची व्यथा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे डिमांडची 800 प्रकरणे शेतक:यांनी दाखल केली आहेत. गेल्या तीन वर्षापासून ही प्रकरणे प्रलंबीत आहेत. अर्थात टप्या टप्याने त्यावर कार्यवाही केली जात असल्याचा दावा संबंधीत यंत्रणा करीत असली तरी कनेक्शनअभावी शेतक:यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत असल्याने जोडणी करीता लागणारे साहित्य या विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावीत, अशी अपेक्षा आहे. तळोदा तालुक्यातील कृषी पंपधारक शेतक:यांनी सन 2014 पासून वीज जोडणीसाठी येथील वीजवितरण कंपनीकडे कंपनीच्या नियमानुसार लागणारी डिमांडची रक्कम भरली आहे. सन 2014 पासून आजतागायत साधारण 800 प्रकरणे कंपनीच्या कार्यालयाकडे जमा करण्यात आली आहे. टप्प्या टप्प्याने या प्रकरणांवर कार्यवाही सुरू असल्याचा दावा अधिका:यांनी केला असला तरी त्यास अधिक गती देण्याची आवश्यकता असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. आतापावेतो मागणी केलेल्या प्रकरणामधून           निम्म्या प्रकरणांमधील शेतक:यांनादेखील जोडणी मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. साहजिकच शेतक:यांना शेतात पाण्याची व्यवस्था असतांना केवळ वीज जोडणी अभावी सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. हे शेतकरी तातडीने डिमांड मिळण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या तालुका कार्यालयापासून थेट शहादा उपविभागाच्या कार्यालयार्पयत सातत्याने हेलपाटे मारत आहेत. तथापि प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे. आठ ते 15 दिवसात तपास करा एवढेच मोघम उत्तर त्यांना मिळते. यात पैसा व वेळ वाया जात आहेच. परंतु पश्चातापही सहन करावा लागत असल्याची शेतक:यांची व्यथा आहे.वास्तविक इकडून-तिकडे उधार उसनवार व व्याजाने पैसे काढून या शेतक:यांनी शेतात कुपनलिका बरोबरच डिमांडचे पैसे वीज वितरण कंपनीकडे भरले आहे. त्यामुळे शेतक:यांना नाहक आर्थिक फटका बसत आहे. सदर क्षेत्रात येणा:या पिकांवर पैसे फेडले जातील अशी त्यांची अपेक्षा असतांना               वितरण कंपनीने त्यांच्या आशेची निराशा केली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिका:याने एवढय़ा मोठय़ा संख्येने येथील कार्यालयाकडे डिमांडची प्रकरणे प्रलंबीत असतांना नाराजी व्यक्त केली आहे. शेतक:यांच्या जोडणीसाठी लागणारी वीजेची साहित्य वरिष्ठांनी तातडीने पुरविली तर प्रकरणेही तत्काळ निकाली निघतील. शिवाय शेतक:यांनादेखील ताबडतोब सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. मात्र कंपनीच्या वरिष्ठ प्रशासनानेच याप्रकरणी उदासिन भूमिका घेतल्याचा आरोप आहे. निदान या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी तरी दखल घ्यावी, अशी मागणी शेतक:यांनी केली आहे. अन्यथा शेतक:यांनी या विरोधात आदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.